हॅपी बर्थडे:संजय लीला भन्साळींच्या 9 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली एवढी कमाई, काही ठरले ब्लॉकबस्टर, काही झाले सुपरफ्लॉप
- संजय लीला भन्साळींचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 59 वर्षे पूर्ण केली आहेत.
24 फेब्रुवारी 1963 रोजी जन्मलेले संजय लीला भन्साळी हे सौंदर्य आणि कलेचे प्रेमी आहेत. भव्यदिव्यता हे संजय लीला भन्साळींच्या विचारांचं आणि दृष्टीचं वैशिष्ट्य आहे. एका मुलाखतीदरम्यान भन्साळी म्हणाले होते की, त्यांच्या आयुष्यात 'प्रेम' नाही, त्यामुळे चित्रपटांमधून ते ही कमतरता भरून काढतात. येथे त्यांना जीवनाचे रंग आणि भव्यतेचे जग तयार करण्याची संधी मिळते.
'हम दिल दे चुके सनम'पासून 'गोलियों की रासलीला: राम-लीला' आणि 'देवदास'पासून 'बाजीराव...'पर्यंत त्यांनी प्रेमातील अडथळे आणि त्यात दडलेला रोमान्स सुंदरपणे पडद्यावर आणला आहे. ते त्यांच्या मनात वर्षानुवर्षे कोरली गेलेली भूतकाळातील एक प्रेमकथा घेतात, आणि त्यानंतर स्टारकास्ट, भव्यता आणि संवादांद्वारे पडद्यावर ती जिवंत करतात. त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटांनी कशी कामगिरी केली -
'पद्मावत'ने 302 कोटींचा व्यवसाय करून अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. यात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते.
'बाजीराव मस्तानी'ने जवळपास 185 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका होत्या.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 116 कोटींची कमाई केली होती.
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जवळपास 42 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
1999 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात ऐश्वर्या राय, सलमान खान, अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
'खामोशी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. फक्त 7 कोटींची कमाई या चित्रपटाने केली होती.
रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटाने केवळ 20 कोटींची कमाई केली होती.
2010 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट केवळ 29 कोटींचा व्यवसाय करू शकला. या चित्रपटात हृतिक आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.
'ब्लॅक'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. जवळपास 23 कोटींची कमाई या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते.