आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाने भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा म्हणजेच UNSC चा स्थायी सदस्य बनविण्यास पाठिंबा दिला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी 7 डिसेंबर रोजी मॉस्को येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय मंचावर सांगितले की, भारताने जगातील प्रमुख समस्यांवर आपल्या भूमिकेने परिषदेचे मूल्य वाढवले आहे. अशा परिस्थितीत, भारत देश UNSC चा स्थायी सदस्य होणे आवश्यक आहे.
भारत 2021 पासून UNSC परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. जे अध्यक्षपद यावर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. याआधी आलेल्या रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने UNSC च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताचा दावा आणखी मजबूत झाला आहे. ते म्हणाले की, मला वाटते की, आर्थिक वाढीच्या बाबतीत भारत हा जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. काही काळानंतर भारताची लोकसंख्या जगातील सर्वात मोठी होईल. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करताना लावरोव्ह म्हणाले की, त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा राजनैतिक अनुभव आहे. यासोबतच भारताची आशिया खंडावरही चांगली पकड आहे. जे UNSC साठी त्यांचा दावा अधिक मजबूत करते.
UNSC बरोबर भारताची SCO देखील महत्त्वाची भूमीका
रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह म्हणाले की, भारत केवळ संयुक्त राष्ट्रांमध्येच नाही, तर प्रादेशिक संघटनांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो. भारत हा असा देश आहे, ज्याला केवळ बहुध्रुवीय जग निर्माण करायचे आहे. इतकेच मर्यादित नाही तर हा देश त्या जगाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभही बनेल. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील भारताच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आहे.
फ्रान्स आणि अमेरिकेनेही अशी मागणी केली आहे
नोव्हेंबरमध्ये फ्रान्स आणि ब्रिटननेही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनवण्याची ऑफर दिली होती. युनायटेड नेशन्स (यूएन) मधील फ्रान्सच्या प्रतिनिधीने म्हटले आहे की जगातील सर्वात शक्तिशाली उदयोन्मुख शक्तींच्या संघटनेत भारताचा सहभाग वाढण्याची वेळ आली आहे. फ्रान्सने भारतालाच नव्हे तर जर्मनी, ब्राझील आणि जपानलाही सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनवण्याची मागणी केली आहे.
2021 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी जागेवर भारताच्या दाव्याची वकिली केली होती. त्यावेळी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले होते की, केवळ अमेरिकाच नाही तर सर्व क्वाड सदस्य देशांनी यावर सहमती दर्शवली आहे.
भारत UNSCमध्ये सुधारणांची मागणी करतोय
सुरक्षा परिषदेतील बदलांबाबत संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजनयिक रुचिरा कंबोज यांनी गुरुवारी हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये त्यांनी UNSC मध्ये समान प्रतिनिधित्वाबद्दल सांगितले. बदलांमध्ये जितका विलंब होईल, तितकेच संस्थेचे आणि जगाचे नुकसान होईल. मात्र, भारताकडून अशा सुधारणांची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारत वेळोवेळी UNSC मध्ये या बदलांना पाठिंबा देत आहे.
भारत UNSC चा स्थायी सदस्य का नाही?
सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे, मात्र भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा चीन आहे. चीनशिवाय फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनविण्यास सहमती दर्शवली असली तरी चीन वेगवेगळ्या बहाण्याने भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध करत आहे.
याशिवाय UNSC च्या रचनेत बदल करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. यूएनएससीमध्ये विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व कमी आहे, असा युक्तिवाद केला जातो, परंतु स्थायी सदस्यांना यात कोणताही बदल नको आहे आणि व्हेटो पॉवर इतर कोणत्याही देशाला द्यायला हवा. भारताशिवाय जपान, जर्मनी आणि ब्राझील हे देशही सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.