आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा#rahulgandhi सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या सोबतच #tshirt देखील ट्रेंडिंगमध्ये आहे. याचे कारण राहुल गांधी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घालूनच फिरतात. थंडीमुळे लोक आठवडाभर आंघोळ करत नाहीत, हिटर आणि बोनफायरसमोर बसतात, कुणालाही थंडी जाणवू नये हे कसे शक्य आहे, हे आजच्या कामाची गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच आपल्याला थंडी का वाजते आणि थंडी न वाजण्याचे कारण काय आहे, हे आपण तज्ञांकडून समजून घेणार आहोत.
आमचे तज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार, अपोलो, हैदराबाद, वरिष्ठ सल्लागार आणि फिजिशियन डॉ. पी. व्यंकटा कृष्णन, आर्टेमिस हॉस्पिटल, गुरुग्राम, पोषणतज्ञ अंजू विश्वकर्मा आणि योगगुरू उमेश श्रीमाली, उदयपूर हे आहेत.
प्रश्न: आपल्याला थंडी का वाजते?
उत्तर : हिवाळ्यात आपल्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानापेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्या शरीरातून उष्णता बाहेर पडते आणि शरीराचे तापमान कमी होते. यामुळे आपल्याला थंडी जाणवू लागते. त्वचेद्वारेच आपल्याला सभोवतालचे तापमान जाणवते.
प्रश्न : राहुल गांधींप्रमाणेच इतरही अनेक लोक आहेत ज्यांना थंडी वाजत नाही. असे का? यामागे काही शास्त्र आहे का?
उत्तर: याची 8 मुख्य कारणे आहेत...
प्रश्न: एखाद्या विशिष्ट्य प्रकारचे अन्न थंडीची भावना कमी करू शकते का?
उत्तर: होय अगदी. हिवाळ्यात अशा गोष्टी ज्या सहज पचत नाहीत, त्यामुळे आपले शरीर उबदार राहते. निरोगी चरबी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने समृद्ध असलेले अन्न आपल्याला थंडीपासून वाचवतात.
रूट भाज्या: मुळा, सलगम, रताळे यांसारख्या मूळ भाज्या सहज पचत नाहीत. म्हणूनच त्या आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवण्याचे काम करतात.
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट: कार्बोहायड्रेट्स ओट्स, धान्य आणि बटाटे मध्ये कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स स्वरूपात आढळतात.
अंडी आणि केळी: केळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि मॅग्नेशियम आपल्या थायरॉईड आणि एड्रेनल ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. या ग्रंथी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. दुसरीकडे, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या अंड्यांमध्ये भरपूर ऊर्जा असते. हे आपल्या शरीराला हिवाळ्यात संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
कॅफिन आणि मसाले: आपल्या शरीरातील चयापचय कॅफीन आणि मसाल्यांमुळे गतिमान होते. यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते.
लोहयुक्त पदार्थ: लोहाच्या कमतरतेमुळेही अनेकांना थंडी जास्त जाणवते. त्यामुळे सर्दी टाळण्यासाठी लाल मांस, पालक यासारख्या गोष्टी खाव्यात.
हेल्दी फॅट्स: देशी तूप, ड्रायफ्रुट्स आणि नट्समध्ये हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे थंडीपासून बचाव करण्यासाठी काम करतात.
पाणी: लोक हिवाळ्यात फार कमी पाणी पितात. त्यामुळे रक्त पातळ होऊन थंडी जास्त वाजते. म्हणूनच पिण्याचे पाणी खूप महत्वाचे आहे. सरळ पाणी पिणे शक्य नसेल तर त्यात आले, तुळस, दालचिनी घालून उकळून पिऊ शकता. याशिवाय तुम्ही अनेक प्रकारचे हेल्दी चहा पिऊ शकता.
त्याचप्रमाणे ध्यान केल्याने तुम्हाला थंडी कमी जाणवू शकते
प्रश्न: थंडीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
उत्तरः थंडीमुळे आपले शरीर असे रिअॅक्ट करते म्हणजेच प्रतिक्रिया देते…
रंग पिवळा होतो: आपल्या शरीराच्या संपूर्ण त्वचेवर थर्मोसेप्टर्स असतात. थर्मोरेसेप्टर्स हे मज्जासंस्थेच्या पेशी आहेत ज्या तापमानातील बदल ओळखतात. हिवाळ्यात, हे थर्मोसेप्टर्स आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात. जेव्हा ते थंड होऊ लागतात तेव्हा मेंदू रक्तवाहिन्यांना सिग्नल पाठवतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे हिट लॉस कमी होते आणि शरीरातील उष्णता कायम राहते. कमी रक्तप्रवाहामुळे शरीराचा रंग पिवळा होतो.
थरथरणे: जेव्हा आपण थरथर कापतो तेव्हा शरीराच्या अनेक स्नायूंचा वापर केला जातो. यामुळे शरीराच्या ऊतींमध्ये उष्णता निर्माण होते.
केस उभे राहणे : हिवाळ्यात शरीरावरील लहान केसांखालील स्नायू आकुंचन पावतात आणि केस उभे राहतात. त्यांना रोंगटे असे म्हणतात. केस आपल्या त्वचेवर एक इन्सुलेट थर बनवतात ज्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. मात्र, मानवी शरीरावरील उत्परिवर्तनामुळे आता केस कमी झाले आहेत, त्यामुळे उबदार कपडेही घालावे लागतात.
हार्मोन्स रिलीज होतात : हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी आपले शरीर चयापचय गती वाढवते. यासाठी अनेक प्रकारची हार्मोन्स आणि प्रथिने बाहेर पडतात.
प्रश्न: काही लोकांना जास्त थंडी का वाटते? ही समस्या असू शकते का?
उत्तरः अति थंडीच्या स्थितीला कोल्ड इंटोलेरेंस म्हणतात. हे बहुतेक अशा लोकांबाबत घडते जे काही जुनाट आजाराने ग्रस्त आहेत किंवा ज्यांच्या शरीरावर चरबी कमी आहे.
त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी खालील क्रिएटिव्ह वाचा.
प्रश्नः थंडीत लोक आजारी का पडतात?
उत्तर: याची मुख्यतः 3 कारणे आहेत...
प्रश्न: थंडी पडल्यावर आपण का थरथर कापतो?
उत्तरः जेव्हा खूप थंडी असते तेव्हा थरथर कापतो. वास्तविक, जेव्हा शरीराला कळते की, अधिक तापमान आवश्यक आहे, तेव्हा मेंदू आपल्या स्नायूंना थरथरणारे सिग्नल पाठवतो. त्यामुळे शरीराचे आणि सभोवतालचे तापमान नियंत्रित राहून थंडीचा अनुभव कमी होऊ लागतो.
थरथरामुळे स्नायूंचा व्यायाम होतो ज्यामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे थंडी कमी जाणवते.
अखेरीस पण महत्त्वाचे
जेव्हा आपण एखाद्याला थरथर कापताना पाहतो तेव्हा आपल्याला थंडी का वाटते?
यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या एका संशोधनानुसार, एखाद्याला थंडी वाजताना किंवा थरथरताना पाहिल्याने थंडी वाजते. ब्राइटन आणि ससेक्सच्या मेडिकल स्कूलमध्ये केलेल्या या संशोधनात स्वयंसेवकांना थंड पाण्यात हात बुडवतानाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. यानंतर स्वयंसेवकांच्या शरीराचे तापमान कमी झाल्याचे निदर्शनास आले.
कामाची गोष्ट यामध्ये आणखी काही लेख वाचा:
रात्रभर बेसिनमध्ये खरकटी भांडी सोडतात का?:जीवाणू पाडतील आजारी, गर्भपाताचा देखील धोका; वास्तू म्हणते पैसा टिकणार नाही
प्रत्येक घरात, आई आणि आजी सूचना देतात की, रात्रीच्या वेळी खरकटी भांडी बेसिनमध्ये सोडू नयेत. यामुळे घरात गरिबी येत असते. त्यामुळे खराकटी भांडी बेसिनमध्ये न ठेवण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आजकाल ही परंपरा बदलली आहे. शहरांमध्ये रात्रभर सिंकमध्ये भांडी तशीच पडून असतात. जी सकाळी घरकाम करणारी स्वच्छ करते.
तुम्हीही असे करत असाल तर एक रिपोर्ट वाचा
अमेरिकेत दरवर्षी 4.80 कोटी लोक दूषित अन्नामुळे आजारी पडतात. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकन लोक दोन दिवस सिंकमध्ये खरकटी भांडी तसेच सोडतात. बरेच लोक आठवड्यातून फक्त 3 वेळा भांडी धुतात. या भांड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात, त्यामुळे अन्न दूषित होते. अशा वेळी येथील सदस्य नक्कीच आजारी पडतात.
आज कामाची गोष्टमध्ये आपल्याला कळेल की, घाण किंवा खरकटी भांडी सिंकमध्ये जास्त वेळ ठेवली तर त्यातून कोणते आजार होऊ शकतात? पूर्ण बातमी वाचा..
कोविडमध्ये पायांचा रंग बदलू शकतो:जिभेलाही येतील केस, चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार; कोरोनाची 5 विचित्र लक्षणे
कोविड येऊन जवळपास तीन वर्षे झाली आहेत. घसा खवखवण्यासोबतच सर्दी, तीव्र खोकला, श्वासोच्छवास घेण्यास त्रास, ताप आणि अंगदुखीचा त्रास होत असेल तर तो कोविड असू शकतो, असा बहुतेकांचा समज आहे. असे असले तरी, आपण हे सत्य नाकारू शकत नाही की, काही विचित्र लक्षणे नेहमीच कोविडशी संबंधित राहिले आहेत. आज तज्ज्ञांमार्फत आम्ही अशाच 5 लक्षणांबद्दल माहिती सांगत आहोत, जी कोविडची लक्षणे असू शकतात. पूर्ण बातमी वाचा..
त्यावेळची कोरोना लस अजूनही प्रभावी आहे का?:मला बूस्टर डोस मिळाला नाही, मला किती धोका आहे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते किती सुरक्षित आहेत? त्यांना बूस्टर डोस घ्यावा लागेल का? ज्यांना आधीच कोरोना झाला आहे त्यांना काय धोका आहे? आमचे तज्ञ कोरोनाशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरे देत आहेत. पूर्ण बातमी वाचा...
आरोग्य मंत्री राहुल गांधींना मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत:मास्कचे दिवस परतणार आहेत का? 3 पैकी 2 तज्ज्ञ म्हणाले, होय
कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. चीनमध्ये येत्या काही महिन्यांत 80 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. लंडनमधील ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एअरफिनिटीने याचे कारण चीनमध्ये कमी लसीकरण आणि अँटीबॉडीजचा अभाव असल्याचे सांगितले. दुसरीकडे केंद्र सरकारने राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी कोरोना प्रसार वाढल्याचा दाखला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत असताना आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. देश वाचवण्यासाठी यात्रा थांबवा. आज कामाच्या गोष्टीत सविस्तरपणे जाणून घेऊया की, आपल्याला घाबरण्याची गरज आहे की नाही? पूर्ण बातमी वाचा...
दीपिका पदुकोणने भगवे वस्त्र घातले की चिश्ती:या वादात पडू नका, विचार करा; तुम्हाला एखादा रंग का आवडतो!
दीपिका पदुकोणची भगवी बिकिनी हिंदू संघटनांना फारशी पटली नाही. त्याचवेळी मुस्लिम कार्यकर्ते या रंगाला चिश्ती रंग म्हणत आक्षेप घेत आहेत. एका रंगासाठी एवढा गदारोळ माजला आहे. तुम्हाला तो रंग का आवडतो, इतरांना तो का आवडत नाही, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हिंदूंच्या शुभ कार्यासाठी लाल-पिवळा रंग वापरायचा असे का ठरले? लग्नात कपड्यांचा रंग बदलतो, पण कोणत्याही धर्मात शोक व्यक्त करण्यासाठी काळा आणि पांढरा रंग का परिधान केला जातो.
एका अभ्यासानुसार, रंग एखाद्या व्यक्तीच्या मूड आणि वर्तनावर परिणाम करतात. प्रभाव इतका खोलवर होतो की, यामुळे भावना देखील बदलतात. कामाची गोष्टमध्ये आपण कलर सायकॉलॉजी म्हणजेच रंगांच्या मानसिक परिणामाबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्ण बातमी वाचा...
रुम हिटर डोळ्यांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो:तापमान जास्त झाल्यास लागेल आग, सावध न झाल्यास थांबेल श्वास
देशभरात थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत धुके होते, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही तीच स्थिती आहे. डोंगरावरही बर्फवृष्टी होत आहे. लोकरीचे कपडे आणि जॅकेट्स व्यतिरिक्त, लोक थंडीपासून वाचण्यासाठी रूम हिटरचा वापर करत आहेत. ग्रामीण भागात लोक शेकोटी किंवा शेगडी पेटवून घर उबदार ठेवतात. जेणेकरून थंडीत आराम मिळेल.
तज्ज्ञांच्या मते, शेकोटी, रूम हीटर किंवा शेगडी पेटवल्याने थंडीत आराम मिळतो, पण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. पूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.