आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरविदेशातून राहुल यांनी मोदी सरकारला 7 वेळा घेरले:BJP म्हणते- भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र; जाणून घ्या- राहुल यांचा फायदा काय?

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ला केला जातो. बीबीसीच्या बाबतीतही तेच झालं. माझा फोन टॅप केला जातोय. विरोधकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून हा एक दबाव आहे, ज्याचा सतत सामना करावा लागतो.’

हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आहे. राहुल गांधींनी परदेशातून मोदी सरकारवर टीका करण्याची ही सातवी वेळ आहे. वास्तविक, राहुल सात दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत.

राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राहुल परदेशी भूमीवर भारताची बदनामी करत आहेत.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये समजेल की, राहुल गांधींनी किती वेळा मोदी सरकारवर परदेशी भूमीवरून टीका केली आहे? त्यांचा उद्देश काय आहे, हे तज्ज्ञांकडून कळेल?

6 वर्षातील ते 7 प्रसंग जेव्हा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर परदेशी भूमीवरून हल्ला चढवला

1. मे 2022 ब्रिटन: भारताचा आवाज दाबला गेला

काँग्रेस नेते राहुल गांधी मे 2022 मध्ये लंडनमध्ये 'आयडियाज फॉर इंडिया' परिषदेत बोलताना.
काँग्रेस नेते राहुल गांधी मे 2022 मध्ये लंडनमध्ये 'आयडियाज फॉर इंडिया' परिषदेत बोलताना.

'आयडियाज फॉर इंडिया' ही परिषद लंडनमध्ये होत होती. या परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. राहुल म्हणाले की, 'आत्म्याला आवाजाशिवाय अर्थ नाही, भारताचा आवाज दाबला गेला आहे. काँग्रेस आता भारतासाठी लढत आहे. ही वैचारिक लढाई आहे. पाकिस्तानप्रमाणेच ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्ये आणि संस्था पोकळ केल्या जात आहेत.

राहुल पुढे म्हणाले की, सध्या भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजपने देशभर रॉकेल शिंपडले आहे. एक ठिणगी पडली आणि आम्ही सर्वजण एका मोठ्या गोंधळात सापडणार आहोत. जनतेला एकत्र आणून लोकांमध्ये पेटलेला संताप आणि आग शांत करण्याची जबाबदारी ही काँग्रेसची आहे.’ यावेळी राहुल यांनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली.

ते म्हणाले की, रशिया युक्रेनमध्ये जे काही करत आहे, तोच प्रकार चीन भारतातील डोकलाम आणि लडाखमध्ये करत आहे. चीनने भारतातील डोकलाम आणि लडाखमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे आणि अरुणाचल प्रदेश आणि लडाखला भारताचा भाग मानण्यास नकार दिला आहे.

2. ऑगस्ट 2018 ब्रिटन आणि जर्मनी: लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या रागाचा फायदा घेतला जातोय

राहुल गांधी ऑगस्ट 2018 मध्ये जर्मनीतील हॅम्बर्ग येथे एका कार्यक्रमात बोलताना.
राहुल गांधी ऑगस्ट 2018 मध्ये जर्मनीतील हॅम्बर्ग येथे एका कार्यक्रमात बोलताना.

राहुल गांधी त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते म्हणाले की, ‘भारतात रोजगाराची मोठी समस्या आहे, मात्र पंतप्रधान यावर बोलू इच्छित नाहीत. चीन दररोज 50,000 लोकांना रोजगार देतो, तर भारतात फक्त 400 लोकांना रोजगार मिळतो.’

यावेळी राहुल गांधी यांनी मोदींची तुलना ट्रम्प यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याशी केली. ते म्हणाले की, ‘लोकांचे रोजगारासारखे प्रश्न सोडवण्याऐवजी हे नेते त्यांच्या रोषाचा फायदा घेतात. असे करून हे लोक देशाचे नुकसान करतात.’ ते म्हणाले की, ‘दलित, अल्पसंख्याक आणि मागासलेल्यांना आता सरकारी लाभ मिळत नाहीत. गरिबांच्या योजनांचे पैसे आता काही बड्या कॉर्पोरेट्सना दिले जात आहेत.’

आयएस या दहशतवादी संघटनेच्या निर्मितीचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी लोकांना विकास प्रक्रियेपासून दूर ठेवल्यास देशातही अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा दिला. ते म्हणाले की, ‘21 व्या शतकात लोकांना बाहेर ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. 21व्या शतकात तुम्ही लोकांना दृष्टीकोन दिला नाही तर दुसरा कोणीतरी देईल.’

पंतप्रधान मोदींनी स्वतः सावधगिरी बाळगली असती तर चीनसोबत डोकलाम वाद झाला नसता, असे राहुल म्हणाले. डोकलाम हा वेगळा मुद्दा नाही, असे ते म्हणाले. तो एका प्रक्रियेचा भाग होता. पंतप्रधानांनी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले असते तर हे प्रकार रोखता आले असते, असेही राहुल गांधी म्हणाले.

3. मार्च 2018 मलेशिया: मी नोटाबंदीचा प्रस्ताव कचरापेटीत टाकला असता

मलेशिया दौऱ्यात राहुल गांधींनी 2016 मध्ये केलेल्या नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. भारतीय समुदायाला संबोधित करताना राहुल म्हणाले होते की, जर मी पंतप्रधान असतो आणि मला कोणी नोटाबंदीचा प्रस्ताव देणारी फाईल दिली असती तर मी ती कचऱ्याच्या डब्यात, खोलीबाहेर किंवा कबाड्यात फेकून दिली असती.

ते म्हणाले, ‘मी अशा प्रकारेच या प्रस्तावाची अंमलबजावणी केली असती, कारण माझ्या मते, नोटाबंदीचे असेच केले पाहिजे होते, कारण ते कोणासाठीही चांगले नाही.’

4. मार्च 2018 सिंगापूर: काही लोक निवडणुका जिंकण्यासाठी द्वेष आणि हिंसाचाराचा वापरत करताहेत

2018 मध्ये सिंगापूरच्या ली कुआन यी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे एका कार्यक्रमात पॅनल चर्चेदरम्यान राहुल गांधी.
2018 मध्ये सिंगापूरच्या ली कुआन यी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे एका कार्यक्रमात पॅनल चर्चेदरम्यान राहुल गांधी.

सिंगापूरच्या ली कुआन यी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये एका पॅनल डिस्कशनमध्ये बोलताना राहुल म्हणाले होते की, भारताचा दृष्टीकोन हा आहे की, माणूस कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा भाषेचा असो, त्याला घरासारखे वाटले पाहिजे. ते म्हणाले की, काही लोक निवडणुका जिंकण्यासाठी द्वेष आणि हिंसाचाराचा अवलंब करत आहेत. आमची दृष्टी लोकांना जोडणे आहे.

राहुल म्हणाले होते की, मला माझ्या देशाचा अभिमान कशामुळे वाटतो, असे विचाराल तर ती बहुलवादाची कल्पना आहे. कल्पना अशी आहे की भारतातील लोक त्यांना हवे ते बोलू शकतात, त्यांना हवे ते करू शकतात आणि त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

ते म्हणाले होते की, लोक न्यायासाठी न्यायव्यवस्थेकडे जातात, पण पहिल्यांदाच चार न्यायाधीश न्यायासाठी लोकांसमोर आले. व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेवर अतिशय आक्रमक आणि संघटित हल्ला होत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

जर तुम्ही पत्रकारांशी, इंडस्ट्रीतील लोकांशी बोललात तर तेही तुम्हाला सांगतील की, आम्हाला भीती वाटते. त्यामुळे सर्वसाधारणपणे भीतीचे वातावरण आहे.

5. जानेवारी 2018 बहरीन: सरकार नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरले

काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर बहरीनला पोहोचले. अनिवासी भारतीयांना संबोधित करताना राहुल म्हणाले होते की, आज देशात विचित्र परिस्थिती आहे. रोजगार निर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि स्पष्टपणे रागावलेले दिसत आहेत.

हे टाळण्यासाठी सरकार जातीय आणि धार्मिक उन्माद निर्माण करत आहे. लोकांनी काय खावे आणि काय नाही हे देशातील फुटीरतावादी शक्ती ठरवत आहेत.

देशात विघटनाची परिस्थिती निर्माण होत आहे. दलितांना मारहाण केली जात आहे, पत्रकारांना धमकावले जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करून पुन्हा नव्या भारताची निर्मिती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

6. सप्टेंबर 2017 अमेरिका: आज द्वेष आणि हिंसाचाराचे राजकारण सुरू

2017 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी.
2017 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधी.

सप्टेंबर 2017 मध्ये त्यांच्या दोन आठवड्यांच्या यूएस दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसिद्ध कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे संबोधित केले. संसदेला अंधारात ठेवून नोटाबंदी आणली, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था ढासळली, असे ते म्हणाले होते.

आज द्वेष आणि हिंसाचाराचे राजकारण होत असल्याचे ते म्हणाले होते. हिंसेचा अर्थ माझ्यापेक्षा चांगला कोणाला माहित आहे कारण मी त्यात माझे आजी आणि वडील गमावले आहेत. अहिंसेची विचारधारा आज धोक्यात आली असली तरी तीच विचारधारा मानवतेला पुढे नेऊ शकते.

राहुल म्हणाले की, 'आम्ही माहितीचा अधिकार दिला, पण मोदी सरकारने तो दडपला. आता सरकारमध्ये काय चालले आहे, लोकांना कळत नाही. जातीयवादी शक्ती प्रबळ होत आहेत, उदारमतवादी पत्रकारांना गोळ्या घातल्या जात आहेत.

राहुल म्हणाले होते की, भारतात दररोज 30,000 तरुण जॉब मार्केटमध्ये येतात, परंतु त्यापैकी केवळ 450 जणांनाच रोजगार मिळतो. ही परिस्थिती आज भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. रोजगाराची समस्या वाढत आहे कारण आजकाल फक्त टॉप 100 कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. रोजगार वाढवायचा असेल तर छोट्या आणि मध्यम कंपन्यांनाही प्रोत्साहन द्यावे लागेल.

राजकीय जाणकारांकडून जाणून घ्या राहुल यांच्या विदेशात सरकारवर टीका करण्यामागील 5 कारणे

1. विरोधकांचे काम टीका करणे : रशीद किडवई

  • राजकीय तज्ज्ञ रशीद किडवई म्हणतात की, राजकीय पक्षांचे काम टीका करणे असते. सकारात्मक बोलल्याने फायदा होत नाही. भाजप विरोधी पक्षात असतानाही तेच करायचे.
  • भाजप जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका करत असते. मेडिसन स्क्वेअरवर सप्टेंबर 2014 मध्येही पंतप्रधान मोदी विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

2. सोशल मीडियाच्या जमान्यात भारत आणि परदेशात असे म्हणणे योग्य नाही

  • किडवई म्हणतात की, आज जेव्हा प्रत्येकाला सर्वकाही रिअल टाइमवर मिळत आहे, तेव्हा देश-विदेशाबद्दल बोलणे समर्थनीय नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त भारतातच नाहीत. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती चंदिगडमध्ये बोलली की लंडनमध्ये, त्याने काही फरक पडत नाही.
  • आज संचार माध्यमाचे रूप सर्वत्र आहे. अशा स्थितीत राहुल गांधी देशाची बदनामी करत आहेत, असे म्हणणे योग्य नाही.
  • देशात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय शिष्टाचाराचा अभाव आहे. त्यामुळे जे आरोप केले जातात ते अतिशय टोकदार आणि वैयक्तिक आहेत.
  • राजकारणात मतभेद होणे साहजिक आहे, पण मतभिन्नता असणे विचित्र आहे.

3. देशात राहिलो तर सरकारवर टीका कराल आणि परदेशात गेलात तर सरकारची स्तुती करा असा नियम नाही : अभय दुबे

  • राजकीय तज्ज्ञ अभय दुबे म्हणतात की, जो कोणी भारताचा नागरिक आहे तो भारत आणि तेथील व्यवस्थेबद्दल कुठेही बोलू शकतो.
  • राहुल विरोधी पक्षनेते असतील तर ते सरकारवर टीका करतील. हा काय नियम आहे की आपण देशात राहिलो तर सरकारवर टीका करू आणि परदेशात गेलो तर सरकारचे गुणगान करू.
  • सरकार हा देशाचा समानार्थी शब्द नाही. सरकार तात्पुरते आहे म्हणजे ते येत-जात राहते आणि देश शाश्वत असतो. त्यामुळे सरकारच्या कामांवर टीकाही होईल, स्तुतीही होईल.
  • पंतप्रधान मोदी परदेशात गेल्यावर नेहरूंवरही टीका करतात. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत काहीही झाले नाही, असे म्हटले जाते. हे सर्व त्यांनी परदेशी भूमीवरच सांगितले आहे.

4. राहुल यांना कोणताही लाभ मिळणार नाही

  • किडवाई सांगतात की, राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला, यात त्यांनी चीनपासून अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
  • गुजरात आणि ईशान्येच्या निवडणुकांवर त्याचा राजकीय परिणाम होत नसेल, तर केंब्रिज विद्यापीठात चर्चा करुनही काही परिणाम होणार नाही.
  • राहुल गांधी असे काही बोलत नाहीत जे देशात बोलले गेले नाही. राहुल गांधी देशाप्रती संवेदनशील नाहीत, हे दाखवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष नक्कीच करतात.

5. भारत संघ आणि भारत सरकार यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न

  • भारत संघ आणि भारत सरकार यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सध्या देशात प्रयत्न सुरू असल्याचे किडवाई सांगतात. म्हणजे एक नागरिक म्हणून माझी देशाप्रती असलेली बांधिलकी सरकारप्रती असणार नाही.
  • अशा परिस्थितीत तुम्ही सरकारवर टीका केली तर देशावर टीका करत आहात, असे वातावरण निर्माण केले जात आहे.
  • तसेच राहुल आणि अनेक विरोधी पक्षांच्या विश्वासार्हतेचा अभाव आहे. जेव्हा अशी प्रकरणे येतात तेव्हा सरकार जाणीवपूर्वक त्यांची विश्वासार्हता कमकुवत करण्याचा प्रयत्न करते.
  • विरोधक फारसे भोळे आहेत असेही नाही. संधी आली की विरोधकही सरकारच्या हेतूवर आणि निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये असे आणखी काही मनोरंजक लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

देशात एकूण 4033 आमदार, काँग्रेसचे 658:2014 मध्ये 24% आमदार काँग्रेसचे होते, आता फक्त 16% शिल्लक, 5 राज्यात 0 आमदार

निवडणूक आयुक्तांबाबत SC च्या निर्णयाचा सध्या परिणाम नाही:2024 च्या निवडणुका सरकारने निवडलेल्या आयुक्तांच्या नेतृत्त्वातच

‘कॅनल’चे शहर व्हेनिस झाले कोरडे:हुणांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मच्छीमारांनी वसवले, दरवर्षी येतात 2 कोटी पर्यटक

बातम्या आणखी आहेत...