आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर सुरक्षा परिषद म्हणाली - काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर समस्या आहे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे ही समस्या सोडविल पाहिजे. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य देशांमधून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया हे देश भारताच्या बाजूने आहे. चीनने पूर्वीप्रमाणे पाकिस्तानला पाठिंबा दिला.
यूएनमध्ये, भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस त्रिमूर्ती यांनी म्हटले की, सुरक्षा परिषदेची बैठक अनिर्णीत झाली. ही बैठक अनौपचारिक होती. त्याची नोंद झाली नाही. काश्मिर हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे हे जवळजवळ सर्वच देशांनी मान्य केले आहे. परिषदेला याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
पाकिस्तानने तिसऱ्यांदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला
काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात तिसऱ्यांदा हा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी पत्र लिहिले होते. यूएनमधील बहुतेक डिप्लोमॅट म्हणाले - कलम 370 काढून एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न करण्यात आला होता. चीन त्याला मदत करत होता. चीननेही 'एनी अदर बिझनेस' (एओबी) नियमांतर्गत यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेमध्ये कोणताही सदस्य परिषदेत कोणताही मुद्दा ठेवू शकतो.
पाकिस्तानला मिळालाइंडोनेशियाचा पाठिंबा
यावेळी पाकिस्तानला चीनशिवाय इंडोनेशियाकडूनही पाठिंबा मिळाला. रोटेशनल पॉलिसीअंतर्गत इंडोनेशिया या बैठकीचे नेतृत्व करणार होते. दरम्यान त्यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी करत पाकिस्तानला साथ दिली. तथापि, नंतर अशी बातमी आली की इंडोनेशिया देखील भारताबरोबर आहे. त्यांनीही काश्मीरला भारत आणि पाकिस्तानमधील प्रकरण असल्याचे म्हटले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.