आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टबागेश्वर बाबांच्या चमत्कारांचे गणित:चिठ्ठ्यांच्या ढिगाऱ्यातून निवडतात 50 नावे; पत्ता, मोबाईल नंबरमुळे माहिती मिळवणे सोपे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदू… शेकडो मुलांच्या पालकांना त्याच्याकडे पाहून आशा लागते. आपल्या मुलांच्या जिवासाठी लांबून बागेश्वर धामला आलेले आई-वडील बघतात की, आपले मूलही इथल्या चमत्कारातून चंदूसारखे चालायला, बोलायला लागेल. लहानपणापासून बोलता किंवा चालता न येणारा चंदू इथे आल्यावर त्याला चालता-बोलता यायला लागले. अशी प्रसिद्धी धाममध्ये करण्यात आली आहे.

सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही चंदूशी बोललो. प्रत्यक्षात चंदू अजूनही नीट बोलू शकत नाही. तो फक्त बाबांच्या नावाच्या घोषणा करू शकत होता. तो कुठे राहतो, त्याला कोणी आणि कधी बागेश्वर धाम येथे आणले याचे उत्तर देता आले नाही. बागेश्वर धामचे लोक सांगतात - घरातील लोक इथून निघून गेले होते.

बागेश्वर धामचे सत्य चंदूच्या कथेसारखे आहे. धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या चमत्काराची सध्या देशभर चर्चा होत आहे. ते भक्तांचे मन जाणतात असा दावा केला जातो. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दरबारात होत असलेल्या कृतीला फसवणूक असल्याचे सांगून आव्हान दिले होते. चमत्कार पाहण्यासाठी आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी; चमत्कार, युक्ती किंवा फसवणूक या दाव्याचे विज्ञान आणि गणित समजून घेण्यासाठी दिव्य मराठी नेटवर्कच्या टीमने बागेश्वर धाम आणि आसपास 7 दिवस मुक्काम केला.

डॉक्टर आणि रुग्णालयांला कंटाळलेले लोक शेवटची आशा म्हणून येथे पोहोचले

छतरपूर रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या 10 पैकी प्रत्येक 8वी व्यक्ती बागेश्वर धामला जात आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेशपासून सायबर सिटी हैदराबादपर्यंतचे सुशिक्षित तरुणही येथे पोहोचले. श्रद्धेवर एवढा भरवसा आहे की, तर्कावर बोलणे कमी होते. महामार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बागेश्वर धामच्या गढा गावात जाताना काही जण रांगत तर काही लोटांगण घालत जातांना दिसतात. बागेश्वर सरकारकडे गाऱ्हाणे मांडायचे आहे, असा एकच सूर त्यांनी लावलेला दिसतो.

डॉक्टर आणि रुग्णालयात चकरा मारुन हार पत्करलेले लोक आपली शेवटची आशा घेऊन येथे पोहोचत आहेत. कोणाच्या मुलाला बोलता येत नाही तर कोणाच्या मुलाला डॉक्टरांनी सांगितले आहे की, आता फक्त देवच त्याला वाचवू शकतो.

पंडित धीरेंद्र शास्त्री यांना खरंच सगळं माहीत आहे का...

असे नाही की पं. धीरेंद्र शास्त्री हे अंतर्ज्ञानी आहेत आणि त्यांना प्रत्येकाच्या मनातील सर्व काही माहित आहे. तसे असते तर त्यांनाही कळले असते की, काही पत्रकार धाममध्ये बातम्या करायला आले आहेत? आम्ही कोणती बातमी करायला आलो आहोत? याआधीही आम्ही बागेश्वर धामने तलावाच्या आसपास आणि मारघाट जमिनींवर कब्जा केल्याबद्दल बातमी केली आहे.

येथील स्मशानभूमी धामसाठी बंद करण्यात आली असून तलावावर हळूहळू कब्जा होत असल्याचेही आम्ही लिहिले आहे. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत धीरेंद्र शास्त्री यांना याची माहिती नव्हती.

आता बागेश्वर धाममध्ये अर्ज कसा केला जातो ते समजून घ्या

अर्ज करण्यासाठी, तुमच्या समस्येनुसार, तुम्हाला बागेश्वर धाममध्ये लाल, पिवळ्या, पांढर्‍या आणि काळ्या कपड्यात गुंडाळलेला नारळ बांधावा लागेल. लाल रंग म्हणजे त्रास, काळा भुताची बाधा, लग्नासाठी पिवळा आणि पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला नारळ म्हणजे अपत्य सुखासाठी. तुमच्या समस्यांसाठी हे रंग कोड आहेत. बागेश्वर धाम येथील हनुमानजींच्या दरबारात त्यासाठी हजेरी लावावी लागेल. तसेच त्या नारळात गुंडाळलेले कापड मंदिरात कुठेतरी बांधावे लागते.

नाव, पत्ता, मोबाईल नंबर सर्व स्लिपमध्ये, कोणाला कॉल करायचा ते ठरवतात, मग चमत्कार कसा?

सर्वप्रथम, हे समजून घ्यावे लागेल की दरबारात बाबांसमोर फक्त तोच भक्त पोहोचतो, ज्याचा तारीख निश्चित आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तारीख म्हणजे काय? होय... बागेश्वर सरकारच्या दरबारात किंवा न्यायालयात हजर राहणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही आणि मी सोशल मीडियावर किंवा टीव्ही चॅनेल्सवर जे लाइव्ह अपडेट्स पाहतो ते याच दरबारातील असतात.

जर तुम्हाला दरबारात हजर व्हायचे असेल तर ते तुमच्या स्वतःच्या इच्छेने राहतात येत नाही. आधी येथे स्लिप फाडली जाते. धामच्या काउंटरवरून स्लिप तयार केली जाते. स्लिप बनवण्यासाठी तुम्हाला नाव, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा लागेल. या स्लिप्स नंतर गोणीत जमा केल्या जातात. यातील 50 स्लिप लॉटरीमधून काढल्या जात असल्याचा दावा धामचे लोक करतात.

ज्यांच्या नावाची स्पीप निघते, त्यांना फोन करून बोलावले जाते. नियोजित तारखेला यावे लागेल. त्यानंतर त्याच काउंटरवर आधार कार्ड दाखवून टोकन दिले जाते. ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांना हजर होण्याची तारीख मिळते. तारीख टोकनमध्येच लिहिलेली असते. महाराज मंगळवार आणि शनिवारी 50 लोकांना हजर राहण्यासाठी बोलावतात.

भाविकांची संपूर्ण माहिती आधीच धामच्या कार्यकर्त्यांकडे असल्याने. ते त्यांना फोनवर बोलतात. अशा स्थितीत जनतेची प्राथमिक माहिती धामच्या लोकांकडे आहे हे निश्चित. मग सोशल मीडियाच्या या जमान्यात माहिती मिळवणे फार मोठे काम नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्या म्हणण्यानुसार, बाबा फक्त निवडक लोकांच्या स्लिप्स घेतात. म्हणजेच ज्यांच्याबद्दल त्यांना सांगायचे आहे त्यांचीच स्लिप ते स्वीकारतात.

दिव्य दरबारात तर कोणीही येते, मग महाराजांना तिथल्या लोकांच्या मनातील गोष्ट कशी कळते…?

दिव्य दरबार म्हणजे जिथे महाराजांची कथा होते, त्या काळात ते दरबार भरवतात. असा दावा केला जातो की, येथे ते कोणालाही बोलावतात आणि त्यांच्या मनातील पूर्ण इच्छा एका कागदावर लिहितात. येथे टोकन प्रणाली नाही.

कथेनंतर नागपूर आणि रायपूर येथे दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. इथे श्याम मानव यांनी केलेले स्पष्टीकरण लक्ष्यात घ्या. पत्रकार ज्ञानेंद्र तिवारी, ज्यांना बाबांनी रायपूरमध्ये बोलावले होते, त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव, भावाचे नाव आणि भाचीचे नावही सांगितले. यासोबतच त्यांच्या भावाने नुकतेच घर बांधले असून, त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच पूजा करण्यात आली असल्याचेही सांगितले.

वास्तविक, ही संपूर्ण माहिती ज्ञानेंद्र तिवारी यांच्या फेसबुक अकाउंटवर अपलोड करण्यात आली होती. तार्किक बोलणार्‍यांची बाजू अशी की, महाराजांनी पत्रकाराला त्यांच्या फेसबुकवर जे होते तेच सांगितले.

दुसऱ्याच दिवशी महाराजांनी पत्रकारांना कोणत्याही व्यक्तीला पुढे आणण्यास सांगितले. पत्रकारांनी लोकांना बोलावले आणि महाराजांनीही त्यांच्याबद्दलची योग्य माहिती सांगितली. यासोबतच येणार्‍या व्यक्तीबाबतचे पत्रक आधीच तयार असल्याचा दावाही करण्यात आला. श्याम मानव आणि जादूगार सुहानी शहा याला युक्ती म्हणतात. श्याम मानव याला कर्ण पिशाचिनी विद्या म्हणतात. ही विद्या त्यांनाही माहीत असल्याचे ते सांगतात. ही एक युक्ती आहे, चमत्कार नाही.

भक्त म्हणतात - दिलासा मिळला; पण चमत्कारासारखे काही घडले नाही

मंगळवार, 31 जानेवारी रोजी आयोजित दरबारात आम्ही उपस्थित होतो. अनेक भक्तांशी बोललो. पन्ना जिल्ह्यातील पवई येथून आलेले रामचंद सांगतात की, 16 वेळा दरबारात हजेरी लावली आहे. आम्ही विचारले की, त्यांचा प्रश्न सुटला का? ते म्हणाले एका रुपयात चार आणे शिल्लक आहे, बाकीचे झाले असे उत्तर मिळाले. चिठ्ठी दाखवली तेव्हा लिहिलेले होते, भुते-बाधा झाली आहे.

दमोहच्या हटा येथून आलेले रामबिसाय अग्रवाल म्हणतात की, 14 व्या वेळी तारखेवर आले आहेत. गुडघेदुखी आणि मुलाच्या लग्नासाठी अर्ज केला होता. आम्ही विचारले आतापर्यंत किती निराकरण झाले? म्हणाले- गुडघेदुखीत थोडा आराम आहे, पण मुलाचे लग्न अजून ठरलेले नाही.

गुणा येथील मनीष लोढा चौथ्या तारखेला आले होते. ते सांगतात की, पूर्वी ते खूप नशा करायचे. महाराजांकडे पोचल्यावर हळूहळू नशा कमी कराल, असे लिहिले. आता दारू पिणे सोडले आहे.

दरबारात आल्याने दिलासा मिळाल्याचे भाविक सांगतात. त्यांच्यासोबत असा कोणताही दैवी चमत्कार घडला नसला तरी. त्यांच्या समस्या अगदी सामान्य होत्या.

भूत-बाधांची प्रकरणे

दरबार सुरू होण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण सुरू होताच काही महिला झुलायला लागल्या. त्यांच्या शरीरात भूत-बाधा असल्याचे सांगण्यात आले. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी सेनापतींना उपचार करण्यास सांगितले. असामान्य वागणाऱ्या महिला काही वेळाने शांत झाल्या.

गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ येथील मानसोपचार विभागाचे एचओडी प्रा. जेपी अग्रवाल म्हणतात की, मनात अनेक पदर असतात. बेशुद्ध, अवचेतन आणि जाणीव. जसा समुद्र बाहेरून शांत दिसतो, पण कधी कधी सुनामी येते. त्याचप्रमाणे सुप्त मनात विचार येत राहतात. लोक याला भुताटकी मानू लागतात. सामान्यत: मानसिक रुग्णांची समस्या अशी असते की कुटुंबाला उपचार घ्यायचे नसतात. ते बाबांसोबत त्यांची भीती घालवतात.

माझे मामा त्यांचे भक्त होते, फोनवर म्हणाले - तुम्ही बरे व्हाल, दुसऱ्या दिवशी वारले

राजनगर खजुराहो येथील प्रख्यात डॉ.राघव पाठक हे धीरेंद्र शास्त्री यांचे म्हणणे सुरुवातीपासून तर्कसंगत मानत नाहीत. शास्त्रींच्या कथित चमत्कारांना ते ढोंगीपणा म्हणतात. खजुराहोपासून 3 किमी अंतरावर असलेल्या राजनगर येथील त्यांच्या घरी आम्ही त्यांची भेट घेतली.

डॉ. राघव म्हणतात- धीरेंद्रच्या ढोंगीपणामुळे त्यांच्या मामाचा जीव गेला. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना एक आमदार छतरपूरमध्ये रामकथेचे आयोजन करत होता. त्यात गर्दी होत होती. माझे मामाही त्या गर्दीचा एक भाग होते. त्याच गर्दीत काकांना संसर्ग झाला आणि नंतर त्यांचा जीव गेला.

मृत्यूच्या एक दिवस आधी मामाला धीरेंद्र शास्त्री यांचा फोन आला होता की, त्यांना काही होणार नाही, ते लवकर बरे होतील, पण दुसऱ्याच दिवशी मामाचे निधन झाले. मामामुळे मला आणि माझ्या कुटुंबालाही संसर्ग झाला, आम्ही मोठ्या कष्टाने आमचे प्राण वाचवू शकलो. डॉ. राघव म्हणतात की, धीरेंद्रच्या बोलण्यात चमत्कार असता तर माझ्या मामाचा मृत्यू झाला नसता.

भाजपचे माजी आमदार आरडी प्रजापती म्हणतात की, 'बाबा जेव्हा चमत्काराने सर्व काही बरे करण्याचा दावा करतात, तेव्हा कॅन्सर हॉस्पिटलची गरजच काय? खरे तर रुग्णालयाच्या नावाखाली काळा पैसा पांढरा करण्याचा उपक्रम तयार केला जात आहे.’

शहडोलच्या भगवती मानव कल्याण संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मंजू द्विवेदी म्हणतात, '21 व्या शतकात अशा चमत्कारांबद्दल बोलणे हे ढोंगीपणापेक्षा कमी नाही. धर्मावर श्रद्धा असणे ठीक आहे, पण दिखावा करणे ठीक नाही.

एप्रिल 2020 मध्ये, छतरपूर शहरातील धीरेंद्र शास्त्री यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या रामकथेचे आयोजक काँग्रेस आमदार आलोक चतुर्वेदी यांचे वेगळे मत आहे. ते म्हणतात, 'बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींमध्ये काही आध्यात्मिक साधना किंवा सिद्धी आहे. दूरदूरवरून लोक येत आहेत, त्यांचा लाभ होत आहे.

राजनगर बसस्थानकाजवळ भेटलेल्या सरकारी कर्मचाऱ्याने 'चमत्काराची चर्चा चुकीची आहे', असे म्हटले आहे. सर्व त्यांचेच लोक आहेत जे भूत असल्याचा आव आणतात. त्याचीच माणसे फिरत असतात.

विश्वास आणि तर्काच्या या भूलभुलैयाशिवाय उत्तराखंडमधील दोन तरुणींनी सांगितले की त्यांचा धीरेंद्र शास्त्रींवर नव्हे तर बागेश्वर धामवर विश्वास आहे. खूप दिवसांपासून सोशल मीडियावर बागेश्वर धामचे चमत्कार ऐकत होती. एकदा दर्शन घेतले पाहिजे असे वाटले म्हणून ती इथे आली आहे.

असे प्रश्न ज्यांची पूर्ण उत्तरे आम्हाला सापडली नाहीत

  • चंदू पूर्णपणे बरा झाला नाही, ते दिसत आहे, पण त्याला आधी चालता-बोलता येत नव्हते, असा दावा धामच्या लोकांनी केला आहे. यापूर्वी चंदूला चालता किंवा बोलता येत नव्हते याचा कोणताही पुरावा नाही.
  • भूत बाधा अडथळा दूर करताना बाबा ज्याला मारहाण करण्याचा आदेश देतात त्या सैन्याचे आणि सेनापतीचे रहस्य आम्ही शोधू शकलो नाही. त्याचे कारण असे की ज्या महिलांना बाधा झाली असे म्हणतात त्यांच्याशी बोलण्यास मनाई आहे. ना ती बोलते ना तिचे घरचे. आम्ही अशा काही लोकांचे व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला असता, सेवेदारांनी त्याला ठाम नकार दिला.
  • बहुतेक लोक म्हणतात की बाबा स्लिपवर त्यांच्या मनातील इच्छा आधीच लिहितात, परंतु ते स्लिप दाखवायला तयार नाहीत. बाबांनी स्लिप दाखवण्यास मनाई केल्याचे सांगितले जाते. स्लिपमधील सर्व मजकूर योग्य असल्याचे आम्ही निर्णायकपणे सिद्ध करू शकलो नाही.
  • एखाद्याचे मन वाचणे याला बाबा चमत्कार म्हणतात, ते वारंवार आग्रह करतात की बघा, त्यांची अडचण आम्हाला आधीच समजली आहे. मग समोरची व्यक्ती आपल्याला मान्य करायला लावते. प्रत्येक वेळी ते पूर्णपणे खरे नसले तरी खुल्या व्यासपीठावर ते सांगण्यास भाविक कचरतात.
  • ज्यांना बाबांच्या दरबारात येऊन पूर्ण लाभ मिळत नाही, त्यांची श्रद्धा कमकुवत झाली असावी, असे सांगितले जाते. आम्ही अनेक लोकांना भेटलो ज्यांनी 15 वेळा दरबारात हजेरी लावली आहे, परंतु अद्याप समस्या सुटलेली नाही. 100% चमत्कारिक उपाय, आम्हाला असे प्रमाणित लोक सापडले नाहीत.

दिव्य मराठी नेटवर्कच्या टीमने सामान्य भक्तांप्रमाणे बागेश्वर धाममध्ये 7 दिवस घालवले… सत्य जवळून पाहण्यासाठी

26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा आठवडाभर आम्ही बागेश्वर धाममध्ये आणि आसपास राहिलो. बाबांच्या भक्तांशी बोलणे किंवा बाबांच्या चमत्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे देखील गोंधळाचे वातावरण निर्माण करू शकते. चमत्कार आणि युक्त्यांचं हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आम्ही नागपूर समितीसोबत 3 दिवस घालवले. दैवी दरबारातील गुपितांना ते कशाच्या आधारे युक्ती म्हणतात हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला.

होय.. बागेश्वर धामला आल्यानंतर आम्ही पत्रकार आहोत हे कोणालाही सांगितले नाही. आम्ही सर्वसामान्य भक्तांसोबत रांगेत उभे राहिलो, दरबारात जाण्यासाठी पत्रकारितेचे कौशल्यही वापरले नाही. ते देखील त्याचसाठी ज्यामुळे सत्य अधिक जवळून समजून घेऊ शकलो.

खालील बातमी देखील वाचा...

...तर तुमचा दाभोलकर करू:'अंनिस'च्या श्याम मानव यांना धमकी; बागेश्वर महाराजांच्या विरोधात बोलल्याने इशारा

‘बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरुद्ध बोलणे थांबवले नाही तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’ अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.

बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना श्याम मानव यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिल्यानंतर दोघांतील संघर्ष तीव्र झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दिला आहे. श्याम मानव यांच्या जीविताला कुठलाही धोका उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिली. पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...