जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur >> Don't Rain At Nagapur. Farmer Harassment. Hear Cuting At Kamaleshwar.

पावसासाठी सामुहिक मुंडण करून वरुणराजाला साकडे

भास्कर न्यूज नेटवर्क | Jun 29, 2012, 14:45PM IST
 
 


नागपूर: पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. वरुणराजाची कृपा व्हावी, यासाठी  कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही येथील शेतकर्‍यांनी सामुहिक मुंडण करून वरुणदेवताला साकडे घातले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मान्सूनच्या सुरूवातीला आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला होता. दमदार पाऊस झाल्यानंतर बहुतेक शेतकर्‍यांनी पेरण्या करून टाकल्या, परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने रोपट्यांची वाढ खुंटली आहे. सामुहिक मुंडण केल्यानंतर वरुणदेवता प्रसन्न होतो, अशा भावना या शेतकरीवर्गात व्यक्त होत आहे.

सचिन शंकरराव कपाटे (22), अमोल दामोदर खोबे(21), रोशन सूर्व भान बुरबुरे (22), रोशन गणेश गावंडे (22), चांदशाह मेहबूब शाह  (22), भीमराव कृष्णाजी खादोरे (27) या शेतकरी पुत्रांनी मुंडण केले आहे. याशिवाय परिसरातील काही शेतकर्‍यांनी गणपती, हनुमान,  शिवशंकर आणि आदीशक्तीची पूजा-अर्चा सुरु केली आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment