आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष होते 1980 चे. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने जनता पक्षाला नाकारले. 1977 मध्ये 295 जागा जिंकणारा जनता पक्ष 3 वर्षांनंतर केवळ 31 जागांवर येऊन ठेपला. या पराभवाचे खापर पक्षातील जनसंघाशी संबंधित असलेल्यांवर फोडण्याचा प्रयत्न झाला.
4 एप्रिल रोजी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जनसंघाच्या माजी सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये अटल आणि अडवाणी यांचाही समावेश होता.
यानंतर बरोबर दोन दिवसांनी, म्हणजे 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर एका नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली. त्याचे नाव होते- भारतीय जनता पार्टी. आज या ऐतिहासिक घटनेला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत.
भाजपच्या स्थापनादिनानिमित्त आम्ही तुम्हाला 42 वर्षांच्या महत्त्वाच्या टप्प्यांची कहाणी सांगत आहोत. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 2 जागा जिंकून सुरू झालेला प्रवास 2019 मध्ये 303 जागांवर कसा पोहोचला? 2014 मध्ये मोदी युगाची सुरुवात झाल्यानंतर हा पक्ष सलग निवडणुका जिंकणारी इलेक्शन मशीन कशी बनला? या काळात काँग्रेस कशी संकुचित होत आहे? भाजपच्या 42 वर्षांच्या महत्त्वाच्या टप्प्यांपासून सुरुवात करूया...
वर तुम्ही भाजपच्या आतापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे पाहिले. आता आम्ही तुम्हाला भाजपच्या 42 वर्षांच्या विस्ताराची कहाणी सादर करत आहोत.
वरील ग्राफिक्समध्ये तुम्ही भाजपचा राजकीय पक्ष म्हणून 42 वर्षांत झालेला विस्तार पाहिला. आता आम्ही तुम्हाला 5 मोठे मुद्दे सांगत आहोत, ज्यांच्या आधारे भाजप इथपर्यंत पोहोचला आहे.
1. रामजन्मभूमी आंदोलन
1986 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या काळात अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी विश्व हिंदू परिषद आंदोलन करत होती. भाजपच्या राजकारणाला इथूनच आधार मिळाला. याला पक्षाने जोरदार पाठिंबा दिला. त्याचा परिणाम असा झाला की, 1984 मध्ये 2 जागा जिंकणारा पक्ष 1989 मध्ये 85 जागांवर पोहोचला. सप्टेंबर 1990 मध्ये अडवाणींनी अयोध्येत राम मंदिराच्या समर्थनार्थ रथयात्रा काढली. बाबरी मशीद 1992 मध्ये पाडण्यात आली. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर निकाल दिला. सध्या अयोध्येत मंदिर बांधले जात आहे.
2. काश्मीर समस्या
जनसंघ जो नंतर भाजप बनला, त्यांचे अग्रणी नेते श्यामा प्रसाद मुखर्जी जम्मू आणि काश्मीरला भारताचा 'अविभाज्य भाग' बनवण्याचे समर्थन करायचे. ऑगस्ट 1952 मध्ये त्यांनी जम्मूमध्ये मोठी रॅली काढली. म्हणाले- एकतर मी तुम्हाला भारतीय संविधान मिळवून देईन किंवा या उद्देशाच्या पूर्ततेसाठी मी माझ्या प्राणांची आहुती देईन. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला होता. नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतली तेव्हा 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर राज्यातून संविधानातील कलम 370 हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यातून भाजपच्या जाहीरनाम्यातील एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण झाले.
3. घराणेशाहीचा विरोध
भाजप सुरुवातीपासूनच घराणेशाहीच्या विरोधात आहे, पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी हा मुद्दा जोमाने पुढे केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी घराणेशाही, जातिवाद, सांप्रदायिकता आणि संधीसाधूपणा हे लोकशाहीचे चार शत्रू असल्याचे सांगितले. आजही पक्षात मोठ्या प्रमाणावर घराणेशाही किंवा वंशवाद नाही आणि त्यावर उघड टीका केली जाते. मात्र, या धोरणात अल्प प्रमाणात लवचिकता आली आहे.
4. गोहत्येच्या विरोधात
भाजप हिंदुत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानावर चालतो, त्यामुळे गाय आणि गोवंशाचा मुद्दा त्यांच्या अग्रक्रमात राहतो. केंद्रापासून विविध राज्यांमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर गोहत्या बंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अटल सरकारने गो पशु आयोग स्थापन केला. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गोहत्येवर पूर्णपणे बंदी घातली. 26 मे 2017 रोजी, मोदी सरकारने जनावरांच्या बाजारात कत्तलीसाठी गुरांच्या विक्री आणि खरेदीवर बंदी घातली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली.
5. भ्रष्टाचार
भ्रष्टाचार हा एक प्रमुख मुद्दा होता ज्यावर भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. यूपीए सरकारच्या काळात झालेले घोटाळे आणि परदेशात दडवलेला काळा पैसा हा मुद्दा जोरात मांडला गेला. जनतेने विश्वास ठेवून भाजपला मतदान केले.
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर भाजपमध्ये नवीन पर्व सुरू झाले. नवनवीन टू्ल्स आणि स्ट्रॅटेजी अवलंबली गेली. याचा परिणाम असा झाला की भाजप निवडणूक जिंकण्याचे यंत्र बनले. पुढील काही मुद्द्यांमध्ये आपण भाजपच्या अशाच टूल्स आणि स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया...
1. पकडता न येणारे संदेश
न पकडलेल्या संदेशांचा भाजपच्या विजयात मोठा वाटा आहे. प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियावर चाललेल्या बातम्या आपण पाहतो, पण व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जे काही दिले जात आहे ते आवाक्याबाहेर आहे. या ग्रुपमध्ये कोणताही मुद्दा भाजपच्या बाजूने वारे वाहतील अशा पद्धतीने मांडला जातो. यात द्वेषयुक्त भाषणाचादेखील समावेश आहे, ज्याची मॉनिटरिंग केली जात नाही.
2. जातीवर आधारित राजकारण दूर लोटले
भाजपनेही पारंपरिक जातीपातीच्या राजकारणाला फाटा दिला आहे. भाजपने सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरणे सोडून दिली आहेत असे नाही, त्यांनी फक्त त्यांची अशी मांडणी केली आहे की पक्ष कोणत्याही एका जातीशी जोडलेला दिसू नये.
त्याऐवजी ते हिंदुत्वाची चर्चा करतात - एक राजकीय कल्पना ज्यामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाचा समावेश आहे. त्यामुळे पक्षाचा सामाजिक पाया विस्तारला आहे.
3. गरिबांशी संबंधित योजना
भाजपच्या वाढत्या प्रभावामागे गरिबांशी संबंधित योजना आहेत, ज्यांचा उद्देश सरकारी योजनांचा लाभार्थी मोठा वर्ग निर्माण करणे हा आहे. शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, मोफत रेशन, मोफत लस आणि घर अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा राजकीय अजेंडा भाजपने बनवला आहे. भाजप कोणत्याही राज्यात निवडणुकीपूर्वी सरकारी योजनांच्या लाभार्थींना बोलावून मोठमोठ्या रॅली काढते. हे टूल गेम चेंजर ठरले आहे.
4. केंद्रीय व्यक्तीच्या भोवती संपूर्ण ब्रँडिंग
भाजपच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, संपूर्ण ब्रँडिंग केंद्रीय चेहऱ्याभोवती व्हायची. यापूर्वी हा चेहरा अटलबिहारी वाजपेयींचा होता. 2014 नंतर ते नरेंद्र मोदी झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी वृत्तपत्रांच्या जाहिरातींमध्ये नरेंद्र मोदींचा मोठा फोटो असायचा. सत्तेत आल्यानंतर सर्व योजनांमध्ये पीएम मोदींची मोठी छायाचित्रे लावण्यात आली. लहान-मोठ्या प्रत्येक कामगिरीचे श्रेय त्यांना देण्यात आले.
आता अखेरीस पाहुया की, भाजपच्या वाढीबरोबरच काँग्रेस कशी संकुचित होत चालली आहे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.