आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राजकीय जादूगार मानले जातात. राजकारणात येण्यापूर्वी ते वडिलांसोबत जादू दाखवायचे. सध्या राजकीय वर्तुळात त्यांची जादू पुन्हा एकदा चर्चेत आहे. सचिन पायलट त्याचा बळी ठरला आहे. पायलट यांना गेहलोत यांनी आपल्या जादूने यापूर्वीही दोनदा परभूत केले होते.
वास्तविक गेहलोत यांनी दिल्लीतील हायकमांडने जी जबाबदारी दिली ती आपण सांभाळू असे म्हटले होते, मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच खिचडी शिजत होती. गेहलोत गटाच्या आमदारांनी 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. एवढेच नाही तर पायलट यांच्या निषेधार्थ गेहलोत गटाच्या 80 आमदारांनी राजीनामे देखील दिले आहेत.
या घटनेला गेहलोत यांच्या ‘राजकीय जादू’शी जोडले जात आहे. गेहलोत यांना रोखणे हायकमांडसाठी देखील सोपे नसल्याचे बोलले जात आहे.
आज दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आम्ही गेहलोत यांच्या राजकीय जादूच्या 4 कथा सांगणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी विरोधकांचा पराभव केला…
घटना पहिली: पायलटच्या बंडाची आधीच कल्पना मिळाली
ही घटना 11 जुलै 2020 रोजीची आहे. काँग्रेसचे नाराज नेते सचिन पायलट 18 आमदारांसह हरियाणातील एका हॉटेलमध्ये गेले. 12 जुलै रोजी राजस्थानमधील गेहलोत सरकार अल्पमतात आल्याची बातमी पसरली. दरम्यान, पायलटच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मॅसेजमध्ये असा दावा करण्यात आला की, आमच्याकडे काँग्रेसचे 30 आमदार आणि 3 अपक्ष आहेत.
मग काय, मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरू झाली.
वास्तविक फेब्रुवारीमध्ये आणि पुन्हा मार्च 2020 च्या सुरुवातीला, राजस्थानच्या गुप्तचर विभागाने गेहलोत यांना सरकारविरोधात कट रचण्याची सूचना आधची दिली होती. काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपशी संपर्क साधल्याचे बोलले जात होते.
गेहलोत लगेच सक्रिय झाले. सरकार वाचवण्याचा कृती आराखडा तयार केला. पायलट गटातील मंत्री आणि आमदारांवर नजर ठेवण्यात आली होती. इंटेलिजन्सने 11 जून 2020 रोजी बंडखोरीचा इशाराही जारी केला. ही तारीख खास आहे, कारण सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची ती पुण्यतिथी होती.
19 जून 2020 रोजी राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणुका होणार होत्या. बंडखोरीचे वारे अजूनही वाहत होते. याची जाणीव होती त्यामुळे गेहलोत यांनी 10 जून 2020 रोजी सर्व आमदारांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले. तेथून विधानसभा आमदारांना 5 बसमध्ये बसवून 2 हॉटेलमध्ये नेण्यात आले.
रात्री उशिरा, गेहलोत यांनी दावा केला की, मध्य प्रदेशप्रमाणे भाजपला राजस्थानमध्ये घोडे-बाजार घडवून सरकार पाडायचे आहे. आमदारांना 25-25 कोटी रुपये दिले जात आहेत. यानंतर काही दिवस आरोप-प्रत्यारोप सुरूच होते.
11 जुलै रोजी सचिन पायलट 18 आमदारांना घेऊन हरियाणातील मानेसर येथील एका रिसॉर्टमध्ये गेले. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा हे होते. सरकारला याची माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात आली. पायलट समर्थक 3 आमदार दानिश अबरार, रोहित बोहरा आणि चेतन दुडी मानेसरला रवाना झाले, मात्र कडक नाकाबंदीमुळे त्यांना परतावे लागले.
15 जुलै 2020 रोजी 3 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची चर्चा होती. क्लिपमधील आवाज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह आणि आमदार भंवरलाल शर्मा यांचा असल्याचा आरोप करण्यात आला होता.
गेहलोत यांचे निकटवर्तीय महेश जोशी यांनी 17 जुलै 2020 रोजी SOG आणि ACB मध्ये व्हायरल क्लिपिंग्जच्या आधारे गुन्हा दाखल केला. SOG च्या वतीने कलम 124-A, देशद्रोह आणि कलम 120-B IPC अंतर्गत पायलट यांना साक्ष देण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. गेहलोत यांनाही अशीच नोटीस बजावण्यात आली होती. म्हणजेच गेहलोत सचिन पायलटवर कायदेशीर पेचही घट्ट करत होते.
गेहलोत यांनी आता हायकमांडला विश्वासात घेत पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेस अध्यक्षपदावरून काढून टाकले. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीना यांनाही मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या गटातून लगेचच तत्कालीन शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष बनवले.
गेहलोत यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पायलट गटही सभागृहात सरकारच्या बाजूने उभा असल्याचे दिसून आले. कारण पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याने विधिमंडळात जाण्याचा धोका होता. म्हणजे गेहलोत यांनी आपल्या जादूने इथेही पायलट यांच्यावर मात केली आणि सरकार वाचवले.
घटना दुसरी : बंडखोरांची 2 मते बाद झाली आणि अहमद पटेल राज्यसभेवर गेले
दिनांक 9 ऑगस्ट 2017, दिवस मंगळवार आणि ठिकाण गुजरात विधानसभा. गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी एका तासाच्या आत मतदानाला सुरुवात झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते शंकर सिंह वाघेला म्हणाले - मीही माझे मत अहमद पटेल यांना दिले नाही. त्यांना 40 मतेही मिळणार नाहीत.
अहमद पटेल यांना काँग्रेसच्या एकूण 51 आमदारांपैकी 45 आमदारांचा पाठिंबा होता. त्यांना विजयासाठी 176 पैकी 45 आमदारांच्या मतांची गरज होती. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या 6 आमदारांनी शंकरसिंह वाघेला यांच्यासोबत बंड केले. यातील 3 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दुसरीकडे, अमित शहा, स्मृती इराणी आणि काँग्रेसचे एक बंडखोर आमदार बलवंत सिंह राजपूत हे भाजपकडून 3 जागांवर रिंगणात होते. अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपने बंड केले
दुसरीकडे, अमित शहा, स्मृती इराणी आणि काँग्रेसचे एक बंडखोर आमदार बलवंत सिंह राजपूत हे भाजपकडून 3 जागांवर रिंगणात होते. अहमद पटेल यांच्या विरोधात भाजपने बलवंत सिंग यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये अमित शहा आणि स्मृती इराणी यांचा विजय निश्चित होता.
किंबहुना, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने अहमद पटेल यांना राज्यसभेत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी भाजपने तिसऱ्या जागेसाठी आपला उमेदवार उभा केला होता. दरम्यान, काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करणार असल्याची बातमी पसरली. राघवभाई पटेल आणि भोलाभाई गोहिल अशी त्यांची नावे होती.
अशा स्थितीत अहमद पटेल यांच्यासमोर विजयाचे दोनच मार्ग होते. पहिला- त्यांना इतर ठिकाणाहून दोन मते मिळवावी लागणार होती किंवा जिंकण्यासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा कमी करावा लागणार होता.
राजस्थानचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक गेहलोत यांची जादू इथूनच सुरू झाली. या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने त्यांना गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.
काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी भाजपच्या समर्थनार्थ क्रॉस व्होट केले, पण मतदान केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतपत्रिका भाजपच्या पोलिंग एजंटला दाखवल्या. तर नियमांनुसार ते फक्त काँग्रेस पोलिंग एजंटलाच आपले मत दाखवू शकत होते.
अखेर काँग्रेसच्या आवाहनावर निवडणूक आयोगाने मध्यरात्री निकाल देत राघवभाई पटेल आणि भोलाभाई गोहिल या दोन्ही बंडखोर आमदारांची मते रद्द केली. त्यामुळे एकूण मतांची संख्या 176 वरून 174 वर आली. यामागेही गेहलोत यांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
म्हणजे अहमद पटेल यांना विजयासाठी 45 ऐवजी 44 मतांची गरज होती. नेमक्या संख्येत त्यांना आता 43.51 मतांची गरज होती.
त्याचवेळी जनता दल युनायटेडचे आमदार छोटू भाई वसावा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी एकाने अहमद पटेल यांना मतदान केले. अशाप्रकारे, त्यांना काँग्रेसचे 43 आमदार मिळाले आणि राष्ट्रवादी किंवा जेडीयूचे अतिरिक्त मत, त्यांना विजयासाठी आवश्यक 44 मते मिळाली.
पूर्ण ताकद लावूनही भाजप सोनिया गांधींच्या राजकीय सल्लागारांना राज्यसभेत पोहोचण्यापासून रोखू शकली नाही. या विजयामुळे अशोक गेहलोत यांच्यासह अहमद पटेल यांनी काँग्रेसच्या चाणक्य नेत्यांमध्ये पुन्हा स्थान बळकट केले.
घटना तिसरी : गुजरात निवडणुकीत काँग्रेसला ठरवले दावेदार
ही घटना 2017 सालची आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांना काँग्रेस पक्षाने प्रभारी बनवले होते. गेहलोत यांनी जबाबदारी मिळताच पक्ष मजबूत करण्यासाठी 5 मोठी पावले उचलली.
पहिला : लोकांमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा
दुसरा : मुख्यमंत्र्यांचा सर्वोत्तम चेहरा
तिसरा : लोकांना भाजपबद्दल काय वाटतं?
अशोक गेहलोत यांना गुजरातमध्ये स्वातंत्र्य देण्याचा काँग्रेसला असा फायदा झाला की, 150 हून अधिक मतदार संघात विजयाची घोषणा देणारा भाजप दोन दशकांत प्रथमच सर्वात कमकुवत स्थितीत आला. शेवटच्या क्षणी गेहलोत यांचे मिशन गुजरात हाणून पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदारी स्वीकारावी लागली. यानंतर भाजप सरकारला वाचवता आले.
त्यानंतर भाजपला विधानसभेच्या केवळ 99 जागा मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेसने 2012 च्या तुलनेत 16 जागांवर आघाडी घेत 77 जागा जिंकल्या. त्यामुळेच 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने गेहलोत यांना वरिष्ठ निरीक्षक बनवले आहे.
घटना चौथी : विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पायलट यांचा दावा फोल
सप्टेंबर 2018 मध्ये काँग्रेस पक्षाने राजस्थानमध्ये संकल्प रॅली सुरू केली. या रॅलीचे नेतृत्व राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केले होते. यात्रा करौलीला पोहोचली तेव्हा सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी एकाच दुचाकीवरून परिसराचा दौरा केला. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
त्याचा परिणाम असा झाला की, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 200 पैकी 100 जागा जिंकल्या. यापूर्वी 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांची मुख्यमंत्री होण्याची पाळी होती. यावेळीही अशोक गेहलोत यांनी असे 3 निर्णय घेतले, ज्यामुळे ते मुख्यमंत्री झाले.
क्रिकेटचे गोंधळात टाकणारे 10 नियम:बॉल मैदानावरील कॅमेऱ्याला किंवा अंपायरला लागला तर काय होते?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.