आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
खळबळजनक वक्तव्ये करुन चर्चा एकवटणारी अभिनेत्री कंगना रनोट हिने गुरुवारी एक ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. ''आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले आहे. तिच्या या वक्तव्यावर बॉलिवूड कलाकारांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ''प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझे बॉलिवूड स्टार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटले नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,'' असे ट्विट त्यांनी केले आहे.
Dear @KanganaTeam Mumbai is the city where your dream of becoming a Bollywood star has been fulfilled, one would expect you to have some respect for this wonderful city. It's appalling how you compared Mumbai with POK! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला 😡 https://t.co/FXjkGxqfBK
— Renuka Shahane (@renukash) September 3, 2020
रेणुका शहाणे यांना उत्तर देताना कंगनाने विचारले - तुम्हीही माझे लचके तोडण्याची वाट पाहात होता का? रेणुका शहाणे यांच्या ट्विटनंतर कंगनाने त्यांना उत्तर देताना लिहिले, ''प्रिय रेणुकाजी, सरकारी धोरणांवर टीका करणे हे एखाद्या जागेचे कौतुक न करण्यासारखे कधीपासून झाले. तुम्ही इतक्या भोळ्या तर नक्कीच नाही. की तुम्हीही इतर गिधडांप्रमाणे माझे लचके तोडण्याची वाट पाहत होता?, तुमच्याकडून अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे,” असे कंगना म्हणाली आहे,
Dear @renukash ji when did criticising the poor administration of a government became equal to the place being administered , I don’t believe you are that naive, were you also waiting like a blood thirsty vulture to pounce and get a piece of my meat ? Expected better from you 🙂 https://t.co/wkR7u05rTB
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
कंगनाच्या वक्तव्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने देखील एक ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ''महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे… मुंबईने लाखो भारतीयांना नाव, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करु शकतात. हे खूप धक्कादायक आणि कधीही न पटणारे आहे'', असे ती म्हणाली आहे.
Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020
दीया मिर्झाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "मुंबई मेरी जान. मी जवळजवळ 20 वर्षे येथे राहतेय आणि काम करतेय. वयाच्या 19 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी येथे आले होते. या शहराने मोकळ्या मनाने माझे स्वागत केले आणि मला सुरक्षित ठेवले. वैश्विक, सर्वसमावेशक, विविधता असलेले सुंदर शहर", असे दीया म्हणाली आहे.
Mumbai meri Jaan 🙏🏻 lived and worked here for almost twenty years. Moved here to live on my own at age 19. This city embraced me with open arms and kept me safe. A cosmopolitan, inclusive, diverse, beautiful city.
— Dia Mirza (@deespeak) September 3, 2020
रितेश देशमुख
मुंबई हिंदुस्तान है।
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 3, 2020
अभिनेता सोनू सूद
मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है।
— sonu sood (@SonuSood) September 3, 2020
सलाम करोगे तो सलामी मिलेगी। 🇮🇳
मीरा चोप्रा
Iam a delhi girl and ive been living in #mumbai since last 5 years now. I can proudly say that this is the safest city and @MumbaiPolice is by far the most helpful police force ive seen!
— meera chopra (@MeerraChopra) September 3, 2020
मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. हा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमानच आहे, असे म्हटलेे होते. राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले आहे.
Sanjay Raut Shiv Sena leader has given me an open threat and asked me not to come back to Mumbai, after Aazadi graffitis in Mumbai streets and now open threats, why Mumbai is feeling like Pakistan occupied Kashmir? https://t.co/5V1VQLSxh1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.