आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर जी-२० परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जी २० परिषदेचे सन २०२३ चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत १२ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. रात्री दिव्यांच्या प्रकाशात मरीन ड्राइव्ह परिसर उजळून निघतो. या भागात जी-२० परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींचे मुंबईत स्वागत आहे, अशा आशयाचे फलक दिसून येत आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम', ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या आशयाचे घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत. या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा गुंफा, फ्लोरा फाऊंटन, हॉटेल ताज, वांद्रे-वरळी सी लिंक, वारली चित्रशैलीची छायाचित्रे रंगसंगतीत दिसून येत आहेत. याशिवाय लोकशाहीची मातृभूमी असलेला देश आहे, जी २० परिषदेचा यजमान देश, मोठी जबाबदारी, मोठी महत्त्वाकांक्षा अशी घोषवाक्येही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.