आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा15 फेब्रुवारी 2019. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. पीएम मोदींनी प्लॅटफॉर्मवरून ग्रीन सिग्नल दाखवताच देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली.
1 एप्रिल 2023. भोपाळचे राणी कमलापती रेल्वे स्टेशन. पीएम मोदींनी हिरवा झेंडा दाखवताच मध्य प्रदेशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली.
या दोन तारखांच्या दरम्यान, 4 वर्षात देशभरात 11 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी 10 ट्रेनला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणखी पाच मार्गांवर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यांचे उद्घाटनही पीएम मोदी करणार असल्याचे मानले जात आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये समजेल वंदे भारत एक्सप्रेसची कहाणी, फक्त पीएम मोदीच का दाखवतात हिरवी झेंडी…
2017 ची गोष्ट आहे. सुधांशू मणी चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक बनले. हा जगातील सर्वात मोठा कोच बनवणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे, पण सगळेच जुन्या पद्धतीचे डबे बनवत होते. सुधांशूने अत्याधुनिक पद्धतीने ट्रेन बनवण्याचा प्रकल्प सुरू केला.
दिव्य मराठी नेटवर्क सोबत संवाद साधताना सुधांशू म्हणाल की, 'आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशी ट्रेन बनवायला सुरुवात केली आहे, ज्यावर संपूर्ण देशाला अभिमान वाटेल. पण येथे सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे मंत्रालयाची मंजुरी. माझ्या टीमने सांगितले की आम्ही सर्व तयार आहोत, फक्त मंजुरी घ्या.
सुधांशू सांगतात की, 'प्रत्येक प्रकारे प्रयत्न करूनही त्याचा उपयोग झाला नाही. ही ट्रेन परदेशातून आणण्याची चर्चा होती. मी दावा केला की, आम्ही ही ट्रेन परदेशापेक्षा एक तृतीयांश खर्चात आणि अर्ध्या वेळेत बनवू. अखेर मंजुरी मिळाली. ट्रेन-18 असे नाव प्रकल्पाला देण्यात आले. आम्ही ही ट्रेन अवघ्या 18 महिन्यांत तयार केली. नंतर तिचे नाव वंदे भारत एक्सप्रेस ठेवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिली वंदे भारत ट्रेन सुरू केली.
जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. भारतात 1.25 लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर दररोज 11 हजारहून अधिक ट्रेन धावतात. या गाड्यांमधून दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. इतका मोठा आणि लोकांशी जोडलेला असल्यामुळे भारतात रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. 2016 मध्ये मोदी सरकारने ही 92 वर्षे जुनी प्रथा बंद केली.
रेल्वेचे राजकीय महत्त्व काय आहे, हे काही जुन्या घटनांवरुन समजते…
सरकार लोकप्रियता मिळवण्यासाठी राजधानी, शताब्दी, तेजस आणि बुलेट सारख्या ट्रेन चालवण्याच्या घोषणा करतात. सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत हा केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी ट्रेन आहे. त्याची रचना अद्वितीय आहे. कमी वेळेत दोन शहरांमधला प्रवास. सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज. हळूहळू देशभर पसरत आहे. यामुळे लोकांचे जीवन सुसह्य होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी स्वतः वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आणखी अशाच बातम्या वाचा..
राहुल गांधींना जामीन, आता शिक्षेवर सुनावणी:कोर्टात हे 4 युक्तिवाद, खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकते
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होणार की, ते तुरुंगात जाणार? सुरतच्या सत्र न्यायालयाने सुनावणीसाठी 13 एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. तात्काळ दिलासा देत न्यायालयाने राहुल गांधींना नियमित जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधींच्या मानहानीच्या खटल्यात आता काय होणार हे त्यांच्या कोर्टातील युक्तिवादावर अवलंबून आहे. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण ते 4 युक्तिवाद जाणून घेणार आहोत, ज्यामुळे राहुल गांधींना कोर्टात पुन्हा खासदारकी मिळू शकते… पूर्ण बातमी वाचा...
राहुल गांधींच्या खासदारकीचा निर्णय नियमानुसार नाही:लोकसभेचे माजी महासचिव म्हणाले- राष्ट्रपतींना न विचारता निर्णय घेणे चुकीचे
23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. या निर्णयाच्या आधारे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द केले. लोकसभा सचिवालयाच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याविरोधात काँग्रेसची कायदेशीर टीम न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रश्नांवर आम्ही लोकसभेचे महासचिव पीडीटी आचार्य यांच्याशी बोललो. लोकसभेचे सरचिटणीस हे कॅबिनेट सचिवांच्या पातळीवरील देशातील सर्वोच्च दर्जाचे अधिकारी आहेत. ते भारत सरकारचे सर्वात मोठे अधिकारी आहेत. या निर्णयावर पीडीटी आचार्य यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद वाचा... पूर्ण बातमी वाचा..
राहुल गांधी यांनी अद्याप अपील का नाही केले:शिक्षा होऊन 5 दिवस उलटले; तज्ञांचे मत काय? वाचा, इनसाइड स्टोरी
मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून पाच दिवस उलटले आहेत. त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. असे असतानाही राहुल गांधी यांनी अद्याप उच्च न्यायालयात अपील केलेले नाही. काही लोक यामागे कायदेशीर मजबुरी सांगत आहेत तर काही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहेत. राहुल गांधींनी अद्याप हायकोर्टात अपील का केले नाही याची खरी कारणे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.