आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) 'अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना' 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता. परंतु, या योजनेत वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना घेता यावा यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
काय आहे योजना?
सरकार या योजनेंतर्गत नोकरी गेल्याला बेरोजगारांना भत्ता देणार आहे. 3 महिन्यापर्यंत बेरोजगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 3 महिन्यातील पगाराच्या सरासरी 50% दावा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे 30 दिवसात या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना ESIC व्दारा कार्यान्वित आहे.
एकाच वेळा घेता येणार लाभ
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत एका लाभधारकला केवळ एकाच वेळेस लाभ घेता येणार आहे.परंतु, लाभ घेतेवेळी तो व्यक्ती मागील तीन महिन्यांपासून बेरोजगार असायला हवा. तरच त्याला सदरील योजनेचा लाभ घेता येईल.
कोणाला घेता येणार लाभ? जी व्यक्ती देशातील खाजगी क्षेत्रात नोकरी करत असेल आणि कंपनीकडून सदरील व्यक्तीचे पीएफ/ईएसआय कटत असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु, वरील अट येते ही कायम करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार मागील 78 दिवसांपासून बेरोजगार असायला हवा.
या योजनेचा लाभ कसा मिळणार?
ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी या विभागातील कुठल्याही शाखेत जाऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाते. पात्र असलेल्या अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.