आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता धैर्य घोलपचा गेल्या वर्षी 'तान्हाजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यु झाला होता. तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रूपातल्या धैर्यने या चित्रपटात नवाब सैफ अली खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. चित्रपटाचा खलनायक उदय भान सिंह (सैफ अली खान)च्या हातून या मावळ्याचा मृत्यू होताना दाखवला आहे.
आता अभिनेता धैर्य घोलप कलर्सच्या नवा शो ‘बावारा दिल’द्वारे ‘सरकार’ या खलनायकाच्या भूमिकेतून टेलिव्हिजन डेब्यू करत आहे. तान्हाजीमधील सैफ अली खान यांच्या निर्दयी उदय भान सिंह या भूमिकेकडून ‘सरकार’ या खलनायकी पात्रासाठी प्रेरणा घेतल्याचे धैर्य सांगतो.
धैर्य घोलप म्हणतो, “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधली उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते. हे मला पाहायला मिळाले. सैफसरांना भूमिकेशी एकमग्न होताना त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भुमिका रंगवताना होत आहे.”
धैर्य पुढे सांगतो, “माझ्या करियरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भुमिका साकारण्याची संधी मला मिळतेय, यासाठी मी निर्माते निखील शेठ आणि कल्याणी पाठारे यांचा आभारी आहे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.