तंत्रसाधना सर्वात रहस्यमय साधना आहे. मांत्रिकांना पाहिल्यानंतर बरेच लोक घाबरतात, तर काही लोकांसाठी ते कुतूहलाचा विषय ठरतात. स्मशानात राहणाऱ्या मंत्रीकांबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांच्या लक्षात लवकर येत नाहीत.
फार कमी लोकांना माहिती आहे की, मांत्रिकाच्या साधनेमध्ये एवढी शक्ती असते की, ते मृत व्यक्तीच्या आत्म्याशी बोलू शकतात. या गोष्टी ऐकताना-वाचताना विचित्र वाटतात परंतु या गोष्टींना पूर्णपणे नाकारलेही जाऊ शकत नाही. आजही असे तंत्रसाधक आहेत, जे मृत आत्म्यांना आपल्या आधीन करू शकतात.
या साधना स्मशानभूमीत केल्या जातात. संपूर्ण जगामध्ये फक्त चारच असे स्मशान घाट आहेत ज्याठिकाणी तंत्र क्रियांचा परिणाम लवकर दिसून येतो. या स्मशानभूमीत प्रेतात्मे मांत्रीकांसमोर बोलू लागतात. अलाहाबादमध्ये १४ जानेवारीपासून सुरु होणा-या कुंभमेळ्यात अनेक मांत्रिकांच्या तांत्रिक क्रिया पाहण्यास मिळू शकतात.