लोकांच्या राहणीमान, खाण्यापिण्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. धावपळीच्या जीवनामुळे शुद्ध आणि पौष्टिक जेवणाकडे दुर्लक्ष केलं जातं. याचा वाईट परिणाम शरीराबरोबर केसावरही होताना दिसतो. केसाकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात गळू लागतात.
अनेकदा जखम झाल्यामुळे, मधुमेह, ल्युकेमिया, कर्करोग, दाद, एक्जीमामुळेही केस गळू लागतात. केस मोठ्या प्रमाणात झडल्यामुळे टक्कल पडू शकतं. अतिविचार केल्यामुळेही टक्कल पडू शकतं. मात्र काही आयुर्वेदीक उपचारांमुळे टक्कलपणापासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो. सोबत या उपायांमुळे केस घनदाट आणि सुंदरही होतात.