आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामाच्या भूमीवर रावण जी. येथे कोणी दसरा साजरा करत नाही आणि रावणाचे दहन ही केले जात नाही. रावणदहन इतर शहरात किंवा टीव्हीवर दिसले तर इथले लोक पाठ फिरवतात आणि टीव्ही बंद करतात. कोणाच्या जिभेतून रावण शब्द निघाला तर लोक संतापतात. ते रावणाला रावण जी म्हणतात.
इथे सोन्याचे दुकानही कोणी उघडत नाही. असा समज आहे की, जो कोणी दसरा साजरा करतो त्याला आपला जीव गमवावा लागतो. ज्याने सोन्याचे दुकान उघडले, त्याच्या सोन्याचा रंग शिवलिंगाचा होतो, म्हणजे काळा होतो.
पंथ मालिकेतील या श्रद्धांची कथा जाणून घेण्यासाठी मी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ धाम मंदिरात पोहोचले.
वेळ रात्री 1.30 च्या सुमारास. चंदीगड बसस्थानकावरून बैजनाथ मंदिराकडे निघाले. बसमध्ये चढणाऱ्या बहुतांश लोकांना बैजनाथ मंदिरात जायचे होते.
काही वेळाने मी लोकांशी हळू-हळू बोलायला सुरूवात केली. या दरम्यान एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली. आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतात, पण इथे राम नाव कोणाच्याच ओठावर येत नाही. लोक जय शंकर किंवा जय महाकाल असे म्हणतात.
मी जवळच्या सीटवर बसलेल्या तरुणाला विचारले, इथले लोक रावणाला एवढा मान का देतात?
तो तरुण नाराजीच्या स्वरात म्हणाला, रावण जी म्हणा. मी गुरुग्राममध्ये काम करतो, मी तिथेही दसरा साजरा करत नाही किंवा मी रावण दहन पाहायला जात नाही, कारण रावण जी आमच्यासाठी पूजनीय आहेत.
दरम्यान, बस चालक म्हणाला, 'मॅडम... आम्ही आमच्या मुलांना रामाच्या नव्हे तर रावणाच्या गोष्टी सांगतो. त्यांच्या शौर्याचे किस्से सांगतो. आजपर्यंत त्यांच्यासारखा विद्वान आणि पराक्रमी कोणीही झालेला नाही.
रावणाने तर एका स्त्रीवर अन्याय केला असा प्रश्न मनात आला. सीताजींचे अपहरण केले होते, मग तरी त्याच्याबद्दल एवढा आदर का? पण जिथे नुसते रावण बोलल्याने लोकांचा राग येतो, तिथे हा प्रश्न विचारणे योग्य वाटले नाही. मी गप्प राहिले.
सात तासांचा प्रवास करून सकाळी 11 वाजता बैजनाथ धाम गाठले. थोडं फ्रेश होऊन सरळ शिवमंदिर गाठलं. मंदिरात आरती सुरू होती. आरतीमध्ये शिवाची स्तुती करण्यात येत होती. प्रसाद वाटप करण्यात आला.
मंदिराच्या आत जमिनीत गाडले गेलेले शिवलिंग आहे. थोड्या अंतरावर गणेश, कार्तिकेय, हनुमान, पार्वती, लक्ष्मी नारायण यांच्या मूर्ती आहेत, पण राम-सीतेची मूर्ती नाही. राम नावाचा देखील कुठेही उल्लेख नाही.
आरतीनंतर मंदिराचे पुजारी पं. संजय शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणतात की, 'या मंदिरात रावणाची मूर्ती नाही किंवा त्याची पूजा केली जात नाही, परंतु त्यांचा दर्जा खूप वरचा आहे. त्यांची इतर देशातील इतर भागाप्रमाणे येथे प्रतिमा खराब नाही.
आम्ही बैजनाथ येथील रहिवासी मानतो की, ते शिवभक्त होते. चार वेदांचा जाणते, संपूर्ण जगात त्यांच्यापेक्षा मोठा विद्वान दुसरा कोणी नव्हता.
इथे दसरा का साजरा केला जात नाही?
पंडित संजय शर्मा सांगतात की, रावणजींनी बैजनाथमध्ये तपश्चर्या केली होती. ज्या-ज्या वेळेस कोणी येथे दसरा साजरा केला तेव्हा महिनाभरानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचा अकाली मृत्यू झाला. भगवान शिवाच्या भक्ताला पृथ्वीवर कोणीही जाळू शकत नाही. महाकाल रागावतो. त्यामुळे ही परंपरा बंद करावी लागली.
मी ऐकले आहे की इथे लोक सोन्याचे दुकाने उघडत नाहीत?
पंडित संजय शर्मा म्हणतात, 'जो कोणी इथे सोन्याचे दुकान उघडतो, तिसर्या दिवशी त्याचे सोने शिवलिंगासारखे काळे होऊ लागते. त्याला व्यवसायात तोटा होऊ लागतो. दुर्दैवी घटना घडू लागतात. त्यामुळे इथे सोन्याचे दुकान कोणी उघडत नाही. मी साठ वर्षांचा आहे, पण सोन्याचे एकही दुकान पाहिले नाही.'
ते म्हणतात, 'भगवान शिवाने रावणाला सोन्याची लंका भेट दिली होती. म्हणूनच इतर कोणीही सोन्याचे दुकान उघडू शकत नाही, येथे मोठ्या प्रमाणात सोने ठेवू शकत नाही.
मंदिराचे एक पुजारी सांगतात की, कोणी कितीही पैसे खर्च केले. इथे सोने आणले गेले की, ता तिसर्या दिवशी सोन्याचा रंग शिवलिंगासारखा काळा होतो. बड्या लोकांनी लाखो रुपये गुंतवून इथे सोन्याचा व्यापार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिसऱ्या दिवशी त्यांना दुकान बंद करावे लागले.
बैजनाथ ट्रेड वेलफेअरचे अध्यक्ष विनोद नंदा म्हणतात, 'ही 80 च्या दशकातील घटना आहे. येथे सोन्याचे दुकान सुरू झाले. जनकराज नावाच्या व्यापाऱ्याने हे दुकान उघडले होते. त्याने जे काही सोने आणले ते तीन दिवसांनी काळे व्हायचे. त्याला वाटायचे आपल्या सोन्यातच काहीतरी खराबी आहे.
त्याने अनेक ठिकाणाहून सोने आणण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. यादरम्यान त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या घरीही काही अनुचित प्रकार घडला. त्यामुळे त्यांना दुकान बंद करावे लागले. ते दुकान इथलं शेवटचं सोन्याचं दुकान होतं. त्यानंतर सोन्याचे दुकान उघडण्याचे धाडस कोणी केले नाही.
ते म्हणतात की, 'केवळ इथे मंदिराजवळच नाही तर गावातील लोकही रावणजी म्हणतात. लहान मुले आणि वडीलधारे सर्वच. आमच्या ठिकाणी लोक त्यांच्या दुकानांची आणि घरांची नावे रावणाच्या नावावर ठेवतात. माझ्या गावातच रावणजींच्या नावाने चहाची टपरी आहे.
सोने काळे पडते या त्यांच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही, पण त्यांचा विश्वास इतका दृढ आहे की, मी इथे सोन्याचे एकही दुकान पाहिले नाही.
मनात प्रश्न पडला, रावणाचा एवढा गौरव का?
अश्विनी डोगरा हे बैजनाथ येथे राहतात. ते पूजेसाठी मंदिरात आले आहेत. ते म्हणाले की, 'रावणाचा आदर करा असे कोणत्याही धार्मिक पुस्तकात लिहिलेले नाही, परंतु हे आम्ही लहानपणापासून करत आलो आहोत.
ज्याने दसरा साजरा केला तो राहिला नाही. दुसऱ्याने आदराने त्यांचे नावही घेतले नाही तर आम्हाला वेदना होतात आणि रागही येतो. कारण आमचे आजी-आजोबा सगळेच त्यांचा आदर करत आले आहेत.
रामाचा काय प्रॉब्लेम आहे?
मंदिराचे पुजारी संजय शर्मा सांगतात, 'आम्हाला रामाची काही अडचण नाही, पण आम्ही शिवाची पूजा करतो आणि रावणाची स्तुती करतो. घरातही लोक शिवाचीच पूजा करतात. सणाच्या नावाखाली फक्त श्रावण आणि शिवरात्री साजरी केली जाते. जर आम्ही भगवान शंकराशिवाय इतर कोणाला मानत असू तर ते रावणजींना, कारण ते शिवभक्त होते.
आम्ही लोकांना भेटतो तेव्हा शिवशंकर किंवा जय महाकाल म्हणतो. मी कोणाला राम-राम म्हणताना ऐकले नाही. काही लोक त्यांच्या घरी रामायण ठेवतात, पण त्यांची जयकार करत करत नाही. त्यांचा सण साजरा करत नाही.
आता मनात प्रश्न पडतो की या मंदिराचा रावणाचा काय संबंध?
मंदिरात ठेवलेल्या पुस्तकानुसार बैजनाथ मंदिराबाबत पौराणिक कथेचा उल्लेख आहे.
''ही त्रेतायुगातील घटना आहे. रावण शिवभक्त होते. त्यांनी कैलास पर्वतावर ध्यान धारणा केली, परंतु भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत. त्यानंतर रावणाने हवन कुंड बनवले. नृत्य आणि तांत्रिक विधी झाल्यानंतर त्यांनी त्या हवनकुंडात आपले एकेक मस्तक अर्पण करण्यास सुरुवात केली.
9 मस्तक अर्पण करूनही जेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत तेव्हा रावणाने आपल्या 10व्या मस्तकाचा बळी देण्यास सुरुवात केली. यामुळे देवता घाबरले. ते शिवजींना विचारू लागले की, आता काहीतरी करा, नाहीतर रावण अमर होईल. यानंतर भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी राणवला तसे करण्यापासून रोखले आणि त्याचे सर्व डोके पुन्हा जिवंत केले.
रावण म्हणाला की, भगवान मला लंकेत तुमची स्थापना करायची आहे. शिवजींनी ते मान्य केले, पण एक अट ठेवली. ते म्हणाले की, मला एकदा उचलल्यानंतर तुम्ही मला मध्ये कुठेही बसवले तर मी तिथेच बसेन. रावणाने शिवजींची अट मान्य केली.
वाटेत शिवलिंग घेऊन जात असताना रावणाला लघुशंका आली. त्यांनी बैजू नावाच्या गोपालकाला शिवलिंग दिले आणि ते लघुशंकासाठी गेले. रावण बराच वेळ परतला नाही तेव्हा गोपालाने शिवलिंग जमिनीवर ठेवले. जेव्हा रावण परत आला तेव्हा त्याने शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला शिवलिंग हलवता आले नाही. त्याला शिवजींची माया समजली. त्याला खूप राग आला.
त्याने आपल्या अंगठ्याने शिवलिंग खूप जोराने दाबले, त्यामुळे ते जमिनीत बुडाले. आजही येथील शिवलिंग जमिनीत बुडालेले आहे. शिवजींनी रावणाचे मस्तक ठिक केले होते, म्हणून या मंदिराचे नाव वैद्यनाथ किंवा बैजनाथ बाबा पडले. लोक त्याला रावणेश्वर असेही म्हणतात.
पंडित संजय शर्मा म्हणतात, 'भले या मंदिराला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्थान मिळालेले नाही, परंतु येथील लोकांसाठी हे ज्योतिर्लिंगापेक्षा कमी नाही. हजारो वर्षांपासून लोक येथे शिवाची पूजा करतात. पांडवांनीही वनवासात येथे पूजा केली होती. मुघलांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला, जे नंतर कांगड्याच्या राजाने पुन्हा बांधले होते.
कुठे रावणाचे मंदिर तर कुठे दसऱ्याच्या वेळी आरती केली जाते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.