आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टसुट्यांमध्ये आजारी पडू शकते ‘हृदय’:खारट चिप्ससह कराल दारूची पार्टी, तर येईल हृदयविकाराचा झटका

उत्कर्षा त्यागी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत पार्टीचा हंगाम सुरू असतो. त्या वर, जर तुम्ही मित्रांसह सुट्टीवर असाल तर ड्रिंक आणि खारट स्नॅक्सला मर्यादा नसते.

तुम्ही कधी विचार केला आहे का की, आनंदासाठी ड्रिंक्ससोबत जास्त मीठ असलेले स्नॅक्स खाणे तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते.

या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. सुट्टीमुळे होणाऱ्या हृदयाशी संबंधित या समस्येला हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणतात.

आज कामाची गोष्ट मध्ये, आपण हॉलिडे हार्ट सिंड्रोमच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत आणि ते कसे टाळता येईल ते समजून घेणार आहोत…

आजचे तज्ञ आहेत…

डॉ. निकोलस रुथमॅन, हृदयरोगतज्ज्ञ, क्लीव्हलँड क्लिनिक, न्यूयॉर्क.

डॉ. क्रिस्टन ब्राउन, कार्डिओव्हॅस्कुलर फेलो, नेबरास्का मेडिकल सेंटर, यू.एस.

डॉ. ग्रेगरी मार्कस, मेडिसिन प्राध्यापक, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्को

डॉ. हिमांशू राय, पोषणतज्ञ, दिल्ली.

डॉ. अजित मेनन, सल्लागार कार्डियाक सायन्स, सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई, महाराष्ट्र.

प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

उत्तर: पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि फ्रेंच फ्राईज यांसारखे आणि मीठयुक्त पदार्थ अल्कोहोल सोबत जास्त खाल्ल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. सणासुदीच्या काळात असे अनेकदा घडते. याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणतात. या अवस्थेत, हृदयविकार नसतानाही, हृदयाची गती जलद होते आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

प्रश्न: याला सॉल्टी हार्ट सिंड्रोम असेही म्हणतात का?

उत्तर: होय, हॉलिडे हार्ट सिंड्रोमला सॉल्टी हार्ट सिंड्रोम देखील म्हटले जाऊ शकते. याशिवाय, याला अल्कोहोल-इंड्यूस्ड अ‍ॅट्रियल अ‍ॅरिथमियाज देखील म्हणतात. या अवस्थेत मद्य आणि मीठाच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात.

प्रश्न: मीठ आणि अल्कोहोलचा हृदयाशी काय संबंध आहे?

उत्तर: जास्त मीठ खाल्ल्याने...

  • शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
  • उच्च रक्तदाबामुळे अशा लोकांनाही हृदयविकाराचा धोका असतो, ज्यांना यापूर्वी ही समस्या नव्हती.
  • हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी, उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो.

जास्त दारू पिल्याने...

  • उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
  • यामुळे, कार्डिओमायोपॅथीची स्थिती देखील विकसित होते. यामध्ये, हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होतो ज्यामुळे हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही.
  • कार्डिओमायोपॅथीमुळे हृदय बंद देखील होऊ शकते.

प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोमचे निदान कसे केले जाऊ शकते?

उत्तर: हॉलिडे हार्ट सिंड्रोमची लक्षणे दिसू लागल्यावर डॉक्टर रुग्णाचा अल्कोहोल आणि फूड हिस्ट्री तपासतात. यानंतर हृदयाशी संबंधित आजारांसाठी चाचण्या केल्या जातात. हृदयाशी संबंधित सर्व चाचण्या क्लिअर असूनही लक्षणे आढळल्यास तो हॉलिडे हार्ट सिंड्रोम असतो.

प्रश्न: या सिंड्रोमचा प्रभाव किती काळ टिकतो?

उत्तर: हॉलिडे हार्ट सिंड्रोमचा प्रभाव बहुतेक फक्त 24 तास टिकतो. पण त्याला हलक्यात घेऊ नका. तो आपोआप बरा होईल असे मानणे योग्य नाही. हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांना नक्की भेटा. धोका पत्करू नका.

प्रश्न: हा सिंड्रोम स्वतःच बरा होऊ शकतो का?

उत्तर: अल्कोहोलचे परिणाम कमी झाल्यामुळे हॉलिडे हार्टची बहुतेक प्रकरणात रुग्ण बरे होतात. बहुतेक लोकांमध्ये उपचारांशिवाय 24 तासांच्या आत सुधारणा होते.

प्रश्न: हॉलिडे हार्ट सिंड्रोममुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

उत्तर: होय, नक्कीच. हॉलिडे हार्ट सिंड्रोम काही लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. कार्डिओमायोपॅथी नावाची स्थिती देखील असू शकते, ज्यामुळे हृदय बंद पडते.

प्रश्‍न : सुट्ट्या आणि पार्ट्यांमध्ये जेवणाची काळजी कशी घ्यावी?

उत्तर : सुट्ट्या आणि सणांच्या काळात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी…

  • जर तुम्ही पार्टीला जात असाल तर घरी जेवण करुन जा. यामुळे तुम्ही पार्टी फूड कमी खाताल.
  • दारू पिणे टाळा.
  • अन्न घेतांनाच नियंत्रण ठेवा. सर्व काही कमी घ्या.
  • पार्टीला जाण्यापूर्वी काय खावे आणि काय नाही याचे नियोजन करा.
  • हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा.
  • हृदय, कोलेस्टेरॉल इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी औषध घ्यायला विसरू नये.

प्रश्‍न: अति मीठामुळे हृदयाच्या समस्यांशिवाय आणखी कोणते नुकसान होऊ शकते?

उत्तर: जास्त मीठ खाल्ल्याने केवळ हृदयाचेच नाही तर इतर अवयवांचेही नुकसान होते.

पोट फुगणे : जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात जास्तीचे पाणी जमा होते. यामुळे पोट फुगणे आणि पोटात घट्टपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरावर सूज येणे : जास्त मीठ खाल्ल्याने पाणी टिकून राहण्याची समस्या उद्भवते. यामुळे हात, पाय आणि चेहऱ्याला सूज येऊ शकते.

निद्रानाश: जे लोक रात्रीच्या जेवणात जास्त मीठ खातात त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. हे लोक रात्री अनेक वेळा जागे होतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.

वजन वाढणे : मीठ जास्त खाल्ल्याने शरीरात पाणी साचते. यामुळे वजन वाढते.

अर्धांगवायू: जास्त मीठ आपल्या मज्जासंस्थेचे नुकसान करते. यामुळे अर्धांगवायू होऊ शकते.

कमकुवत हाडे : जास्त मीठ खाल्ल्याने लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात.

किडनीची समस्या: मीठ जास्त खाल्ल्याने शरीरातील पाणी लघवी आणि घामाद्वारे वेगाने बाहेर पडू लागते. त्यामुळे किडनी वेगाने काम करू लागते आणि त्यामुळे किडनीचा त्रास होऊ शकतो.

त्वचेला संसर्ग: जास्त मीठ खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. खाज येण्याच्या अनेक कारणांपैकी मीठ हे देखील एक कारण आहे.

प्रश्‍न: हृदयाशिवाय अल्कोहोलमुळे इतर कोणत्या अवयवाला इजा होते?

उत्तरः अल्कोहोलमुळे तुमच्या हृदयाचेच नव्हे तर इतर अवयवांचेही नुकसान होते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते हानिकारक असू शकते…

यकृताचे नुकसान: यकृत आपल्या शरीरातून हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते. जे लोक नियमितपणे दारू पितात त्यांचे यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही. अल्कोहोलमुळे यकृताला जळजळ होऊ शकते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

वंध्यत्व: गर्भवती महिलांसाठी दारू पिणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जन्मलेल्या बाळांसाठी धोकादायक असू शकते. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात, फेटल अल्कोहोल सिंड्रोम डिसऑर्डर (FASD) आणि मृत बाळाचा जन्म होऊ शकतो. संशोधनात असे आढळून आले की दारू न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत मद्य सेवन करणाऱ्या महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता 18% कमी होते.

डिसार्थरिया : ज्या अवस्थेत शब्द बोलण्यात अडचण येते त्याला डिसार्थरिया म्हणतात. जास्त मद्यपान केल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे ही स्थिती विकसित होते.

ऑस्टिओपोरोसिस: अल्कोहोल आणि ड्रग्सच्या अतिसेवनामुळे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे आवश्यक पोषक शरीरात शोषले जात नाहीत. त्यामुळे हाडे कमजोर होतात. या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात.

प्रश्न : मीठ कमी खाण्याने काही नुकसान होऊ शकते का?

उत्तर : होय, मीठ कमी खाल्ल्यानेही शरीराला हानी पोहोचते. या…

  • कमी रक्तदाब ही समस्या असू शकते.
  • टाइप 2 मधुमेहाचा बळी ठरु शकता.
  • आळस आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
  • मेंदू आणि हृदयात सूज येऊ शकते.
  • बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

प्रश्न: सामान्य माणसासाठी किती मीठ आणि अल्कोहोल पुरेसे आहे?

उत्तरः ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका सामान्य माणसाने दिवसात फक्त 2 ग्रॅम मीठ खावे. त्याच वेळी, भारतात दारूबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, निरोगी महिलेने एक किंवा त्यापेक्षा कमी पेये आणि निरोगी पुरुषाने दोन किंवा त्याहून कमी पेये पिणे आवश्यक आहे.

कामाची बातमी या मालिकेतील आणखी बातम्या वाचा..

पती लिपस्टिक-बिंदीसाठी पैसे देत नाही:पत्नी गुटखा खाते; वाचा, कोणत्या कारणांसाठी घटस्फोट घेता येतो

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढचे आहे. चार दिवसांपूर्वी एका महिलेने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला असून तिचा पती ती सुंदर नसल्यामुळे टिंगलटवाळी करतो आणि लिपस्टिक-बिंदी घेण्यासाठी पैसेही देत नाही.

यावरून दररोज घरात भांडणे होत असून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. समुपदेशकाने महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र महिला घटस्फोटाच्या मागणीवर ठाम आहे. दोघांचे 2015 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना अद्याप मूल नाही.

कामाची गोष्ट मध्ये आम्ही घटस्फोटाच्या काही वेगवेगळ्या प्रकरणांवर न्यायालयाच्या 4 निर्णयांचा उल्लेख करणार आहोत आणि त्यासंबंधीचे प्रश्न आमच्या तज्ञांकडून जाणून घेणार आहोत… पूर्ण बातमी वाचा..

राहुल गांधींना थंडी वाजत नाही:तुमच्यासोबतही असे घडते का; कमी-जास्त थंडी वाजण्याचे शास्त्र समजून घ्या

#rahulgandhi सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या सोबतच #tshirt देखील ट्रेंडिंगमध्ये आहे. याचे कारण राहुल गांधी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घालूनच फिरतात. थंडीमुळे लोक आठवडाभर आंघोळ करत नाहीत, हिटर आणि बोनफायरसमोर बसतात, कुणालाही थंडी जाणवू नये हे कसे शक्य आहे, हे आजच्या कामाची गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच आपल्याला थंडी का वाजते आणि थंडी न वाजण्याचे कारण काय आहे, हे आपण तज्ञांकडून समजून घेणार आहोत. पूर्ण बातमी वाचा...

रात्रभर बेसिनमध्ये खरकटी भांडी सोडतात का?:जीवाणू पाडतील आजारी, गर्भपाताचा देखील धोका; वास्तू म्हणते पैसा टिकणार नाही

प्रत्येक घरात, आई आणि आजी सूचना देतात की, रात्रीच्या वेळी खरकटी भांडी बेसिनमध्ये सोडू नयेत. यामुळे घरात गरिबी येत असते. त्यामुळे खराकटी भांडी बेसिनमध्ये न ठेवण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आजकाल ही परंपरा बदलली आहे. शहरांमध्ये रात्रभर सिंकमध्ये भांडी तशीच पडून असतात. जी सकाळी घरकाम करणारी स्वच्छ करते.

तुम्हीही असे करत असाल तर एक रिपोर्ट वाचा

अमेरिकेत दरवर्षी 4.80 कोटी लोक दूषित अन्नामुळे आजारी पडतात. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकन लोक दोन दिवस सिंकमध्ये खरकटी भांडी तसेच सोडतात. बरेच लोक आठवड्यातून फक्त 3 वेळा भांडी धुतात. या भांड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे अन्न दूषित होते. अशा वेळी येथील सदस्य नक्कीच आजारी पडतात.

आज कामाची गोष्टमध्ये आपल्याला कळेल की, घाण किंवा खरकटी भांडी सिंकमध्ये जास्त वेळ ठेवली तर त्यातून कोणते आजार होऊ शकतात? पूर्ण बातमी वाचा..

कोविडमध्ये पायांचा रंग बदलू शकतो:जिभेलाही येतील केस, चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार; कोरोनाची 5 विचित्र लक्षणे

कोविड येऊन जवळपास तीन वर्षे झाली आहेत. घसा खवखवण्यासोबतच सर्दी, तीव्र खोकला, श्वासोच्छवास घेण्यास त्रास, ताप आणि अंगदुखीचा त्रास होत असेल तर तो कोविड असू शकतो, असा बहुतेकांचा समज आहे. असे असले तरी, आपण हे सत्य नाकारू शकत नाही की, काही विचित्र लक्षणे नेहमीच कोविडशी संबंधित राहिले आहेत. आज तज्ज्ञांमार्फत आम्ही अशाच 5 लक्षणांबद्दल माहिती सांगत आहोत, जी कोविडची लक्षणे असू शकतात. पूर्ण बातमी वाचा..

त्यावेळची कोरोना लस अजूनही प्रभावी आहे का?:मला बूस्टर डोस मिळाला नाही, मला किती धोका आहे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते किती सुरक्षित आहेत? त्यांना बूस्टर डोस घ्यावा लागेल का? ज्यांना आधीच कोरोना झाला आहे त्यांना काय धोका आहे? आमचे तज्ञ कोरोनाशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरे देत आहेत. पूर्ण बातमी वाचा...

आरोग्य मंत्री राहुल गांधींना मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत:मास्कचे दिवस परतणार आहेत का? 3 पैकी 2 तज्ज्ञ म्हणाले, होय

कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. चीनमध्ये येत्या काही महिन्यांत 80 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. लंडनमधील ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एअरफिनिटीने याचे कारण चीनमध्ये कमी लसीकरण आणि अँटीबॉडीजचा अभाव असल्याचे सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारने राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी कोरोना प्रसार वाढल्याचा दाखला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असताना आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. देश वाचवण्यासाठी यात्रा थांबवा. आज कामाच्या गोष्टीत सविस्तरपणे जाणून घेऊया की, आपल्याला घाबरण्याची गरज आहे की नाही? पूर्ण बातमी वाचा...

दीपिका पदुकोणने भगवे वस्त्र घातले की चिश्ती:या वादात पडू नका, विचार करा; तुम्हाला एखादा रंग का आवडतो!

दीपिका पदुकोणची भगवी बिकिनी हिंदू संघटनांना फारशी पटली नाही. त्याचवेळी मुस्लिम कार्यकर्ते या रंगाला चिश्ती रंग म्हणत आक्षेप घेत आहेत. एका रंगासाठी एवढा गदारोळ माजला आहे. तुम्हाला तो रंग का आवडतो, इतरांना तो का आवडत नाही, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हिंदूंच्या शुभ कार्यासाठी लाल-पिवळा रंग वापरायचा असे का ठरले? लग्नात कपड्यांचा रंग बदलतो, पण कोणत्याही धर्मात शोक व्यक्त करण्यासाठी काळा आणि पांढरा रंग का परिधान केला जातो.

एका अभ्यासानुसार, रंग एखाद्या व्यक्तीच्या मूड आणि वर्तनावर परिणाम करतात. प्रभाव इतका खोलवर होतो की, यामुळे भावना देखील बदलतात. कामाची गोष्टमध्ये आपण कलर सायकॉलॉजी म्हणजेच रंगांच्या मानसिक परिणामाबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्ण बातमी वाचा...

रुम हिटर डोळ्यांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो:तापमान जास्त झाल्यास लागेल आग, सावध न झाल्यास थांबेल श्वास

देशभरात थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धुके होते, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही तीच स्थिती आहे. डोंगरावरही बर्फवृष्टी होत आहे. लोकरीचे कपडे आणि जॅकेट्स व्यतिरिक्त, लोक थंडीपासून वाचण्यासाठी रूम हिटरचा वापर करत आहेत. ग्रामीण भागात लोक शेकोटी किंवा शेगडी पेटवून घर उबदार ठेवतात. जेणेकरून थंडीत आराम मिळेल.

तज्ज्ञांच्या मते, शेकोटी, रूम हीटर किंवा शेगडी पेटवल्याने थंडीत आराम मिळतो, पण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. पूर्ण बातमी वाचा...