राजस्थानला भूकंपाचा धक्का
वृत्तसंस्था
| Feb 24, 2013, 09:04AM IST

जयपूर- रविवारी सकाळी राजस्थानच्या नागरिकांना भूकंपाच्या धक्क्यानेच झोपेतून उठवले. सकाळी 6.27 मिनिटांनी राजस्थानातील अनेक शहरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. प्राप्त माहितीनुसार जयपूर आणि टोंक येथे हे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू टोंक असून त्याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. हा धक्का तीन सेकंदापर्यंत जाणवला. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लोकांनी घराबाहेर पडणे पसंत केले.
शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत नुकसानीची आकडेवारी समजू शकली नव्हती. जयपूर, कोटा आणि टोंकसहित राजस्थानातील इतर अनेक शहरांत भूकंपाचे धक्के जाणवले.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





