आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचित्रपट अभिनेता सुबोध भावे यांनी अखेर मंगळवारी सपशेल माफी मागितली आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे भावेने सांगितले. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही, ते काय करतात हे आपल्यासमोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात, असे सांगत भावे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.