वेद-पुराणाअनुसार या सृष्टीचे निर्माता शिवशंकर आहे. त्यामुळे शंकराची आराधना करणार्या भक्ताला जीवनात कोणत्याची वस्तुची कमतरता भासत नाही. शिव मंदिरात रात्री दिवा लावल्याने भक्तांला अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होत असते.
शिव शंकराची नियमित पूजा अचर्ना केल्याने भक्तांच्या धन संबंधी समस्या दूर होतात.आपल्या घरात ऐश्वर्य नांदावे म्हणून शिवपुराणात एक प्रभावी उपाय सांगण्यात आला आहे. या संदर्भात शिवपुराणात एक कथा आहे. कथेनुसार अतिप्राचीन काळात गुणनिधी नामक व्यक्ति खूप गरीब होता. तो आपली भूक क्षमवण्यासाठी अन्नाचा शोध घेत होता.रात्र झाली तरी त्याची भूक क्षमली नाही. मग तो त्या रात्री एका शिव मंदिरात पोहचला. रात्री मंदिरातच विश्रांती घ्यायचे गुणनिधीने ठरवले. राती अचानक मंदिर परिसरात अंधार पसरला. हा अंधकार दूर करण्यासाठी त्याने शिव मंदिर आपला शर्ट जाळला. रात्रीच्या वेळी शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण करणार्या गुणनिधीला पुढील जन्मात देवतांचा कोषाध्यक्ष कुबेर देव होणारचे वरदान प्राप्त झाले.
या कथेनुसार रात्री शिव मंदिरात दिवा लावणार्या व्यक्तिचे जीवन अपार धन-संपत्ती आणि ऐश्वर्याने तृप्त होते. यासाठी शिव मंदिरात नियमित दीवा लावला पाहिजे.