आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर नेपाळमध्ये करतोय विपश्यना:10 दिवसांचे विशेष सत्र करणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने चित्रपटांमधून थोडा ब्रेक घेतला आहे. प्रसिद्धीपासून दूर जात मिस्टर परफेक्शनिस्ट आजकाल त्याच्या मानसिक आरोग्यावर काम करत आहे. दरम्यान, अलीकडेच आमिर 10 दिवसांसाठी नेपाळला पोहोचला आहे.

तेथील प्रसिद्ध 'विपश्यना ध्यान केंद्र' येथे पोहोचत आमिर 'विपश्यना ध्यान कार्यक्रमात' सहभागी होत आहे. हे ध्यान केंद्र काठमांडूपासून 12 किलोमीटर अंतरावर बुधनीलकंठा येथे आहे. हे काठमांडूमधील सर्वात प्रसिद्ध ध्यान केंद्रांपैकी एक मानले जाते.

नेपाळमधील विपश्यना ध्यान केंद्राचा फोटो
नेपाळमधील विपश्यना ध्यान केंद्राचा फोटो

आमिर रविवारी नेपाळला पोहोचला, त्याने आधीच सत्रासाठी नोंदणी केली होती

विपश्यना केंद्राचे अधिकारी रूप ज्योती यांनी एएनआयशी बोलताना याची पुष्टी केली. त्या म्हणाल्या- होय, ते येथे 10 दिवसांच्या ध्यान कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आजच्या सत्रासाठी त्यांनी आधीच नोंदणी केली होती. विमानतळावरून ते थेट बुधनीलकंठा येथे आले आणि ध्यान सत्राला सुरुवात केली.

लालसिंग चढ्ढा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 60 कोटींचा गल्ला जमवला.
लालसिंग चढ्ढा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 60 कोटींचा गल्ला जमवला.

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना करताना इमिग्रेशन कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमिर रविवारी सकाळी विस्तारा एअरलाइन्सने काठमांडूला पोहोचला होता. 2014 मध्ये आमिर शेवटचा काठमांडूला गेला होता. यादरम्यान त्याने युनिसेफच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता.

आमिर प्लॅन करतोय गजनी 2

गेल्या वर्षी लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यानंतर आमिरने जाहीर केले होते की तो अभिनयातून दीर्घकाळ ब्रेक घेणार आहे. त्यानंतर त्याने कोणत्याही नवीन प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, आमिर लवकरच गजनी 2 या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करण्यास सुरुवात करणार आहे. या प्रोजेक्टसाठी तो अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांच्याशी बोलत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गजनी 2 बाबत आमिर आणि अल्लू अरविंद यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप काहीही दुजोरा मिळालेला नाही.
गजनी 2 बाबत आमिर आणि अल्लू अरविंद यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप काहीही दुजोरा मिळालेला नाही.

कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी वेळ काढायचा आहे - आमिर

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमिर एका कार्यक्रमात पोहोचला होता. जिथे तो स्वत:साठी वेळ काढण्याबाबत बोलला. तो म्हणाला होता- 'जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा मी त्यात इतका हरवून जातो की माझ्या आयुष्यात दुसरे काही घडत नाही. लालसिंग चढ्ढा नंतर मला चॅम्पियन्स चित्रपट करायचा होता. ही खरोखरच एक छान आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. पण मला वाटतं मला ब्रेक घ्यायचा आहे.

आमिर पुढे म्हणाला- 'मला माझ्या कुटुंबासह, माझ्या आईसोबत, माझ्या मुलांसोबत काही काळ राहायचे आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा मला वाटते की मला त्याच्यासोबत राहण्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल आणि खरोखरच जीवन वेगळ्या प्रकारे अनुभवावे लागेल. मी पुढच्या दीड वर्षाची वाट पाहत आहे ज्यामध्ये मी अभिनेता म्हणून काम करणार नाही.