आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संसदेत सोमवारी वित्त वर्ष २०२१-२२ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारातील उसळीचा कल बुधवारपर्यंत सुरू राहिला. या तीन दिवसांत बीएसईच्या सेन्सेक्सने ३,९६९.९८ अंकांची(८.५८%) जोरदार वाढ घेतली. यादरम्यान एनएसईच्या निफ्टीतही १,१५५.३५ अंकांची(८.४७%) उसळी घेतली. सेन्सेक्स प्रथमच ५० हजारांवर बंद झाला आणि बीएसईवर एफएमसीजी आणि रिअॅल्टी निर्देशांकाशिवाय सर्व क्षेत्रांतील शेअर्समध्ये तेजी राहिली. सरकारी बँक आणि फार्मा निर्देशांकाने अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ दिली. खासगी बँक आणि धातू निर्देशांक पावणेदोन टक्के वधारले. दुसरीकडे, रिअॅल्टी इंडेक्समध्ये ०.५ टक्के घसरण आली. विश्लेषकांनुसार, भारतीय बाजारातील सध्याच्या तेजीमागचे सर्वात मोठे कारण, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा(एफपीआय) पैसा आहे.
सेन्सेक्सने आठ सत्रे केली प्रतीक्षा
सरकारी कंपन्यांकडे अडकलेले भांडवल बाजारात
सरकारने स्पष्ट केले की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे अडकलेले सुमारे ७.५-८ लाख कोटी रुपयांच्या भांडवलात एक मोठा वाटा हळूहळू बाजारात येईल. या दीर्घ अवधीत बाजाराला सपोर्ट मिळेल.
- प्रकाश दिवाण, विश्लेषक, अल्टामाउंट कॅपिटल यूके
सलग तेजीची कारणे
बीएसईची स्थिती
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.