आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली:म्हणाले- युक्रेन युद्ध आमच्यासाठी मोठा मुद्दा, दोन्ही देशांनी चर्चेच्या मार्गावर परतावे

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्को येथे पत्रकार परिषद घेतली. - Divya Marathi
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉस्को येथे पत्रकार परिषद घेतली.

युक्रेन युद्धानंतर प्रथमच रशियाच्या दौऱ्यावर आलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेन युद्ध हा भारतासाठी मोठा मुद्दा आहे. दोन्ही देशांनी पुन्हा संवादाच्या मार्गावर यावे, असा भारताचा आग्रह आहे, असे म्हटले. येथे त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली.

पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले की, ही बैठक द्विपक्षीय संबंधांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि जागतिक परिस्थितीबद्दल एकमेकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी आहे. आमचा संवाद एकूण जागतिक परिस्थिती आणि विशिष्ट प्रादेशिक समस्यांवर केंद्रित असेल. अनेक पाश्चिमात्य देशांच्या दबावानंतरही भारताने काही महिन्यांत रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची आज रशियातील मॉस्को येथे भेट झाली.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची आज रशियातील मॉस्को येथे भेट झाली.

जोपर्यंत द्विपक्षीय संबंधांचा संबंध आहे, आमचे उद्दिष्ट समकालीन, संतुलित, परस्पर फायदेशीर आणि दीर्घकालीन भागीदारी निर्माण करणे आहे,” असे भारतीय परराष्ट्र मंत्री म्हणाले. जयशंकर म्हणाले की, युक्रेन युद्ध हा सर्वोच्च मुद्दा आहे. कोविड, व्यापाराशी संबंधित अडचणींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. पण आता या प्रकरणाच्यापुढे युक्रेन युद्धाचे परिणाम आपण पाहत आहोत.

कच्चे तेल, व्यवसायासह अनेक मुद्द्यांवर वाटाघाटी

रशियन समकक्षासोबत झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी कच्चे तेल, व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. जयशंकर म्हणाले, “दहशतवाद आणि हवामान बदलाचे मुद्दे आहेत. ज्याचा प्रगती आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होतो. भारत, रशिया वाढत्या बहुध्रुवीय आणि पुनर्संतुलित जगात एकमेकांसोबत भागीदारी करत आहेत. अत्यंत चिरस्थायी आणि संकट काळात दोन्ही देशांनी संबंध टिकवले आहेत.

या बैठकीत आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या उद्दिष्टांबद्दलही चर्चा केली. अफगाणिस्तानसह अनेक प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. अफगाणिस्तानातील लोकांसाठी आमचा पाठिंबा कसा चालू ठेवायचा यावर आम्ही चर्चा केली. जयशंकर यांच्या रशिया दौऱ्याकडे युद्ध संपवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. फेब्रुवारीमध्ये युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून जयशंकर आणि लावरोव्ह चार वेळा भेटले आहेत. मात्र, रशियातील ही पहिलीच बैठक आहे.

आजचे युग युद्धाचे नाहीः पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2022 मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCO बैठकीच्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दोघांमधील सुमारे 50 मिनिटांच्या संभाषणात पीएम मोदी म्हणाले होते की, आजचे युग युद्धाचे नाही. लोकशाही हे मुत्सद्देगिरी आणि संवादाने चालते, या वस्तुस्थितीबद्दल आम्ही अनेकवेळा फोनवर बोललो.

पुतिन मोदींना म्हणाले - युक्रेनबद्दल तुमच्या चिंतेची जाणीव
भेटीदरम्यान पुतिन मोदींना म्हणाले होते - युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत मला तुमची स्थिती आणि चिंतांची जाणीव आहे. हे शक्य तितक्या लवकर संपावे अशी आमची इच्छा आहे. तिथे काय घडत आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू.

भारत पाठिंबा देत आहे
24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर अनेकदा चर्चा केली आहे. ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान ते म्हणाले होते की, लष्करी तोडगा असू शकत नाही. भारत शांततेसाठी कोणत्याही प्रयत्नात योगदान देण्यास तयार आहे.

युद्ध संपावे, हे आमचे ध्येय
जून 2022 मध्ये, एस. जयशंकर यांनी स्लोव्हाकियाच्या युरोप दौऱ्यात म्हटले होते की, रशिया-युक्रेन युद्धाच्या आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणत आहोत की युद्धविराम झाला पाहिजे. दोन्ही देशांनी संवादातून शांततेच्या मार्गावर यावे. युद्ध हा पर्याय नाही.

बातम्या आणखी आहेत...