आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या 23 दिवसांनंतर येथे परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर वर आली आहे. बुधवारी सैन्याने सांगितले की, 'दोन्ही देशांच्या सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट- 15 व्या स्थानावरुन माघार घेतली आहे. चीनची सेना सुमारे दोन किमी मागे गेली आहे. दुसरीकडे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागात सैन्याने माघार घेतली असून ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.
रविवारीपासून चीनने या ठिकाणी आपली संरचना पाडून टाकण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या कराराच्या अनुषंगाने दोन्ही सैन्य चकमक झालेल्या ठिकाणापासून दीड ते दोन किलोमीटर मागे हटतील.
गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील सैन्य अधिकार्यांमधील अनेक पातळींवरील चर्चा झाल्या. मात्र एकमत झाले नाही. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्याशी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी याची व्हिडिओ कॉलवर दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर काही तासांनंतर चीनने सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
या 5 मुद्यांवर सहमती
15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक ठार झाले. 40 चिनी सैनिकही मारले गेले पण त्यांनी ते स्वीकार केले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.