आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशशी कपूर यांची आज 85 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. शशी कपूर असे अभिनेता होते ज्यांच्या हसण्याने आणि त्यांच्या अनोख्या स्टाईलने मुलींना वेड लावले होते. ते समोर असले तर अभिनेत्रींना त्यांचे डायलॉगही नीट बोलता येत नव्हते. त्यांना पाहून एक परदेशी अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली होती. परंतू तिला त्यांचे नाव माहित नव्हते. त्यामुळे तिने चुकीच्या ठिकाणी प्रेम व्यक्त करणारे पत्र पाठवले.
मुलींना शशी कपूरचे वेड होते, पण शशी कपूर यांना मात्र एकाच मुलीचे वेड होते. ती मुलगी होती जेनिफर कँडल. जेनिफर याच शशी कपूर यांचे पहिले आणि शेवटचे प्रेम होते. ती विदेशी असल्याने घरच्यांना लग्नासाठी तिची समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
लग्नानंतर 28 वर्षे शशी आणि जेनिफर एकत्र राहिले, जेव्हा जेनिफर यांना कर्करोगाने मृत्यू झाला, त्यानंतर शशी कपूर यांनी स्वतःला वेगळे केले. आयुष्यातील शेवटची 31 वर्षे पत्नीच्या आठवणीत घालवली, पण दुसरं लग्न केलं नाही. पत्नीच्या निधनानंतर ते रडले नाही. पण ते एके दिवशी गोव्याला गेल्यानंतर बोटीच्या सहाय्याने समुद्राच्या मध्यभागी जाऊन खूप रडले.
शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरशी शशी यांची अतिशय जवळीक होती. पृथ्वीराज यांच्यानंतर प्रथम शशी आणि नंतर त्यांची मुलगी संजना यांनीच पृथ्वी थिएटरला जिवंत ठेवले. शशी कपूर यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये 116 चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी 61 चित्रपटात ते एकटे नायक होते. ते सर्व चित्रपट यशस्वी ठरले.
आज त्यांच्या बर्थ एनिवर्सरी निमित्त त्यांच्या आयुष्यातील काही क्षण जाणून घेऊया...
शशी कपूरला जन्म द्यायचा नव्हता त्यांच्या आईला
शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी पृथ्वीराज कपूर यांच्या घरी झाला, ज्यांना त्यांची आई रामसरणी जन्म देऊ इच्छित नव्हती. 1995 मध्ये फिल्मबीट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शशी कपूर यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या आईंना कळले की ती गरोदर आहे. तेव्हा ती खूप निराश झाली. कारण त्या आधीच दोन मुलांची आई होती. तिला तिसरे अपत्य नको होते. त्यांनी गर्भपाताचाही प्रयत्न केला. कधी ती सायकलवरून पडायची तर कधी पायऱ्यांवरून. कधी कधी ती दोरीने उडी मारायची. हे सर्व प्रयत्न करून देखील शशी कपूर यांचा जन्म झाला.
त्यांचे बालपणीचे नाव बलबीर राज कपूर होते. हे नाव त्यांच्या आजीने ठेवले होते. जे त्यांच्या आईला अजिबात आवडत नव्हते. या कारणास्तव नंतर आईने त्याचे नाव शशी ठेवले. कोणत्याही प्लॅनिंगनुसार शशीचा जन्म झाल्याने आई त्यांना प्रेमाने 'फ्लकी' (योगायोग) म्हणायची.
शशी कपूर यांचा चेहरा खराब होण्यापासून प्रसिद्ध यष्टिरक्षक फारुख यांनी वाचवला
शशी कपूर आणि भारतातील प्रसिद्ध यष्टिरक्षक फारूख इंजिनियर मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत एकाच वर्गात शिकले. एके दिवशी दोघे एकत्र बसून बोलत असताना वर्गशिक्षकाने डस्टर फेकून शशीच्या तोंडावर मारले, पण फारुखने ते पकडले. या घटनेबद्दल फारूक म्हणाले होते की, शशी कपूर यांच्या डोळ्यावर डस्टर लागणार तोच मी त्याच्या चेहऱ्यापासून फक्त एक इंच आधी पकडले. फारूक म्हणाले होते की, मी शशीला नेहमी चिडवायचो. की त्या दिवशी मी जर डस्टर पकडले नसते तर त्याला फक्त खलनायकाची भूमीका करावी लागली असती.
शशीने संघर्षातून अभिनेता व्हावे, वडील पृथ्वीराज कपूर यांची इच्छा
शशी कपूर यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण रंगभूमीशी संबंधित होते. त्यामुळेच त्यांचा कल अभिनयाकडेही होता. त्यांना अभिनेता व्हायचे होते, परंतु त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे मत होते की, त्यांनी आधी संघर्ष करावा आणि मेहनतीने अभिनेता म्हणून करिअर घडवावे. शशी कपूर यांनी लहानपणीच त्यांचा मोठा भाऊ राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
मोठे झाल्यानंतर ते वडील पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरमध्ये सामील झाले आणि ठिकठिकाणी खेळू लागले. 1953 ते 1960 पर्यंत त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम केले.
नाटकादरम्यान शशींची जेनिफर यांच्याशी भेट
ही गोष्ट 1955 ची आहे. शशी कपूर वडिलांसोबत पृथ्वी थिएटरमध्ये काम करायचे. त्यावेळी त्यांच्या एका नाटकाचा शो कोलकात्याच्या थिएटरमध्ये सुरू होता. लोकांच्या मागणीमुळे शो आणखी काही दिवस वाढवण्यात आला. त्यावेळी शशी 18 वर्षांचे होते. एके दिवशी नाटक सुरू होण्यापूर्वी त्याने प्रेक्षकात किती लोक आहेत हे पाहण्यासाठी पडद्यावर डोकावले, तेव्हा त्यांना चौथ्या रांगेत लाल डॉट्स टॉप घालून एक परदेशी मुलगी बसलेली आणि तिच्या मैत्रिणीसोबत हसताना दिसली. त्या मुलीला पाहताच शशी कपूर तिच्या प्रेमात पडले. ती मुलगी शेक्सपियाराना थिएटर ग्रुपचा भाग होती आणि गॉडफ्रे कँडल यांची मुलगी जेनिफर कॅंडल असल्याचे त्यांना कळाले.
पहिल्या नजरेत जेनिफरच्या प्रेमात पडले शशी
जेनिफरचं नाटकही त्याच थिएटरमध्ये होणार होतं जिथे शशी त्यांच्या ग्रुपसोबत उठबस सुरू होती. शशी यांना पहिलीच मुलगी आवडायला लागली होती. तिला भेटण्यासाठी त्यांनी चुलत भाऊ शुभराजला दोघांना भेटून देण्याची विनंती केली.
लाजाळू स्वभावामुळे जेनिफर शशी यांना गे समजू लागल्या
शुभराजने दोघांना भेटण्याचा प्लॅन बनवला आणि ते भेटले. मीटिंगच्या वेळी शशी खूप घाबरला होता तर जेनिफर नॉर्मल होती. दोघांमध्ये साम्य काहीच नव्हते. ती शिकलेली होती, तर शशी हा प्रसंग आठवून स्वतःला लल्लुराम म्हणवत असे. यानंतर भेटीचे सत्र सुरूच राहीले. शशी कपूर खूप लाजाळू होते. त्यामुळे जेनिफर त्यांना गे समजू लागल्या. नंतर जेनिफर यांचा ग्रुप शशीला नाटक बघायला बोलवायला लागतो. शशीही जेनिफरच्या ग्रुपमध्ये सामील होतात. यादरम्यान त्यांनी जेनिफरसोबत अनेक नाटकांमध्ये काम केले.
सिंगापूरला जाऊन जेनिफर यांच्या नाटक ग्रुपमध्ये काम केले
1957 मध्ये 'शेक्सपियरना' ग्रुपमधील एक मुलगा आजारी पडला. त्यानंतर शशी सिंगापूरला गेले आणि त्यांच्या जागी नाटकात काम करू लागले. शशी यांना सिंगापूरची जीवनशैली आवडत नव्हती. खाण्यापिण्याच्या समस्यांमुळे ते घरच्यांना खूप मिस करायचे. पण त्यावेळी जेनिफरने त्यांना खूप मदत केली. त्यामुळे दोघांची जवळीक वाढली.
आई-भावजयीला पसंद होती जेनिफर, पण वडील विरोधात होते
एकदा शशी कपूर उटीमध्ये शो करत होते. तिथे त्याने जेनिफरची आई आणि वहिनी गीता यांच्याशी ओळख करून दिली. शम्मीची पत्नी गीता हिला जेनिफर पहिल्या नजरेतच आवडली होती. आईनेही जेनिफरला मिठी मारली आणि तिच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून जेनिफरला घातली. वडील पृथ्वीराज कपूर यांच्याशी आपल्या आणि जेनिफरच्या लग्नाबद्दल बोलताना शशी घाबरला होता. ही जबाबदारी त्यांनी त्यांचा मोठा भाऊ शम्मीवर सोपवली.
शशींनी एकदा वडिलांशी बोलून दाखवले, पण आपल्या घरची सून परदेशी स्त्री असावी हे पृथ्वीराज यांना मान्य नव्हते. खूप समजावून सांगितल्यावर वडिलांनी होकार दिला, पण जेनिफरचे कुटुंब या नात्यावर खूश नव्हते. वडिलांच्या नकारानंतर जेनिफर यांनी शशींना सांगितले की, आम्ही प्रोढ आहोत आणि आमच्या इच्छेनुसार लग्न करू शकतो. 1958 मध्ये दोघांचे लग्न झाले.
जेनिफरमुळे शशी कपूर फिट राहत असे
जेनिफर यांच्याशी लग्न केल्यानंतर शशी कपूर यांचे आयुष्य बददले. जेनिफर आपल्या आहाराची पूर्ण काळजी घेत असे. कुटुंबासह नाश्ता आणि रात्रीचे जेवण केले. रविवारीही ते संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत असे. सिगारेट आणि दारूवरही पूर्णपणे बंदी होती. यामुळेच कपूर कुटुंबातील प्रत्येकजण लठ्ठ होता, तर शशी कपूर तंदुरूस्त होते ते खूप सुंदर दिसत असत.
पत्नीची वाईट अवस्था पाहून चित्रपट संघर्ष सुरू झाला
लग्नानंतर एका वर्षातच जेनिफर यांनी कुणाल या मुलाला जन्म दिला. आतापर्यंत शशीने मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटाच्या पडद्यावर पाऊल ठेवले नव्हते. एके दिवशी पृथ्वी थिएटरमध्ये काम करणारी अजरा मुमताज शशीला म्हणाली- आता तुझे लग्न झाले आहे, तू तुझ्या बायकोची काळजी घ्यायला शिकायला नको का?
या दिवसाची आठवण करून देताना शशी कपूर म्हणाले होते की, त्या दिवशी मला समजले की मी 21 वर्षांचा होतो आणि अजूनही माझ्या आई-वडिलांसोबत राहतो. अजूनही कमावत नाही, काम शोधत नाही. माझ्या लक्षात आले की जेनिफरने कपाटात ठेवलेले गेल्या वर्षीचे कपडे अजूनही घातले आहेत. बाहेर एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊन खूप दिवस झाले होते. मग दुसऱ्या दिवशी मी उठून सोहराब मोदी यांच्याकडे कामासाठी गेले.
प्रदीर्घ संघर्षानंतर शशी कपूर यांना 1959 मध्ये गेस्ट हाउस या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर, त्यांनी दुल्हा-दुल्हन आणि श्रीमान सत्यवादी या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, ज्यामध्ये त्यांचा भाऊ राज कपूर मुख्य अभिनेता होते, 1961 मध्ये, शशी कपूर पहिल्यांदाच धर्मपुत्र चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर दिसले.
घर चालवण्यासाठी घरातील वस्तू विकाव्या लागल्या
'प्रेम पत्र', 'चार दिवारी', 'मेहंदी लगी मेरे हाथ' सारखे चित्रपट केल्यानंतर शशी कपूर यांच्या करिअरमध्ये पडझड झाली. रोमँटिक हिरोच्या भूमिकेमुळे ते टाइपकास्ट झाले होते. त्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले. कोणत्याही अभिनेत्रीला त्यांच्यासोबत काम करायचे नव्हते.
हा काळ इतका वाईट होता की, घर चालवायलाही पैसे नव्हते. शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे वडीलांनी स्पोर्ट्स कार विकली. आई जेनिफरनेही आपल्या मौल्यवान वस्तू विकायला सुरुवात केली. या वाईट काळात अभिनेत्री नंदा यांनी तिच्या मित्राने शशी कपूर यांना मदत केली. नंदा यांनी त्यांच्यासोबत 'जब जब फूल खिले' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यशानंतरच शशीची कारकीर्द पुन्हा रुळावर आली.
शशी कपूर यांच्या सौंदर्याबाबत शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, 'काश्मीर की कली'च्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांना पाहून अभिनयावर लक्ष केंद्रित करता आले नाही. त्यांनी दिग्दर्शकाला शशीला काही काळ सेटवरून बाजूला करण्याचे विनंती केली. जेणेकरून त्यांना त्यांचे काम पूर्ण करता येईल.
इटालियन अभिनेत्री पहिल्याच नजरेत शशींच्या प्रेमात पडली
सुप्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिलाही देखणा शशी कपूरने भुरळ घातली होती. चित्रपट निर्माते इस्माईल मर्चंट यांनी त्यांच्या 'पॅसेज टू इंडिया' या चरित्रात ही घटना लिहिली आहे- जीना पहिल्या नजरेतच शशीच्या प्रेमात पडली होती. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी, जीनाने त्यांना फुलांचा गुच्छ पाठवला, पण शशीचे नाव मधुर असल्याचा तिचा गैरसमज होता, म्हणून पुष्पगुच्छ अभिनेत्री मधुर जाफरीकडे गेला. शशीकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने जीनाने स्वतः त्याला भेटून प्रतिसाद का दिला नाही असे विचारले. गैरसमजामुळे इतकी चांगली संधी गमावल्याचे शशी गमतीने म्हणाला.
जेव्हा शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांना बेल्टने मारण्यासाठी धावले
शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा खूप चांगले मित्र होते आणि त्यांनी एकत्र 'आ गले जा', 'क्रांती', 'इल्झाम', 'शान' सारखे चित्रपट केले. एकदा दोघे एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. शत्रुघ्न सिन्हा एकदा सेटवर उशिरा पोहोचले, तर शशी कपूर बराच वेळ त्याची वाट पाहत होते. शत्रुघ्नला पाहताच शशी यांना त्याला बेल्टने मारण्यासाठी पाठीमागे धाव घेतली. तेव्हा शत्रुघ्न गमतीने त्यांना म्हणाले की, मी वक्तशीर आहे, म्हणूनच निर्मात्यांनी मला चित्रपटात कास्ट केले. यावर शशी म्हणाले की, हे सांगताना तुला लाज वाटत नाही.
शशींनी पूनम धिल्लनला चापट मारली, नंतर माफी मागितली
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांनी पूनम धिल्लन यांना थप्पड मारावी लागली, पण पूनम यांना माहित नव्हते. दिग्दर्शक यश चोप्राने कारवाईसाठी बोलावताच शशीने त्यांना जोरदार चपराक मारली. तो सीन खराखुरा दिसावा म्हणून त्यांनी जोरदार चापट मारली. मात्र, यश चोप्रांच्या सांगण्यावरून शशीने नंतर धिल्लन यांची माफी मागितली.
पत्नी गेल्यानंतर शशी कपूर डिप्रेशनमध्ये गेले
1982 हे वर्ष शशींसाठी खूप कठीण होते. या वर्षी त्यांना समजले की, त्यांच्या पत्नीला कर्करोग आहे. फक्त 2 वर्षांनंतर, जेनिफर कॅन्सरशी लढाई हरली आणि तिचे निधन झाले. पत्नीच्या निधनाने शशी कपूर पूर्णपणे तुटले. त्यांनी खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्यांचा लठ्ठपणा वाढू लागला. ते तासनतास त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एकटेच बसायचे. कोणाशीही बोलत नसत. ज्यातून ते कधीच सावरले नाही.
एका मुलाखतीत शशी यांचा मुलगा कुणाल म्हणाला होता- जेनिफरच्या मृत्यूनंतर शशी कपूर पहिल्यांदा रडले होते. जेव्हा ते एकदा गोव्याच्या मध्यभागी बोटमध्ये बसून समुद्राच्या मध्यभागी गेले तेव्हा. त्या ठिकाणी ते तासनतास रडत होते. त्यांनी जेनिफर सोबत 28 वर्ष घालवली. पण त्यांच्या मृत्यूनंतर ते 31 वर्षे त्याच्या आठवणींवर जगले. त्यांनी स्वत: सांगितले होते की, 31 वर्षात त्यांनी कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
शशी कपूर हे पहिले आंतरराष्ट्रीय स्टार
शशी हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय अभिनेते होते. 1982 मध्ये आलेल्या नमक हलाल चित्रपटाच्या पुढच्याच वर्षी त्यांचा हॉलिवूड चित्रपट 'हीट अँड डस्ट' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही नामांकन मिळाले होते. 1963 ते 1998 या काळात त्यांनी 10 हून अधिक इंग्रजी चित्रपट केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.