बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर सध्या आपल्या आगामी 'चार दिन की चांदनी' या सिनेमाच्या यशाबद्दल निश्चिंत झालेला दिसतो आहे. तुषारचा हा सिनेमा विद्या बालनच्या 'कहानी'बरोबर एकाच दिवशी रिलीज होत आहे.
तुषार आपल्या सिनेमाबद्दल खूपच कॉन्फिडंट आहे, म्हणून तर त्याची चक्क विद्याला शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेली.
तुषारने दावा केला आहे की, त्याच्या आगामी या सिनेमात मनोरंजनाचा खजिना आहे. इतकचं नाही तर
तुषारने आपल्या आगामी सिनेमातला फेमस डायलॉग विद्याला उद्देशून म्हटला, तो म्हणजे 'पान दे टकी, विद्या बालन'. तुषार इथवरच थांबला नाही तर माझ्या सिनेमात प्रेक्षकांना हवं असलेल फक्त आणि फक्त 'एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट' आहे, असंही म्हटलं
तुषारचा 'चार दिन की चांदनी' आणि विद्या बालनचा 'कहानी' चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ मार्चला रिलीज होत आहे.
आता तुषार आपल्या सिनेमाबद्दल कितीही कॉन्फिडंट असला तरी प्रेक्षक कोणाच्या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.