करणीच्या प्रभावापासून दूर राहाण्यासाठी करा हा उपाय...

तंत्र शास्त्राचा उपयोग पुरातन काळापासून मनुष्य करत आला आहे. तत्र शास्त्रात अशा अनेक प्रक्रिया केल्या जातात, ज्यामुळे एखाद्या मनुष्याला आपण भ्रमित किंवा वश करू शकतो. या प्रक्रियांना वशीकरण, उच्चाटन, आकर्षण, करणी, संम्मोहन असे म्हणतात. या सर्व प्रकारांचे निदान फक्त तंत्र शास्त्रात आहे. तुम्ही अशा एखाद्या क्रियेमुळे चिंतेत असाल तर खाली दिलेला उपाय करा.
तीन पिकलेले लिंब घेऊन त्यातील एकाला निळा, दुस-याला काळा आणि तिस-याला लाल रंगाची शाई लावा. या तीन लिंबामध्ये एक-एक अखंड लवंग टाका. त्यानंतर तीन बुंदीचे लाडू, तीन पिवळे-लाल फुले घ्या. हे सर्व साहित्य एखाद्या रुमालात बांधा. हा रुमाल प्रभावित व्यक्तीच्या अंगावरून सात वेळेस उतरवून टाका. नंतर हा रुमाल वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. एक गोष्ट लक्षात ठेवा रुमाल पाण्यात टाकत असताना जवळपास कोणीही नसू नये. या उपायाचा प्रभाव तुम्हाला लवकरच दिसू लागेल.







