आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानात तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिका, रशिया आणि भारतासह अनेक देशांसमोर संकट उभे झाले आहे. सूत्रांकडून आता माहिती समोर येत आहे की, भारतातील 50 डिप्लोमेट्स व कर्मचार्यांनी कंधार दूतावास सोडले आहे.
तालिबानचे प्रवक्ते सुशील शाहीन यांनी चिनी मीडिया साउथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, अफगाणिस्तानातील 85% भागावर तालिबानने कब्जा केला आहे.
सरकार करत दावा करत होते, दूतावास बंद होणार नाही
काही दिवसांपूर्वीपर्यंत भारत सरकारकडून एक विधान आले होते की, कंधार आणि मजार-शरीफ यांचे दूतावास बंद करण्याची कोणतीही योजना नाही. येथे पूर्वीप्रमाणे व्यवस्था सुरूच ठेवली जाईल, पण अचानक रविवारी कंधार दूतावासात तैनात डिप्लोमेट्स व कर्मचार्यांचे दूतावास रिकामे करून ते बंद करण्यात आले
भारताला 20 हून जास्त दहशतवाद्यांच्या गटाचा धोका
भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजे म्हणाले, तालिबानचे २० हून जास्त दहशतवादी गटांशी संबंध आहेत. या संघटना रशियापासून भारतापर्यंतच्या क्षेत्रात काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.