मनाजोगा आयुष्याचा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक तरुणीची प्रामाणिक इच्छा असते. परंतु, काही कारणास्तव बहुतेक तरुणींना याबाबत आयुष्याशी तडजोड करावी लागत असते. परंतु आता अशा तरुणी इच्छित वर प्राप्त करू शकतात.
संत तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये अनेक दोघे सांगितले आहेत. त्यांचा जप केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊन जातात. त्यातील एक दोघा खाली दिला आहे. विवाहेच्छूक तरुणी या दोह्याचा नियमित जप करून इच्छित वर प्राप्त करू शकतात.
दोहा
सुनु सिय सत्य असीस हमारी। पूजिहि मन कामना तुम्हारी।।
जप करण्याची पद्धत:
- पहाटे लवकर उठून नित्य कर्म आटोपून माता पार्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे.
- पूर्व दिशेला मुख करून आसनस्थ व्हावे.
- तत्पश्चात रुद्राक्ष माळेचा वरील दोह्याचा जप करावा. किमान पाच माळी जप अवश्य करावा.
- दररोज नियमित संत तुलसीदास यांच्या दोह्याचा जप करून इच्छित वर प्राप्त करू शकता.