आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Stock Market News And Update News,  Sensex Falls 700 Points, Rupee Hits Record Low Of 81.55 Against Dollar

शेअर बाजार अपडेट्स:सेन्सेक्स 954 अंकांनी घसरून 57,145 वर बंद, डॉलरच्या तुलनेत रुपया 81.55 या विक्रमी निचांकीवर

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी सेन्सेक्स 954 अंकांच्या घसरणीसह 57,145 वर बंद झाला. निफ्टी 17,100 च्या खाली घसरला. तो 297.90 किंवा 1.72% खाली 17,029 वर बंद झाला.

रिअ‌ॅल्टी, ऑटो, मेटल, पीएसयू बॅंक समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. इतर सर्व क्षेत्रातील विक्रीमुळेही बाजारावर दबाव राहिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सुमारे 3% ची कमजोरी दिसून आली. दुसरीकडे, रुपया 56 पैशांनी कमजोर झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81.55 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.

शुक्रवारी अमेरिकेचे बाजार अडीच टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. डाऊ जवळपास 500 अंकांनी घसरून 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. आशियाई बाजारावरही दबाव आहे. जवळपास सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत. Dow Jones, Nasdaq आणि S&P 1.6%, 1.8% आणि 1.7% घसरत बंद झाले.

हर्षा इंजिनियर्स 34.55% वर सूचीबद्ध

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्सने घसरणीच्या बाजारामध्ये जोरदार सुरुवात केली. बीएसईवर हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 444 रुपये प्रति शेअरने उघडले. हे 34.55% आहे किंवा 330 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 114 रुपये प्रीमियम आहे.

IPO 74.70 पट सबस्क्राइब झाला. रिटेल सेगमेंट 17.6 पट, NII कोटा 71.3 पट आणि QIB 178.26 पट सबस्क्राइब झाला. हर्षा इंजिनियर्सचा आयपीओ १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान खुला होता. शेअरने 484.90 रुपयांचा उच्चांक गाठला.

तीन दिवसांत 6.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान
गेल्या आठवड्यातील शेवटचे तीन दिवस बाजार घसरणीसह बंद झाले. एक्सचेंज डेटानुसार, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 276.6 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. म्हणजेच तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे 6.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

तज्ज्ञ म्हणाले- स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक आर्थिक धोरणामुळे जागतिक वाढीची इंजिने मंदावली आहेत. तथापि, भारत सध्या पत वाढ आणि कर संकलनात वाढीसह चांगल्या स्थितीत आहे. गुंतवणूकदारांनी काही स्थिरता येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केली जात आहे.