बसल्या-बसल्या पाय हलवू नये, कारण ...

पुरातन काळापासून काही धार्मिक परंपरा आणि नियम तयार केले गेले आहेत. त्यांचे योग्य पालन हे आर्थिक स्थिती उंचावण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास फायदशिर ठरतात. या नियम आणि परंपरांमागे धार्मिक तथा वैज्ञानिक कराणे देखील आहेत. आपण रोजच्या व्यवहारात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो. त्यातील अनेक कर्म अनुचित मानली गेली आहेत. ती टाळण्यास सांगितले जाते. कारण त्यांचा संबंध आपल्या सुख-समृद्धीशी जोडलेला असतो.
घरात बसल्या बसल्या पाय हलवणे टाळले पाहिजे, किंबहूना तसे करुच नये असे घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगत असतात. तसे पाहिले तर ही समान्य क्रिया आहे. मात्र यामागे काही धार्मिक कारणे दडलेली आहेत. व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांच्या सवयी या त्यांच्या भाग्यावर परिणाम करतात. शास्त्रात सांगितले गेले आहे की, पुजा-अर्चना किंवा कोणतेही धार्मिक कार्य सुरु असतांना पाय हलवू नये. त्यामुळे पुजेची पुण्याई लाभत नाही.
बहुतेक लोकांना बसल्या-बसल्या पाय हलवण्याची सवय असते. धर्मशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने धनलाभ तर होत नाहीच, मात्र नाश नक्की होतो. शास्त्रामध्ये या क्रियेला अशुभ मानले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ही सवय हानीकारक आहे. त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. नसांवर ताण पडून त्या दुखावण्याची शक्यता असते. पाय हलविण्याचा वाईट परिणाम ह्रदयावर देखील होऊ शकतो. त्यामुळे ही सवय सोडणेच उत्तम आहे.
संध्याकाळच्या समयी धनसंपत्तीची देवता महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करीत असते. अशा वेळेस जर एखादी व्यक्ती पाय हलवत बसली असेल तर देवी नाराज होते. महालक्ष्मीच्या नाराजीमुळे धन-पैशासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कुठेही बसलेले असतांना पाय हलवू नये याची काळजी घेतली पाहिजे.








