पती- पत्नीमध्ये होणार्या शाब्दीक बाचाबाचीचे रुपांतर क्षणात भांडणात होऊन जाते. भविष्यात होणार्या काडीमोडला देखील हेच कारणीभूत ठरते. याचा विपरित परिणाम कुटुंबातील अन्य सदस्यांवर होत असतो. वारंवार होणार्या वादविवादामुळे घरात अशांती पसरते आणि अशा घरात आपण जास्त वेळ न थांबता आपण जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवत असतो. अशा घरात लक्ष्मी देखील नाराज होत असते. आपण या समस्येतून बाहेर पडण्यासाठी एक ना अनेक उपाय करतात. परंतु, त्याचा काहीच फायदा होत नाही. तुमच्या समस्येचा उपाय खाली दिलेल्या मंत्रात लपला आहे. खाली दिलेल्या कुंजिका स्त्रोतातील मंत्राचा नियमित जप केल्याने काही दिवसातच पती- पत्नीमधील वाद दूर होतील. विशेष म्हणजे त्यांच्यातील प्रेम आणखीच बहरेल.
मंत्र-
धां धी धू धूर्जटे: पत्नी वां वी वू वागधीश्वरी।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शा शीं शू में शुभं कुरू।।
जप पद्धत:
- दररोज वरील मंत्राचा 108 वेळा जप करावा.
- जप हा लाल चंदनाच्या माळेने करावा.
- पूजा करताना कालिका देवी अथवा दुर्गा मातेला लाल पुष्प अर्पण करावे.
- पती-पत्नी यांच्याशिवाय कुटुंबातील अन्य सदस्यामधील वैचारिक मतभेद देखील दूर होऊन जातील.