आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरुवारची म्हणजे 8 डिसेंबरची संध्याकाळची वेळ. गुजरात निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले होते. सर्व विक्रम मोडीत काढत भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला केवळ 5 जागांवरच मर्यादीत राहावे लागल्याचे दिसत होते. निराशाजनक निकालादरम्यान, अरविंद केजरीवाल कॅमेरासमोर आले आणि आनंद व्यक्त करू लागले.
तुमचा आम आदमी पक्ष आज राष्ट्रीय पक्ष झाला आहे. गुजरातच्या जनतेने आम्हाला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. देशातील मोजक्याच पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, आम आदमी पक्षाने अवघ्या 10 वर्षात हे यश मिळवले आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण या संदर्भात तीन प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेणार आहोत...
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी, कोणत्याही राजकीय पक्षाला खालील 3 पॅरामीटर्सपैकी कोणतेही एक पूर्ण करणे आवश्यक आहे…
गुजरात निवडणुकीत AAP राष्ट्रीय पक्ष कसा बनला?
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी 'आप'ची सर्वात सोपी अट होती ती म्हणजे चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत AAP ला एकूण 53% मते मिळाली. 2022 च्या पंजाब विधानसभेत 42% मते आणि गोवा विधानसभा निवडणुकीत 6.77% मते.
आता गुजरात निवडणुकीत AAP ला किमान 6% मते आणि 2 विधानसभा जागांची गरज होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत AAP ने एकूण 13% मते आणि 5 जागा मिळवल्या. त्यामुळे 'आप'चा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अरविंद केजरीवाल यांना एवढा आनंद देणार्या राष्ट्रीय पक्षाला काय मिळते?
राजकीय पक्ष म्हणजे काय आणि भारतात किती प्रकारचे पक्ष आहेत?
राजकीय पक्ष हा समान विचारधारा आणि राजकीय दृष्टिकोनावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा एकत्रित गट असतो. राजकीय पक्ष निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतात, त्यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला करतात आणि मग त्यांच्या विचारसरणीनुसार कामे करण्याचा प्रयत्न करतात.
भारतातील राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. भारतात कोणीही निवडणूक लढवू शकतो आणि स्वतःचा राजकीय पक्ष बनवू शकतो. भारतात एकूण 2858 राजकीय पक्ष आहेत. राजकीय पक्षांच्या 3 श्रेणी आहेत...
मान्यता नसलेला पक्ष: ज्यांना निवडणूक आयोगाची मान्यता नाही. भारतात असे जवळपास 2796 पक्ष आहेत.
प्रादेशिक पक्ष : ज्यांना निवडणूक आयोगाकडून राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. भारतात असे 59 पक्ष आहेत.
राष्ट्रीय पक्ष: ज्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. भारतात असे आठ पक्ष आहेत.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आणखी बातम्या वाचा...
गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेणार 'AAP':12% मते मिळवली, त्यामुळे काँग्रेसला 32 वर्षांतील कमी जागा
घटना 27 नोव्हेंबर 2022 ची आहे. खचाखच भरलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी एका कागदावर लिहिले - गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. बरोबर 12 दिवसांनंतर गुरुवारी जेव्हा ईव्हीएममध्ये जमा झालेल्या मतांची मोजणी झाली तेव्हा त्यांच्या पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. असे असूनही 'आप' आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा मुद्दा चुकीचा ठरल्याचे प्रथमदर्शनी दिसते, पण हे गणितही तितकेसे सोपे नाही. झाडूला मतदान करणाऱ्या गुजरातींची संख्या 0.62% वरून 12.9% झाली आहे. गुजरातमधील एकूण 182 जागांपैकी आम आदमी पार्टी 35 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिंकलेल्या जागा आणि दुसरा क्रमांक एकत्र केल्यास ही संख्या 40 होईल. म्हणजेच गुजरातमधील विधानसभेच्या 22% जागी 'आप'ने आपली छाप सोडली आहे. पूर्ण बातमी वाचा...
20 वर्षांनंतरही गुजरात दंगल मोठा फॅक्टर:बिल्किसच्या गुन्हेगारांना सोडवणारा विजयी, दंगलीच्या गुन्हेगाराची मुलगीही नंबर-1
गुजरात निवडणुकीदरम्यान भाजपने असे अनेक निर्णय घेतले, ज्यात 2002 ची दंगल मोठा फॅक्टर ठरली. आपण त्यापैकी 4 मोठे निर्णय जाणून घेणार आहोत. पूर्ण बातमी वाचा....
भाजपसाठी का कमी होत नाही गुजरातींचे 'प्रेम':भाजपच्या विजयामागील 5 मुद्यांचे विश्लेषण; इथे ‘रेवडी’ नव्हे तर फक्त ‘मोदी-मॅजिक’
पुन्हा एकदा गुजरातच्या जनतेने सलग सातव्यांदा भाजपवर विश्वास टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये सलग सात वेळा डावे सरकार निवडून येण्याच्या विक्रमाची देखील ही बरोबरी आहे. गुजराती भाजपला मतदान करणार नाहीत, असे वातावरण यावेळी निर्माण करण्यात आले होते. कोरोना, महागाई, बेरोजगारी, मोरबी अशा आरोपांची ही यादी खूप मोठी होती, पण हे गुजरातचे लोक आहेत. हे लोक इतरांप्रमाणे विचार करत नाहीत. यावेळी सरासरी मतदान 2017 पेक्षा कमी होते. मोजक्या मतदारांमधून बाहेर पडलेल्या लोकांनी अनिच्छेने भाजपला मतदान केले, असे का झाले? वाचा पूर्ण बातमी....
मोदी vs राहुल सामना टाळण्याची रणनीती उलटली:2017 मध्ये 30 सभा, 12 मंदिरांना भेटी, काँग्रेसने 77 जागा जिंकल्या; यंदा 17 वर मर्यादित
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून कायम सत्तेत असलेल्या भाजपचे 'अंगद पाय' यंदा पुन्हा कोणीही हलवू शकले नाही. भाजपने 156 जागा जिंकून सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी मॅरेथॉन सभा घेतल्या, मोठे रोड शो केले. निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला होता. पण राहुल गांधींनी फक्त 2 सभा घेतल्या.
गुजरातमधील राहुल गांधींबाबत काँग्रेसची निवडणूक रणनीती काय होती, ती कशी अयशस्वी ठरली आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसचे काय नुकसान होऊ शकते, हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत. वाचा पूर्ण बातमी....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.