आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिर्माते श्रीराम राघवन युद्ध नायक अरुण खेत्रपाल यांच्यावरील इक्कीस या बायोपिक चित्रपटामुळे दीर्घ काळापासून चर्चेत आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शन करत आहेत. दिनेश व्हिजान निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानेही या टीममध्ये प्रवेश केला आहे. खास बाब म्हणजे वरुण धवनच्या जागी अगस्त्य नंदाला घेण्यात आले आहे. त्याची कथा परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. खेत्रपाल यांना सर्वात कमी वयात परवीर चक्र मिळाले होते. चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. अगस्त्य जोया अख्तरची वेब सिरीज ‘द आर्चिज’मध्येही दिसणार आहे. या सिरीजमध्येे सुहाना खान आणि खुशी कपूरही दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.