आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरखात्यात पैसे नसले, तरी UPI पेमेंट करू शकता:ते हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा; 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

जागृती राय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात UPI द्वारे दर सेकंदाला 2,348 व्यवहार होतात. चहाचा स्टॉल असो किंवा मॉल, तुमच्या मोबाईलने QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा. अर्थातच, तुमच्या बँक खात्यात किंवा डिजिटल वॉलेटमध्ये पैसे असतील तरच. पण आता फक्त UPI पेमेंटची ही अट संपणार आहे.

6 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने घोषणा केली आहे की आता लोक UPI पेमेंटसाठी बँकेमार्फत क्रेडिट लाइन वापरू शकतात. म्हणजेच, बँक खात्यात पैसे नसले तरीही, UPI द्वारे पेमेंट केले जाऊ शकते, जे नंतर बँकेत भरावे लागेल. या घोषणेच्या 5 दिवसांनंतर म्हणजे 11 एप्रिल रोजी, ICICI ने UPI पेमेंटवर हप्त्यांचा पर्याय देखील दिला आहे.

यूपीआयशी संबंधित या दोन मोठ्या घोषणांनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ- क्रेडिट लाइन म्हणजे काय, खात्यात पैसे नसताना UPI पेमेंट कसे केले जाईल, हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याचा पर्याय काय आहे? दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये तुम्हाला अशाच 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कळतील...

प्रश्न 1: RBI ने UPI पेमेंटसाठी क्रेडिट लाइन वापरण्याची परवानगी दिली ही लाइन कोणती आहे?

उत्तर: सोप्या भाषेत सांगायचे तर, कर्ज देण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यामध्ये कर्जाची मर्यादा आधीच निश्चित केलेली आहे. या क्रेडिट लाइनचा लाभ घेण्यासाठी प्रथम बँकेकडे अर्ज करावा लागेल.

समजा तुम्हाला तुमच्या बँकेकडून 10,000 रुपयांची क्रेडिट लाइन मंजूर झाली आहे. यानंतर, तुम्ही UPI पेमेंटद्वारे 10,000 रुपयांपर्यंत खर्च करू शकाल. तुम्ही जितकी रक्कम खर्च करता, बँक तुमच्याकडून तितकेच व्याज आकारेल. क्रेडिट लाइनचा फायदा असा आहे की बँकेच्या कर्जापेक्षा त्याचा लाभ घेणे सोपे आहे.

प्रश्न 2: UPI सह क्रेडिट लाइन कशी वापरायची?

उत्तर: UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याबद्दल अनेकांनी ऐकले असेल. येथे क्रेडिट लाइन लिंकिंगसह UPI मध्ये कंफ्यूज होण्याची गरज नाही. हे अशा प्रकारे समजून घ्या की, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसले तरीही आणि तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी या नवीन सुविधेत UPI द्वारे पेमेंट करता येईल. आता प्रश्न पडतो की हे कसे होणार?

तर त्यासाठी बँकेकडून अर्ज मंजूर करुन घ्यावा लागेल, असे त्याचे उत्तर आहे. अर्ज केल्यावर, बँक पेमेंटसाठी रक्कम मंजूर करेल. या प्रकरणात, तुमच्या खात्यात पैसे नसतानाही, UPI द्वारे पेमेंट केले जाईल. आतापर्यंत UPI द्वारे पेमेंट 3 प्रकारे केले जाते

पहिली पद्धत : UPI अॅपसह बँक खाते लिंक करा आणि QR कोड स्कॅन करा. त्यानंतर सिक्युरिटी पिन टाकल्यावर खात्यातून पैसे कापले जातात. अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.

दुसरी पद्धत : बँक खात्यातून पेटीएम किंवा अॅमेझॉन सारख्या अॅप्सच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात आणि UPI द्वारे पेमेंट केले जाते. नवीन नियमांनुसार, आता या माध्यमातून 2 हजारांहून अधिकचे पेमेंट करण्यासाठी रकमेच्या 1.1% व्यवहार शुल्क आकारले जाते.

तिसरी पद्धत: 8 जून 2022 पासून, RBI ने RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची परवानगी दिली. या पद्धतीत क्रेडिट कार्टला तुमच्या UPI शी लिंक करून पेमेंट करता येते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड नेहमी आपल्याकडे ठेवण्याची गरज राहिली नाही. आता फोन सोबत असला आणि क्रेडिट कार्ड घरी पडून असले तरी पेमेंट कुठेही, केव्हाही सहज करता येते.

UPI पेमेंट पद्धतींच्या या उत्क्रांतीची पुढची पायरी म्हणजे UPI सह क्रेडिट लाइनचा वापर.

प्रश्न 3: या पद्धतीद्वारे पैसे भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाईल का?

उत्तर: मार्च 2023 मध्ये, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2,000 रुपयांपेक्षा जास्त प्रीपेड पेमेंटवर 1.1% व्यवहार शुल्क सुचवले होते. हे शुल्क UPI आणि कार्ड या दोन्ही पद्धतींद्वारे लागू होईल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या प्रकरणात, UPI क्रेडिट लाइनद्वारे पेमेंट केले असले तरीही हा चार्ज लागू होईल.

प्रश्न 4: हे लोकांसाठी कसे फायदेशीर आहे?

उत्तरः याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते सुरू झाल्यावर वॉलेटवरून क्रेडिट कार्डचा भार कमी होईल. याचा अर्थ वॉलेटमध्ये अधिक मोकळी जागा. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आर्थिक दृष्टिकोनातूनही ते फायदेशीर आहे. कधीही, कुठेही काहीही खरेदी करण्यासाठी लोकांकडे कार्ड असण्याची गरज नाही.

याशिवाय 'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' या दृष्टीने फायदेशीर ठरेल. जर पैसे नसतील तर कोणतीही वस्तू खरेदी करण्यास विलंब होणार नाही. UPI च्या क्रेडिट लिंकने वस्तू सहज खरेदी करता येते आणि नंतर पैसे भरता येतात. दुसरीकडे, लहान आणि मध्यम व्यवसायासाठी म्हणजे एमएसएमई उद्योगासाठी देखील ते फायदेशीर ठरेल. जर अशा व्यवसायाला मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे नसेल तर तो त्याचा वापर करू शकतो.

भारतासारख्या देशात, जिथे अजूनही बहुतांश लोकांकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांचा फायदा आणखी वाढेल. स्टॅटिस्टाच्या मते, सध्या भारतात 7 कोटी 30 लाख लोकांकडे क्रेडिट कार्ड आहेत. त्याच वेळी, देशातील स्मार्ट फोन वापरकर्त्यांची संख्या 74 कोटी 80 लाख लोक आहे. या संदर्भात, क्रेडिट कार्डपेक्षा कितीतरी पट अधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतील.

येस सिक्युरिटीजचे रिसर्च हेड आणि लीड अॅनालिस्ट शिवाजी थापलियाल यांच्या मते, बँका आता फिजिकल क्रेडिट कार्डांऐवजी डिजिटल क्रेडिट कार्ड देऊ शकतील. POS/स्वाइप मशीन सारख्या महागड्या भौतिक स्वीकृती पायाभूत सुविधांचीही गरज भासणार नाही.

प्रश्न 5: UPI क्रेडिट लाइनवरून किती रकमेपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते?

उत्तर: बँकेने क्रेडिट कार्डसाठी मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच, तुम्ही ठराविक रकमेपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. त्याचप्रमाणे नव्या पद्धतीतही कर्जाची रक्कम बँक ठरवेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगळी असू शकते. एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून बँक किती कर्ज घेऊ शकते हे ठरवते.

प्रश्न 6: यात काही नुकसान आहे का?

उत्तर: अशी सुविधा सुरू केल्याने क्रेडिट कार्डचे महत्त्व कमी होणे अपेक्षित आहे. काही तज्ञ असेही म्हणतात की, क्रेडिट कार्ड बाजार पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो. यासाठी डेबिट कार्डचे उदाहरण दिले जात आहे. उदाहरणार्थ, UPI च्या आगमनाने, डेबिट कार्डची मागणी वर्षानुवर्षे कमी झाली आहे. मार्च 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान डेबिट कार्ड व्यवहारांमध्ये 21% घट झाली आहे.

प्रश्न 7: मी UPI द्वारे क्रेडिट लाइनवरून कर्ज कसे घेऊ शकतो आणि त्याची EMI मध्ये परतफेड कशी करू शकतो?

उत्तर: ICICI देशात 'Buy Now, Pay Later' ची सुविधा सुरू करणारी पहिली बँक ठरली आहे. 11 एप्रिलपासून याची सुरुवात करून बँकेने सांगितले की, आता ग्राहक UPI स्कॅन करून EMI सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असेल...

  • सर्वप्रथम, एखाद्याला ‘आता खरेदी करा, नंतर पे कर’ या सुविधेसाठी बँकेत अर्ज करावा लागेल.
  • बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, खात्यात रक्कम कमी असली तरीही ग्राहक कुठेही QR कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतो.
  • या क्रेडिट लाइनमधून ग्राहक जितकी रक्कम खर्च करेल त्यासाठी एकच अट आहे की पैसे तीन, सहा किंवा नऊ महिन्यांत परत जमा करावे लागतील.

सध्या आयसीआयसीआय बँकेने ही सुविधा सुरू केली आहे, मात्र लवकरच इतर बँकाही असा पुढाकार घेतील अशी अपेक्षा आहे.