आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NSA डोवाल- भूतानच्या राजांची भेट:भूतान PM च्या डोकलामवरील वादग्रस्त विधानानंतर आले भारतात; लवकरच PM मोदींची भेट घेणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूतानचे तिसरे राजा जिग्मे वांगचूक यांनी मंगळवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांची भेट घेतली. यानंतर ते राजघाटावर पोहोचले, ज्या ठिकाणी त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. वांगचुक थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. तसेच वागंचूक हे सायंकाळी 5 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. वांगचुक यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भूतानच्या पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच डोकलामचे वर्णन तीन देशांचा वाद असे म्हणून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

तीन दिवसांच्या दौऱ्यात वांगचूक यांनी परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली
यापूर्वी सोमवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. वांगचुक यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे जयशंकर म्हणाले होते. वृत्तानुसार, भूतानचे विदेश व्यापार मंत्री टँडी दोरजी आणि राजेशाही सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्रीही राजा वांगचुक यांच्यासोबत भारतात आले आहेत. भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारावर चर्चा होणार आहे.

भूतानचे राजा जिग्मे वांगचुक यांनी राजघाटावर श्रद्धांजली वाहिली.
भूतानचे राजा जिग्मे वांगचुक यांनी राजघाटावर श्रद्धांजली वाहिली.
भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.
भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.

सर्वप्रथम जाणून घ्या, भूतानचे पीएम लोते थेरिंग काय म्हणाले होते?

  • बेल्जियमच्या एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भूतानचे पीएम थेरिंग म्हणाले होते - डोकलाम प्रश्नावर भूतान एकटाच तोडगा काढू शकत नाही. या प्रकरणात तीन देश सहभागी आहेत. आणि या बाबतीत कोणत्याही देशाला लहान मानता येणार नाही. यावर सर्व समान भागीदार आहेत.
  • थेरिंग यांच्या या विधानामुळे भारताची चिंता वाढणार आहे. याचे कारण म्हणजे डोकलामवर चीनचा कोणताही दावा भारताला मान्य नाही. त्यांच्या मते हा भाग भारत आणि भूतानमधील मुद्दा आहे. चीनने यात हस्तक्षेप करू नये. हा भाग भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये येतो, जो त्याच्या सामरिक स्थानामुळे संवेदनशील मानला जातो.