आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हविचार, कृती, भावनेचे चक्र असते काय?:जाणून घेऊ भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

मनोज कुलकर्णी। छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले भावनिक व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची भूमिका असणारे विचार, कृती, भावनेचे चक्र कसे काम करते? हेच जाणून घेऊयात जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून.

विचार, कृती आणि भावना हे चक्र आपल्या शरीरात, मेंदूमध्ये अव्याहतपणे सुरू असते. यातली कोणतही गोष्ट कधीही ट्रिगर झाली, तरी हे चक्र पूर्ण होऊनच ती थांबते. म्हणजेच नुसते विचार करून थांबले असे होत नाही. तसा विचार केला की, त्या संदर्भात भावना येतात. कृती होते. हे चक्र सतत सुरू असते.

असे आहे चक्र...

विचार म्हणजे काय असतात, तर स्वतःशी बोलणे. त्यानंतर येते भावना. आपल्या पंचेंद्रियांना काही तरी जाणीव होते. ती माहिती मेंदूमध्ये जाते. मेंदू त्या माहितीचे विश्लेषण करतो. आपण काय करायला हवे, त्या अनुषंगाने एखाद्या रसायनाचा स्त्राव आपल्या शरीरात सुरू होतो. तो आपल्याला एक प्रकारचा संदेश असतो. त्यानुसार आपल्या शरीरावर प्रतिक्रियाही उमटते. म्हणजे भीती वाटणे, आनंद झाला त्यानुसार आपले वर्तन बदलते. भावनेची इतकी मोठी प्रोसेस असते. शरीराने आपण जे काम करतो त्याला कृती म्हणतो. असे हे चक्र आहे.

अनेकदा पहिल्यांदा विचार...

कधी-कधी पहिल्यांदा विचार करतो. चला आज सुट्टीचा दिवस आहे. सिनेमा पाहायला जाऊ या. हा विचार केल्यानंतर तशी भावना आपल्या मनात तयार होते. चित्रपट पाहायला जायचे म्हणजे आपण आनंदी होतो. आपण बाहेर जाऊन लगेच तिकीट बुक करतो किंवा पुढची तयारी करतो. हे विचार पहिल्यांदा मनात आल्यानंतर हे सारे झाले. कधी-कधी कृती पहिल्यांदा होते. सकाळी घाईची वेळ असते. मिस्टरांना ऑफिसला जायचे असते. मिसेसची खूप गडबड सुरू असते. तेवढ्यात लहान मुलाची शाळेला जायची बस येऊन थांबते. त्या सगळ्या गोंधळात ते बाळ ऐकत नाही. मग आई त्या बाळाला एक धपाटा देते आणि स्कूलबसमध्ये पाठवून देते.

नंतर होतो पश्चाताप...

येथे आईने पहिल्यांदा कृती केली. मात्र, बाळ गेल्यानंतर आईला पश्चाताप व्हायला लागतो. विचार यायला लागतात की, आपण उगीचच आपल्या सगळ्या घाईचा राग बाळावर काढला. तिला वाईट वाटायला लागते. तशी भावना तिच्या मनात तयार होते. नंतर बाळ आल्यानंतर ती त्याचे खूप लाड करते. इथे काय झाले, तर पहिल्यांदा कृती केली. नंतर विचार आले. नंतर भावना निर्माण झाली.

कृतीही तशीच होते...

कधी-कधी सकाळी उठल्यानंतर उगीचच आपल्याला नैराश्य ग्रासते. आपला अगदी फुसका बार होतो. त्यामुळे मनातही आपण आज ऑफिसला दांडू मारू. मस्त पडून राहू.थंडीचे दिवस आहेत. मजा करू, असे विचार यायला लागतात. कृतीही तशीच व्हायला लागते. आपण सगळ्या गोष्टी हळूहळू करतो. आपले वर्तन आळशी व्हायला लागते. अशा पद्धतीने विचार, कृती, भावना हे चक्र आपल्या शरीरात सतत सुरू असते. यातली कोणतीही गोष्ट आपण वेगळेपणाने करू शकत नाही. हे विशेष.

वर्तुळ तरच पूर्ण

विचार, कृती, भावना हे चक्र असते. ते सतत आपल्या शरीरात सुरू असते. यातली कोणतीही गोष्ट पहिल्यांदा जरी ट्रिगर झाली, तरी बाकीच्या दोन गोष्टी होऊनच ते पूर्ण होते. या सर्कलचा भावनिक व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेत कसा उपयोग करता येईल, हे येणाऱ्या भागात पाहू.

(टीपः भावनिक बुद्धिमत्तेचा हा विषय सविस्तर जाणून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

जीवन मंत्रचे इतर भाग

1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?

3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!

4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!

5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून

6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?

7) जीवनमंत्र:मोबाइल व्यसनाचा वेग दारूपेक्षा 300 टक्के जास्त; मेंदूवर कंपन्यांचा ताबा, अशी करून घ्या सुटका!

8) डोक्यातला केमिकल लोचा!:यशात 85 टक्के वाटा असणाऱ्या भावनांची निर्मिती होते कशी; जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

9) करिअर कसे निवडावे ?:मुलांचा कल कसा ओळखावा, पालिकांची भूमिका काय असावी, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

10) भावना वैश्विक कशा असतात ?:आपण प्रेमात का पडतो, त्यांचे महत्त्व काय ? जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

11) मूल बंडखोर का होते ?:खोटे का बोलते, पालकांना रिजेक्ट का करते, जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये

12) भावना संसर्गजन्य कशा असतात?:भावना ट्रान्सफर कशा होतात; संगत कोणाची असावी, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये

13) 'भावना' जीव कसा वाचवते?:मित्र कसा होते, आपल्याला अलर्ट कशी करते, जाणून घेऊ जीवन मंत्रमध्ये!

14) जीवघेणा एकटेपणा कसा घालवावा?:स्वतःवरचा नकारात्मक फोकस कसा कमी करावा, जाणून घेऊ आज!

15) झोप उडवणाऱ्या चिंतेचे करायचे काय?:विचारांचा अतिरेक थोपवायचा कसा , जाणून घेऊ आजच्या जीवन मंत्रमध्ये!

16) भावनेतून ऊर्जा कशी मिळते?:जाणून घेऊ जीवन मंत्रच्या आजच्या भागामध्ये, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून

17) फोबिया असतो काय?:भीतीवर मात कशी करावी, जाणून घेऊ राज्य मानसशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांकडून

18) भावना दाबणे धोक्याचे कसे?:शरीरात अखंड वाहणाऱ्या ऊर्जेच्या नदीचे करायचे काय, जाणून घेऊ आज!

19) लव्ह ते ब्रेकअप:श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण कसे घडते, टोकाची मानसिकता का होते? जाणून घेऊ!

बातम्या आणखी आहेत...