आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्थव्यवस्था खुली होणे आणि आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत लागू केलेल्या उपायांमुळे उद्योगाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. २०२१ मध्ये २०२० पेक्षा चांगले निकाल असतील]अशी आशा कंपन्यांना आहे. डिसेंबर महिन्यात उद्योग संघटन फिक्की आणि ध्रुवा अॅडव्हायझर्सने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. ऑगस्ट २०२० च्या तुलनेत कंपन्यांच्या कामगिरीत उल्लेखनीय सुधारणेचेही संकेत मिळाले आहेत.कंपन्या आपल्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने काम करत आहेत.
जागतिक पुरवठा साखळी शिफ्ट होण्याचा फायदा
जागतिक पुरवठा साखळी चीनकडून अन्य देशांमध्ये शिफ्ट होईल. ७० टक्के सहभागींनी सांगितले की, भारताला या बदलाचा फायदा मिळू शकतो. नजीकच्या भविष्यात निर्मिती क्षेत्राचा मोठा हिस्सा चीनकडून भारतात शिफ्ट होण्याची आशा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.