चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडिअमशी टीम इंडियाच्या अनेक आठवणी जडलेल्या आहेत. सव्वीस वर्षांपूर्वी येथे एक कसोटी खेळली गेली होती, ज्यामध्ये एक इतिहास रचला गेला होता. 18 सप्टेंबर 1986 रोजी ऑस्ट्रेलिया आणि यजमान टीम इंडिया यांच्या दरम्यान झालेली कसोटी कोणत्याही निकालाशिवाय संपुष्टात आली. कसोटी इतिहासातील ही दुसरीच वेळ होती. आणि विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच या दोन्ही सामन्याचा साक्षीदार होता.
ग्रेग मॅथ्यूजच्या चेंडूवर अंपायरने टीम इंडियाचा फलंदाज मनिंदर सिंगला पायचीत केले. अंपायरनी बाद देताच मनिंदर सिंग चिडला. विजयापासून एका धावेचे अंतर असताना आपल्याला बाद देण्यात आले, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा टाय झालेल्या या सामन्याची खास छायाचित्रे...