आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Intense Heat Causes 27 Disadvantages Of The Body, Including Kidney Failure And The Risk Of Cardiac Arrest

हवामान बदलाचा परिणाम:तीव्र उष्णतेने शरीराला 27 तोटे, मूत्रपिंड निकामी होण्यासह कार्डियाक अरेस्टचाही धोका

अमेरिकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात हवामान बदल हा मोठा धोका कसा बनत आहे? त्याची माहिती नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून कळली आहे. अमेरिकेच्या आयएमडी आणि इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट चेंज यांच्या अध्ययनात आढळले की, गेल्या दशकात उष्ण दिवसांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. अध्ययन सांगते की, १९८१ ते १९९१ दरम्यान अमेरिकेत उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या ४१३ होती, तर २०१०-२०२० दरम्यान त्यांची संख्या ६०० पर्यंत वाढली आहे. यामुळे शरीराला अतिउष्णतेचा धोका वाढला आहे. खरं तर, विश्रांतीच्या वेळी शरीराचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सियस (९८.६ फॅरेनहाइट) असते. आणि आपल्या सभोवतालचे तापमान वाढते तेव्हा उष्णतेचा आपल्यावर परिणाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान वाढल्याने शरीरातील प्रमुख अवयवांना इजा होण्याचा धोका वाढतो. त्वचेला रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे हृदयावरील ताण वाढतो.

तापमानाचा पारा सतत ४० अंशांच्या वर गेल्यास हे धोके
पेशी : मिस फायर करू लागतात, मंद पडू लागतात
उच्च उष्णतेमध्ये मेंदू स्नायूंना मंद होण्याचे संकेत देतो. चेतापेशी मिस फायर करू लागतात, डोकेदुखीची तक्रार, नाक वाहणे आणि उलट्या होऊ लागतात. घामामुळे इलेक्ट्रोलाइट्स काम करणे बंद करतात. शरीरात मुरड येऊ लागते.

मूत्रपिंड : निष्क्रिय होण्याचा धोका वाढतो, शरीरात विषारी पदार्थ पसरतात
अतिउष्णतेमुळे अनेक लोकांमध्ये घाम येणे पूर्णपणे थांबते. त्यांची त्वचा उष्ण आणि कोरडी होते. शरीरात अंतर्गत जळजळ सुरू होते, त्यामुळे मूत्रपिंडावर दबाव वाढतो. काही काळानंतर मूत्रपिंड निकामी होते. त्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये पसरतात.

हृदय : हृदयविकाराचा धोका वाढतो, अवयव काम करणे थांबवतात
शरीराचे तापमान सामान्यपेक्षा फक्त ०.५ अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा हृदयाचे ठोके प्रति मिनिट १० पर्यंत वाढतात. शरीर सतत ४० अंश सेल्सिअस तापमान राहिल्यास अवयव हळूहळू काम करणे बंद करतात. पेशी मरायला लागतात. हृदय कार्डियाक अरेस्टमध्ये जाते
-रक्तातील विषबाधा : अतिउष्णतेमुळे आपल्या आतड्यांचे गंभीर नुकसान होते, त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू लागते.

-मेंदूला सूज : अतिउष्णता आपण वेळेत टाळली नाही तर आपल्या मेंदूला सूज येऊ शकते.
-यकृत निकामी होणे : अतिउष्णता टाळण्यासाठी शरीर अधिक प्रमाणात घाम सोडते. यासाठी यकृताला क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. यकृतावर दबाव वाढल्यास ते निकामी होऊ शकते.

शरीराचे तापमान घटवण्याचे उपाय
१. मानेवर, कपाळावर पाणी-बर्फ लावा

रक्तवाहिन्या मनगट, मान, छाती आणि कपाळाभोवतीच्या त्वचेच्या सर्वात जवळ असतात. अशा स्थितीत येथे पाणी किंवा बर्फ लावल्यास रक्ताचे तापमान झपाट्याने कमी होते. त्यामुळे शरीराला जलद थंडावा जाणवतो.

२. शीतली प्राणायाम करा
- निवांत मुद्रेत बसा.
- जीभ थोडी बाहेर काढा.
- आता तोंडाने हळूहळू श्वास घ्या.
- आता हळूहळू नाकातून श्वास सोडा.
- याची ३ ते ५ मिनिटे पुनरावृत्ती करा.

३. पाणी,रसाचे प्रमाण वाढवा
पेपरमिंटमध्ये जास्त प्रमाणात मेंथॉल आढळल्यामुळे जलद थंडाव्याची भावना येते. तसेच नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे शरीरात वेगाने ऊर्जा प्रसारित करते, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

४. शारीरिक हालचाली कमीत कमी करा
शरीराची हालचाल होते तेव्हा स्नायू वेगाने सक्रिय होतात. त्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे जास्त उष्णता जाणवते. शरीराचे तापमान वाढते. हालचाली कमी केल्याने आराम मिळतो.