पर्यावरणाचा र्हास करणार्या कॅरी बॅगवर बंदी?, मुख्यमंत्र्यांचे संकेत
दिव्य मराठी वेब टीम | Jun 05, 2012, 18:38PM IST

मुंबई: राज्यात लवकरच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिली. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असेही चव्हान यांनी सांगितले.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्यामुळे नद्या, नाले तुंबतात. सर्वत्र रोगराई पसरत आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा मुद्दा विचाराधीन असून लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






