आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविराट कोहली आणि अनुष्का शर्मा नुकतेच महाकालेश्वर, उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते. यावर आता कंगना रनोटने प्रतिक्रिया दिली आहे. विराट आणि अनुष्का लोकांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवत असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. असे करून ते सनातन धर्माचा प्रचारही करत आहेत.
कंगनाच्या म्हणण्यानुसार, यामुळे मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचे पर्यटन देखील वाढेल, तसेच सरकार आणि देशाला महसूल मिळेल. कंगना व्यतिरिक्त सोशल मीडिया यूजर्स देखील विराट आणि अनुष्काचे कौतुक करत आहेत.
यामुळे सनातन धर्माला अधिक बळ मिळेल
कंगना रनोट स्वतःही खूप धार्मिक आहे. ती दररोज मंदिरे आणि तीर्थक्षेत्रातील तिचे फोटो पोस्ट करत असते. विराट आणि अनुष्काच्या महाकाल दर्शनाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी असे केल्याने सनातन धर्माला अधिक बळ मिळेल असे म्हटले आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, विराट आणि अनुष्का हे पॉवर कपल आहेत, दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ते कोणतेही काम करत असले तरी त्यांच्यावर अनेकांची नजर असते. लोक त्यांना फॉलो करतात.
विराट-अनुष्काने गेल्या वर्षभरात अनेक वेळा देशातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी दोघेही वृंदावन येथील नीम करोली बाबाच्या आश्रमात पोहोचले होते. तेथे त्यांनी सत्संग ऐकला आणि संतांचे आशीर्वादही घेतले.
विराट-अनुष्का महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनमध्ये
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा शनिवारी, 4 मार्चला सकाळी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचले होते. तेथे दोघांनी पहाटे 4 वाजता भस्म आरती करून महाकालाचे आशीर्वाद घेतले. भस्म आरतीनंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. विराटने गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली होती. यासोबतच कपाळावर चंदनाचे त्रिपुंड लावून धोतर सोवळे धारण केले होते. अनुष्का शर्मा साडीत दिसली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.