आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टपती किंवा पत्नीची फसवणूक करतात 20 लाख भारतीय:नवीन जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा, हेच कारण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लीडन हे फ्रेंच विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅप आहे. याचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे. ग्लीडनचा वापर जगभरातील 10 मिलियन लोक करतात. अलीकडेच या डेटिंग अहवालात दावा करण्यात आला आहे की, त्यांच्या अ‍ॅपवरील 20 टक्के लोक भारतीय आहेत. जे विवाहित आहेत आणि नवीन जोडीदाराच्या शोधात आहेत, ते या अ‍ॅपसोबत सामील झाले आहेत. संशोधनात असेही म्हटले आहे की, कोविड नंतर वापरकर्त्यांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ग्लीडनचे सर्वेक्षण तपशीलवार वाचा

आज कामाची गोष्टमध्ये, एक्स्ट्रा मॅरिटल अ‍ॅपवर डेंटिंग करण्यामागील कारण काय आहे, तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात नवीनता कशी टिकवून ठेवू शकता आणि तुमच्या जोडीदाराने फसवणूक केल्यास तुम्ही काय करू शकता हे जाणून घेणार आहोत.

आमचे तज्ञ आहेत…

  • डॉ. श्वेता शर्मा, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक, कोलंबिया एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम
  • डॉ. मिमांसा सिंह तन्वर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, बंगलोर

प्रश्न: विवाहबाह्य संबंध ठेवणे किंवा विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवणे बेकायदेशीर नाही का?

उत्तर: भारतात व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध बेकायदेशीर नाहीत.

2018 मध्ये, IPC चे कलम 497 रद्द करण्यात आले. या कलमात व्यभिचार हा गुन्हा मानला जात होता, त्यामध्ये 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती.

प्रश्‍न: देशातील इतके लोक विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित होण्याचे कारण काय?

उत्तरः ग्लीडनच्या सर्वेक्षणात, विवाहबाह्य संबंधांमागील खालील कारणे समोर आली आहेत…

  • 63 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या जोडीदाराला कंटाळले आहेत.
  • 20 टक्के लोकांनी सांगितले की, विवाहबाह्य संबंध किंवा व्यभिचार ही एक सामान्य गोष्ट बनली आहे, म्हणून त्यांना देखील करावे वाटले.
  • 10 टक्के लोकांनी त्यांच्या जोडीदाराशी भांडण झाल्यानंतर फसवणूक केल्याचे सांगितले.
  • 8 टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या जोडीदाराशिवाय दुसऱ्याच्या प्रेमात पडले आहेत.

याशिवाय खालील 5 कारणे आहेत...

कम्युनिकेशन गॅप: आजकाल पती-पत्नी दोघांचे वेळापत्रक असे बनले आहे की, त्यांना एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. यामुळे त्यांना एकमेकांच्या गरजा समजत नाहीत. सुख-दु:ख विचारता येत नाही. संवाद तुम्हाला कनेक्ट ठेवतो हे विसरू नका. बोलून अनेक गोष्टी सहज सोडवता येतात.

अहंकारातून संघर्ष: आजकाल जोडपे स्वतःला एक युनिट म्हणून पाहत नाहीत. दोघेही 'मी' आणि 'तू' मध्ये गुंतलेले आहेत. परस्पर संबंधापेक्षा अहंकार मोठा झाला आहे. एकमेकांच्या छोट्या-छोट्या चुका लक्षात आणून दिल्या जातात. सार्वजनिक ठिकाणीही ते स्वतःला इतरांपेक्षा सक्षम आणि हुशार दाखवण्यासाठी भांडू लागतात.

शारीरिक गरज : आजकाल जोडप्यांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचे असते. या विचारामुळे त्यांना वैयक्तिक जागेची गरज आहे, ते खूप कमी वेळ एकत्र घालवतात. अशा परिस्थितीत ते लोक आपल्या शारीरिक गरजा इतर ठिकाणाहून पूर्ण करतात.

भौतिकवादी: बर्‍याच वेळा लोक त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करतात अगदी ऑफिसमध्ये बढती मिळवण्यासाठी. लोकांना कठोर परिश्रमाने नव्हे तर शॉर्टकटने प्रगती हवी असते. यासाठी ऑफिसमध्ये नाते निर्माण करणे चुकीचे नाही, असे त्यांना वाटते.

फ्रस्ट्रेशन लेव्हल: आजकाल प्रत्येकाची निराशा खूप जास्त झाली आहे. यामुळे लोक एकमेकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

प्रश्न: हे ओपन मॅरेज काय आहे आणि ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरपेक्षा वेगळे कसे?

उत्तरः अनेक वेळा दोन व्यक्ती केवळ समाजाच्या फायद्यासाठी लग्न करतात, तर त्यांच्यात कोणतेही बंधन नसते. अशा विवाहांमध्ये, दोन्ही भागीदार कोणाशीही संबंध ठेवण्यास स्वतंत्र असतात. अशा विवाहांना खुले विवाह किंवा ओपन मॅरेज म्हणतात. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये एक पार्टनर दुसऱ्याला फसवतो.

प्रश्न: वैवाहिक जीवनात नवीनता टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतो?

उत्तर : वैवाहिक जीवनात नवीनता ठेवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा...

  • रिलेशनशिप कौन्सिलरकडून जोडप्यांची थेरपी घेतली जाऊ शकते. हे तुम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देईल.
  • लग्न हे फक्त समाजासाठी किंवा मुलांसाठी चालवायचे असते असे समजू नका. समजून घ्या की, ही तुमची संपूर्ण आयुष्याची साथ आहे आणि म्हणूनच ते स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी चालवा.
  • एकमेकांना वेळ द्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करा. जर तुमचा पार्टनर असे करत नसेल तर त्याच्याशी बोला.
  • जर काही अंतर असेल तर संवाद साधा. तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करणे फार महत्वाचे आहे. तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
  • प्रेमापेक्षा सहवास महत्त्वाचा आहे हे समजून घ्या. कदाचित लग्नानंतर काही काळानंतर तुम्हाला वाटेल की, तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुमच्या मनात प्रेमाची भावना नाही. अशा वेळी तुम्ही दोघेही एकमेकांना समजून घेता, एकमेकांच्या गरजा जपता, एकमेकांचा आदर करता आणि महत्त्व देता का ते पाहा.

प्रश्‍न : अनेकदा मला माझ्या जोडीदाराच्या कृतीचा राग येतो, ही परिस्थिती कशी हाताळायची?

उत्तरः प्रत्येकाला राग येतो आणि प्रत्येक नात्यात भांडणे होतात. अशा परिस्थितीत जोडीदाराला दुखावणारे बोलू नका. रागाच्या भरात तुमच्या जोडीदाराच्या तोंडून अशी गोष्ट निघाली तरी ती तुमच्या हृदयाच्या जवळ ठेवू नका. जोडीदाराला धडा शिकवण्याच्या उद्देशाने काहीही करू नका. शांत मनाने बोला आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

प्रश्‍न: काही वर्षांनंतर मी ज्या जोडीदारावर प्रेम करत होतो, त्या जोडीदाराबद्दलचे आकर्षण संपलेले दिसते. काय करता येईल?

उत्तर: असे घडते कारण लोक लग्नाआधी प्रेमसंबंध किंवा नातेसंबंधांसाठी खूप प्रयत्न करतात. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचे नियोजन करतात. पण लग्नानंतर लोकांना वाटतं की आता लग्न झालं, आता आपण एकत्र आहोत. अशा प्रकारे, ते एकमेकांसाठी प्रयत्न करणे थांबवतात. त्यामुळे तुम्ही विवाहित असाल तरीही एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि जोडीदाराला स्पेशल फील करण्यासाठी प्रयत्न करत राहा.

तसेच लग्न झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळेच कदाचित तुम्हा दोघांना एकत्र वेळ मिळत नसेल. अशा परिस्थितीत जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांना समजून घ्या, दोषारोपाचा खेळ खेळू नका.

प्रश्‍न: तुमचा जोडीदार फसवणूक करत आहे हे तुम्हाला कळले तर परिस्थिती कशी हाताळायची?

उत्तरः अशा परिस्थितीत तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज करू शकता. देशात फसवणूक करणे हा कायदेशीर गुन्हा नाही, पण त्या आधारावर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता.

प्रश्‍न: विवाह मोडला पाहिजे हे कसे कळेल?

उत्तर : अनेक वेळा लोकांना समजत नाही की, आता त्यांची साथ कायम राहिल की नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्याबद्दल बोलण्यापेक्षा विवाहबाह्य संबंध ठेवणे चांगले वाटते, जे पूर्णपणे चुकीचे आहे. खालील मुद्यांवरून समजून घ्या की, तुमचे लग्न टिकणार की नाही....

  • तुमच्या जोडीदाराला तुमचे मत लक्ष्यात येत नाही आणि त्याचे मतही तुमच्या लक्ष्यात येत नसेल तर.
  • लाख प्रयत्न करूनही तुम्हा दोघांचे भांडण वाढतच चालले आहे. त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
  • बरेच दिवस एकमेकांशी न बोलता निघून जातात. तुम्ही फक्त मुलांच्या भल्यासाठी किंवा इतरांच्या फायद्यासाठी एकमेकांशी बोलता.
  • तुम्ही दोघेही सूडबुद्धीने वागता. उदाहरणार्थ, रेस्टॉरंटमध्ये, तुम्ही जाणूनबुजून डिश ऑर्डर करता ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्रास होईल. तुम्ही एकमेकांना जेवण देत नाही.
  • तुम्हाला तुमच्या जोडीदाराला छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत दुखवायचे असते. तुमचा उद्देश फक्त जोडीदाराला दुखावण्याचा किंवा अपमानित करण्याचा असतो.

प्रश्न: ग्लीडन व्यतिरिक्त इतर समान अ‍ॅप्सस आहेत का?

उत्तरः ग्लीडन व्यतिरिक्त, इतर डेटिंग अ‍ॅप्स आहेत जे विशेषत: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी बनवलेले आहेत…

  • अमुअर
  • मीटीजी
  • एशली मॅडिसन
  • अडल्ट फ्रेंड फाइंडर
  • सीकिंग
  • व्हिक्टोरिया मिलान
  • हीटेड अफेअर्स
  • इल्लीसिट एंकाउंटर्स
  • हश अफेयर्स

टीप: अशा अ‍ॅप्सवर अनेक वेळा ब्लॅकमेलिंगची प्रकरणेही समोर आली आहेत. हे अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. सर्व प्रयत्न करूनही जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही ठीक होत नसेल तर अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंध ठेवण्याऐवजी दोघांच्या संमतीने लग्न मोडणे हाच उत्तम पर्याय आहे. यानंतरच एखाद्याने दुसऱ्यासोबत नव्याने सुरुवात करावी.

कामाची गोष्ट या मालिकेत आणखी अशाच बातम्या वाचा...

बजेट-2023 मधील भरडधान्य:मोदी आणि सीतारामन यांच्यासाठी का आहेत ‘सुपरफूड’; त्याचा फायदा काय?

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी बाजरीचा उल्लेख श्रीअण्ण असा केला. तसेच बाजरीचे उत्पादन वाढविण्याबाबत वक्तव्य केले. त्यासाठी श्री अन्न योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उत्पादन वाढवण्याच्या शक्यतेवर काम करणारी आणि बाजरी पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी बाजरी संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

2018 मध्ये प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक थाळीत बाजरी समाविष्ट करण्याची मोहीम सुरू केली. भारताच्या प्रस्तावानंतर, संयुक्त राष्ट्रांनी (UN) 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बाजरी म्हणजे काय, त्याचा फायदा काय आणि आपण बाजरी कोणत्याही आजारात खाऊ शकतो का, हे सर्व कामाची गोष्टमध्ये समजून घेणार आहोत..... पूर्ण बातमी वाचा...

डीकोड बजेट-2023:फिस्कल सरप्लस, महसूल खर्च अशा शब्दांचा अर्थ जाणून घ्या; बजेट समजणे होईल सोपे

वर्षभरात सरकार कुठून आणि किती कमावणार आणि कुठे आणि किती खर्च करणार, याचा हिशेब बजेटमध्ये असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काही असे अनेक शब्द अर्थसंकल्पात वापरले जातात जे समजणे कठीण आहे.

कामाची गोष्टमध्ये आम्ही असे काही शब्द सांगत आहोत, ज्याचा अर्थ आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पाचा प्रभाव आपल्या सर्वांच्या जीवनावर पडत असल्याने, ते समजून घेतले तर अर्थसंकल्पही सहज समजेल… पूर्ण बातमी वाचा....

बातम्या आणखी आहेत...