बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ ही पुराणमतवादी संघटना पाकिस्तानचीच री ओढत असते. गेल्या निवडणुकीत 300 सदस्यसंख्या असलेल्या बांगलादेश पार्लमेंटमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ला आपले जेमतेम दोन सदस्य निवडून आणता आले आहेत, तरीही ही संघटना आपले म्हणणे जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. इस्लामचे संरक्षण एका मुस्लिम सार्वभौम राष्ट्रात केले जावे, अशी संघटनेची मागणी आहे. ती त्यांनी...
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेचा मी संचालक असल्याचा परिणाम म्हणून तिथले शिक्षक, विद्यार्थी, तज्ज्ञ यांच्याशी केलेली चर्चा, पाहिलेले चित्रपट, सामोर्या आलेल्या समस्या या सगळ्यांमुळे माझी चित्रपटांच्या बाबतीतली जाण अधिक तल्लख आणि अधिक खोल झाली, यात शंका नाही. पण तिथल्या जबाबदार्यांमुळे कुठलंही सृजनात्मक काम होऊ शकत नव्हतं....
झुंजार, काळा पहाड, धनंजय हे मराठी ‘पल्प फिक्शन’मधले बाबुराव अर्नाळकरांनी निर्माण केले हीरो. आजही ते तुफान लोकप्रिय आहेत. काही प्रकाशकांनी आता अर्नाळकरांची पुस्तके नव्याने प्रकाशित केली आहेत. परंतु एकेकाळी ही पुस्तके अत्यंत स्वस्त कागदावर छापलेली असत आणि स्वस्तात मिळत. ‘झुंजार’चे नाव विजय. तो चर्चगेटजवळ उत्तुंग (म्हणजे पाच मजली) इमारतीत राहतो. मारामारीत,पिस्तुले...
मागील आठवड्यात देशाच्या कायदामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. राजधानी दिल्लीच्या रंगमंचावर घडलेला तो एक नाट्यमय प्रसंग होता. त्या प्रसंगानेच कायदे बनवणार्या विभागाचा मंत्री कसे बेकायदा काम करू शकतो, हे वास्तव लोकांपुढे आणले. अश्विनीकुमारांचा एकूणच कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. दोन महिन्यांपूर्वीच देशाचे सॉलिसिटर जनरल रोहिंग्टन नरिमन यांनी कायदामंत्र्यांची...
जर्मनीतील वास्तव्यादरम्यान समाजशास्त्राचा एक प्राध्यापक वुल्फगॅग्न कनाबे मला भेटला. तो भारताच्या किनार्यावरून सागरी प्रवास करणार होता. त्याच्या त्या सागरी प्रवासातील उर्वरित टप्पा ‘वास्को-द-गामा’च्या मार्गाने होणार होता. ज्या बोटीने तो प्राध्यापक प्रवास करणार होता ती बोट ‘मरकॅटर’, त्याने स्वत: बांधली होती. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाची कल्पना...
भारताचा ‘मायकेल जॅक्सन’ ही प्रभुदेवाची ओळख आहे. नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करता करता तो दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करू लागला. कालांतराने सुपरड्युपर हिट दिग्दर्शकही बनला. दाक्षिणात्य यशाची त्याने बॉलीवूडमध्येही पुनरावृत्ती घडवून आणली आहे. प्रभुदेवाचा ‘रमय्या वस्तावय्या’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे.
1994 मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रचंड...
नाट्यगृहात मिट्ट काळोख... पडदा वर जाण्याची वेळ समीप आलेली...नाट्यशिबिर, कार्यशाळेत झालेल्या सरावानंतर संवाद आठवेल की नाही, याची लागलेली धाकधूक...पडदा अलगद वर जातो अन् नाटक कधी सुरू होते ते कळतही नाही...रसिकजनांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रत्येक बालकलाकाराच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाढू लागतो...
शाळांना सुट्या लागण्याचा अवकाश की ‘नेमेचि येतो’ या उक्तीप्रमाणे...
कार्टून चॅनल्सवरून दिवसभर बच्चे कंपनीला आपल्या संगतीत रमवल्यानंतर डोरेमॉन, सिंच्यॅन, छोटा भीम टीव्हीवरून थेट रंगमंचावर अवतरली आहेत. स्मार्टफोनवरील ‘अॅँग्रीबर्ड’ देखील त्यात मागे नाही. रिमोट दाबताच प्रकट होणारी आणि बंद करताच गायब होणारी ही सर्व मंडळी रंगमंचावर प्रत्यक्ष आल्यावर काय करतात या कुतूहलापोटी तरी हे सर्व बालगोपाळ थोडा वेळ तरी टीव्हीपासून दूर जात आहेत....
महाराष्ट्रातील शीख समाजाच्या योगदानाची दखल घेताना सर्वप्रथम पंजाब जाणून घ्यायला हवा. पंजाब हे नाव पंज+आब असे आहे. पंज म्हणजे पाच, आब म्हणजे पाणी किंवा अर्थात येथे नद्या. ‘झेलम’, ‘चिनाब’, ‘रावी’, ‘व्यास’ व ‘सतलज’ या पाच पवित्र नद्या सिंधू नदीला मिळतात. तो सुपीक व समृद्ध प्रदेश म्हणजे पंजाब. ऋग्वेदात या सहा नद्या आणि सातवी सरस्वती नदी (जी आता भूमिगत झाली आहे) या...