आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरमुलीचा मुलगा होऊन विद्यार्थिनीशी लग्न:लिंग बदलून लग्न करणे गुन्हा आहे का? शिखंडीचेही लिंगपरिवर्तन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सुरुवातीपासूनच माझ्यात मुलासारखे फिलिंग होते. आम्ही चार बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाही. अशा स्थितीत माझ्या मनात एक खंत निर्माण झाली होती. त्यामुळे मुलांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे कपडे घालत. मी विचार केला होता की, मला माझे लिंग बदलायचेच आहे.’

हे शब्द राजस्थानचे पीटी शिक्षक आरव (पूर्वीची मीरा) यांचे आहेत. जे 2021 मध्ये अंतिम शस्त्रक्रिया करून मुलीचे मुलगा झाला. 4 नोव्हेंबर 2022 रोजी, 30 वर्षीय आरवने हिंदू रितीरिवाजांनुसार त्याचीच विद्यार्थिनी 21 वर्षीय कल्पना हिच्याशी लग्न केले.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये अशा विवाहाचा वेगवेगळा कायदा काय आहे? हे आम्ही सांगत आहोत.

प्रश्न 1 : शस्त्रक्रियेद्वारे लिंग बदलून विवाह करणे कायदेशीर आहे की बेकायदेशीर?

उत्तरः भारतात वेगवेगळ्या धर्मांमध्ये लग्नासाठी वेगवेगळे कायदे आहेत. लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्ती हिंदू असतील तर त्यांचा विवाह हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत होईल. या कायद्यानुसार विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो. लग्नाच्या वेळी स्त्रीचे वय 18 वर्षे आणि पुरुषाचे वय 21 वर्षे असावे.

लग्नाआधी लग्न करणाऱ्या दोघांनी लिंग बदलून स्त्री किंवा पुरुष झाले, असा कायद्यात उल्लेख नाही. अशा परिस्थितीत मीरापासून आरव आणि त्यांची विद्यार्थिनी कल्पना हिच्याशी राजस्थानमधील शिक्षकाचा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार कायदेशीर मानला जाईल.

4 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगा झालेल्या आरवने कल्पनाशी लग्न केले.
4 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगा झालेल्या आरवने कल्पनाशी लग्न केले.

प्रश्न 2: जर राजस्थानमध्ये लिंग बदलून विवाह केलेले लोक इतर धर्माचे असते, तर हा विवाह कायदेशीर ठरला असता का?

उत्तर: जैन, बौद्ध आणि शीख धर्मातील विवाह देखील हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत केले जातात. या धर्मांच्या बाबतीतही दोन महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली- विवाह स्त्री-पुरुष असावा आणि दुसरी- लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असावे.

याशिवाय शिखांचे लग्नही आनंद कारज विवाह कायदा 2012 अंतर्गत केले जातात. याअंतर्गत शिखांचे लग्न हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत होत नसून आनंद कारज विवाह कायदा, 2012 अंतर्गत नोंदवले जातात.

ख्रिश्चन: भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा 1872 नुसार, पहिली अट- विवाह एक स्त्री आणि पुरुष असावा आणि दुसरी- लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असावे.

प्रश्न 3: मुस्लिमांमध्ये असे विवाह वैध आहेत का?

उत्तरः मुस्लिम मुला-मुलींचे विवाह त्यांच्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार होतात, ज्याबाबत संसदेने कायदा केलेला नाही.

वकील आणि LGBTQ + कार्यकर्ती सौम्या सक्सेना म्हणतात की, काजियात म्हणजेच इस्लामिक न्यायालय लिंग बदल स्वीकारतात की नाही. जर ते सहमत नसेल, तर कजियतसोबत लिंग बदलल्यानंतर लग्न करणे कठीण होईल. जर त्यांनी बाहेर लग्न केले तर ते कायदेशीररित्या वैध ठरणार नाही. वास्तविक असे एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नाही.

प्रश्न 4: भिन्न धर्मातील किंवा देशांतील लोक लिंग बदलानंतर कायदेशीररित्या विवाह करू शकतात का?

उत्तरः भिन्न धर्माच्या किंवा देशांतील दोन लोकांच्या विवाहाची नोंदणी विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत करता येते.

प्रश्न 5: लिंग बदलानंतर लग्नासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तरः वकील सौम्या सक्सेना म्हणतात की, लैंगिक शस्त्रक्रियेनंतर, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शपथपत्राच्या मदतीने, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसारख्या सरकारी कागदपत्रांमध्ये नाव आणि लिंग बदलले आहे की नाही. ते पाहिले जाते. असे केले नाही तर विवाह कायदेशीररित्या वैध ठरणार नाही. कारण देशात समलिंगी विवाह वैध नाही. जर एखाद्या ट्रान्सजेंडरने आपाल्या कागदपत्रात बदला केलेला असेल आणि त्यात त्याचे लिंग स्त्री ऐवजी पुरुष केले असेल तर तो हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह करू शकतो.

प्रश्न 6: आरवने मुलगा म्हणून मुलीशी लग्न केल्याचे प्रकरण काय आहे?

उत्तरः 2013 मध्ये मीरा (आता आरव) हिला राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील नागला येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात पीटीआयची नोकरी मिळाली. तर कल्पना या शाळेत शिकत असे. 2016 मध्ये कल्पना 10वीत होती आणि यादरम्यान तिने कबड्डीमध्ये भाग घेतला. इथेच मीरा (आरव) आणि कल्पना यांची मैत्री झाली.

ही मैत्री दोन वर्षे दोघींमध्ये कायम होती. 2018 मध्ये मीराने कल्पनाला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा तिने होकार दिला. पण, सगळ्यात मोठी कोंडी अशी होती की, दोन्ही मुलींचे लग्न झाले असते, तर समाज किंवा कुटुंबाला ते मान्य नसते. ते कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे ठरले असते.

अशा परिस्थितीत 2019 मध्ये मीराने तिचे लिंग बदलण्याचा विचार केला. आरव (पूर्वी मीरा) सांगते की, मला पहिल्यापासूनच मुलांसारखे वाटायचे. 2010 मध्ये मी 12वीत असताना लिंग बदलाची बातमी वाचली होती. तेव्हापासून माझे लिंग बदलले पाहिजे असे मनात ठरवले होते. अशा परिस्थितीत जेव्हा कल्पनाने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला तेव्हा तिचा लिंग बदलाचा हेतू पक्का झाला.

यानंतर आम्ही आमच्या कुटुंबीयांना सांगितले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 2 वर्षांपूर्वी 2020 मध्ये लिंग बदलले. आरवने सांगितले की, शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आम्ही घरच्यांना सांगितले की, आम्हाला लग्न करायचे आहे, त्यामुळे त्यांनी होकार दिला. मी आधीच सांगितले होते की मी लिंग बदल करत आहे. त्यामुळे कोणीही आक्षेप घेतला नाही. यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधला आणि 25 डिसेंबर 2019 रोजी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये दुसरी तर अंतिम शस्त्रक्रिया डिसेंबर 2021 मध्ये तिसरी शस्त्रक्रिया झाली.

आरव आणि त्याची पत्नी कल्पना.
आरव आणि त्याची पत्नी कल्पना.

प्रश्न 7: याआधी असे कोणतेही प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे का? जर होय, तर न्यायालयाचा निर्णय काय होता?

उत्तरः होय तसे झाले होते. 2019 मध्ये, मद्रास हायकोर्टाने अरुण कुमार आणि श्रीजा यांच्या प्रकरणात हिंदू विवाह कायद्यांतर्गत अशा विवाहाला मान्यता दिली होती. अरुण कुमार आणि श्रीजाने ऑक्टोबर 2018 मध्ये तुतिकोरिन येथील एका मंदिरात लग्न केले होते. पण त्यांनाही लग्नाची नोंदणी करावी लागली. लग्नाची नोंदणी करण्यासाठी ते रजिस्ट्रारकडे पोहोचले तेव्हा त्यांनी श्रीजा ट्रान्सजेंडर असल्याने लग्नाची नोंदणी करण्यास नकार दिला. यानंतर दोघेही कोर्टात पोहोचले.

न्यायमूर्ती जी आर स्वामिनाथन यांनी निकाल देताना सांगितले की, "कधीकधी काही निकाल देताना फक्त बाह्य डोळ्यांची नव्हे तर आतील प्रेमाची आणि डोळ्यांची गरज असते." ते म्हणाले की, हा निकाल देताना आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही. ते म्हणाले की, सेक्स आणि लिंग या दोन भिन्न गोष्टी आहेत. लिंग हे जन्मतःच घडते तर प्रत्येकाला लिंग निवडण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. मग त्याला स्त्री किंवा पुरुष म्हणून जगायचे असेल तसा निर्णय प्रत्येकाला घेता येतो.

तामिळनाडूचे अरुण कुमार आणि श्रीजा.
तामिळनाडूचे अरुण कुमार आणि श्रीजा.

प्रश्न 8: अशा विवाहांचा काही इतिहास आहे का?

उत्तरः पुरुष झाल्यानंतर स्त्रीशी लग्न करण्याचे प्रकरण महाभारतात शिखंडीच्या रूपात पाहायला मिळते. शिखंडीचा जन्म पांचाल राजा द्रुपदाकडे मुलगी म्हणून झाला होता.

त्यांच्या जन्माच्या वेळी एक आकाशवाणी झाली, असे मानले जाते. शिखंडीला मुलगी म्हणून न वाढवता मुलगा म्हणून वाढवावे, असे त्यात म्हटले होते. त्यामुळे शिखंडीला मुलासारखे वाढवले गेले. त्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढे त्यांचे लग्नही झाले.

मात्र लग्नानंतर पहिल्या रात्री पत्नीला आपण जन्माने मुलगी असल्याचे समजताच तिने शिखंडीचा अपमान केला. यामुळे दुखावलेल्या शिखंडीला आत्महत्येचा विचार येतो आणि ती पांचालपासून पळून जाते.

या दरम्यान एक यक्ष तीला वाचवतो आणि तीचे लिंग बदलतो आणि शिखंडीला पुरुषत्व देतो. अशाप्रकारे शिखंडी एक पुरुष बनतो आणि पांचालमध्ये परततो आणि पत्नी आणि मुलांसह आनंदी वैवाहिक जीवन जगतो.

बातम्या आणखी आहेत...