आपण मंदिरात गेल्यानंतर देवाला प्रसाद अर्पण करतो. पुजारी तो प्रसाद देवासमोर ठेऊन परत आपल्याला देतो. त्यानंतर आपण तो प्रसाद खातो. शास्त्रामध्ये प्रसाद खाण्यापूर्वी काय केले पाहिजे हे सांगितले आहे.
प्रसाद खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की, तो ज्या देवाचा आहे त्याचे स्मरण करूनच तो ग्रहन केला पाहिजे. देवाचे स्मरण करून प्रसाद खाल्ल्याने आपल्याला त्याचे शुभ फळ मिळते.
प्रसाद खाल्यामुळे अनेक दैवी शक्तिंची कृपा प्राप्त होते. आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. ज्या देवाचा प्रसाद असतो त्या देवाचा मंत्र जप केला तरी चालू शकते. प्रसादातून शक्ती मिळण्यासाठी देखील देवाचे स्मरण करणे चांगले असते.
प्रसाद खाण्याने आपले पाप नष्ट होते आणि पुण्यात वाढ होते. यासाठी प्रसाद खाताना देवाचे अवश्य स्मरण करावे. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा तर प्राप्त होते शिवाय रखडलेली कामे देखील पूर्ण होतात.