आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोव्यात येणार आहेत. 20 एप्रिल रोजी पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 14 दिवसांनंतरच बिलावल यांची भारत भेट दोन्ही देशांसाठी विशेष मानली जात आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग, रशियाचे सर्गेई लॅव्हरोव्ह हेही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत जयशंकर आणि भुट्टो यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोव्यात चीन, पाकिस्तान, भारत आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री एकत्र आल्याने SCO ही संघटना चर्चेत आहे.
त्यानिमित्ताने, जेएनयू प्रोफेसर राजन कुमार जे परराष्ट्र व्यवहारातील तज्ज्ञ असून त्यांच्याकडून 7 प्रश्नातून SCO संघटना, तिची ताकद आणि कार्याविषयी जाणून घेणार आहोत....
प्रश्न 1: SCO ची स्थापना केव्हा झाली आणि त्याची स्थापना करण्याची आवश्यकता का होती?
उत्तर : 1990 मध्ये सोव्हिएत युनियनचे अनेक तुकडे झाले. यानंतर रशियाच्या शेजारी राष्ट्रांमध्ये सीमा निश्चित न झाल्यामुळे सीमा विवाद सुरू झाला. हा वाद युद्धात रुपांतरण होऊ नये, यासाठी रशियाला संघटना स्थापन करण्याची गरज वाटली.
रशियालाही भीती वाटत होती की, चीन आपल्या सीमेला लागून असलेल्या सोव्हिएत युनियनचे सदस्य असलेल्या छोट्या देशांच्या जमिनी ताब्यात घेणार नाही. अशा परिस्थितीत रशियाने 1996 मध्ये चीन आणि माजी सोव्हिएत देशांसोबत एक संघटना स्थापन केली. चीनच्या शांघाय शहरात याची घोषणा करण्यात आली. म्हणूनच संघटनेचे सुरूवातीचे नाव 'शांघाय फाइव्ह' असे होते. सुरुवातीला या संघटनेच्या 5 सदस्य देशांमध्ये रशिया, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान यांचा समावेश होता.
या देशांमधील सीमा विवाद मिटल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय संघटनेचे स्वरूप देण्यात आले. 2001 मध्ये, उझबेकिस्तान या आणखी एका देशाने या पाच देशांमध्ये सामील होण्याची घोषणा केली, त्यानंतर त्याचे नाव 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' म्हणजेच SCO असे ठेवण्यात आले.
प्रश्न 2 : SCO चा अंतिम मुख्य उद्देश आणि कार्य काय आहे?
उत्तर : जेव्हा SCO देशांनी सीमा विवाद सोडवला तेव्हा त्याचा उद्देश बदलला. आता त्याचे मुख्य उद्दिष्ट सदस्य देशांना तीन प्रकारच्या वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे आहे. यात प्रामुख्याने अलगाववाद, दहशतवाद, धार्मिक कट्टरतावाद या गोष्टींपासून त्यांना संरक्षण करायचे आहे.
आजूबाजूच्या देशांमध्ये कट्टरतावादी विचारसरणी वाढू नये, असे रशियाला वाटत होते. अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि इराणच्या जवळ असल्याने, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्येही दहशतवादी संघटना फोफावू लागल्या, जसे की IMU म्हणजेच इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानमधील HUT. अशा परिस्थितीत रशिया आणि चीनने SCO च्या माध्यमातून या तीन प्रकारच्या शैतानांशी लढा सुरू ठेवला.
याशिवाय सदस्य देशांमधील परस्पर विश्वास आणि संबंध दृढ करणे हे ही या संघटनेचे प्रमुख काम आहे. ही संघटना सदस्य देशांमधील राजकारण, व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी काम करत आहे.
प्रश्न 3: भारत SCO मध्ये कधी आणि कशामुळे सहभागी झाला?
उत्तर : SCO च्या स्थापनेनंतर भारतालाही त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी भारताने त्यात सामील होण्यास नकार दिला होता. दरम्यान, चीनने पाकिस्तानला या संघटनेचे सदस्य बनविण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे संघटनेतील चीनच्या वाढत्या वर्चस्वाची भीती रशियाला वाटू लागली. तेव्हाच रशियाने भारताला या संघटनेत सामील होण्याचा सल्ला दिला होता.
यानंतर 2017 मध्ये भारत या संघटनेचा स्थायी सदस्य झाला. भारताला या संघटनेत सामील होण्याची आणखी 5 कारणे आहेत...
प्रश्न 4 : गोव्यात होणाऱ्या SCO मीटींगमध्ये सहभागी होण्याचा पाकिस्तानला कसा फायदा होईल?
उत्तर : गोव्यात होणार्या SCO बैठकीत बिलावल भुट्टो झरदारी यांच्या सहभागामुळे पाकिस्तानला 4 मार्गांनी फायदा होऊ शकतो.
प्रश्न 5: बिलावल भुट्टो यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील का?
उत्तर : पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध कसे असावेत याबाबत पाकिस्तानमध्ये दोन गट आहेत.
मात्र, बिलावल यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता नाही. कारण भारत दहशतवादाच्या मुद्द्यावर अत्यंत कडक आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानकडून संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते, हे निश्चित.
प्रश्न 6 : रशियाने अमेरिकेच्या NATO शी स्पर्धा करण्यासाठी SCO ची निर्मिती केली का?
उत्तर : नाही, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. सुरुवातीला असे नव्हते. अफगाणिस्तानच्या बाबतीत अमेरिकेचा रशियाला पूर्ण पाठिंबा होता. 2001 मध्ये, जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार पाडले, तेव्हा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी बुश यांना प्रथम फोन केला. तोपर्यंत रशिया आणि अमेरिकेचे संबंध चांगले चालले होते. 2004 मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडू लागले. जेव्हा अमेरिकेने नाटोचा विस्तार करण्यास सुरुवात केली. बदल्यात, 2008 मध्ये रशियाने जॉर्जियावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडली होती.
प्रश्न 7 : SCO मधून भारताला काही विशेष मिळाले आहे का ?
उत्तर : दोन प्रसंगी एससीओमुळे भारताने चीनला नमते घ्यायला भाग पाडले होते....
खरं तर, पंतप्रधान मोदी जून 2022 मध्ये ब्रिक्स परिषदेसाठी चीनला गेले नव्हते, तर काही दिवसांनी ते अमेरिकेच्या नेतृत्वाखालील QUAD देशांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी टोकियोला गेले होते. त्यामुळे एससीओ परिषदेत मोदींच्या अनुपस्थितीमुळे या संघटनेच्या परस्पर दुरावल्याचा संदेश जगापर्यंत जावा, असे चीनला वाटत नव्हते. BRICS ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांची संघटना आहे.
हे ही वाचा
नवी सुरुवात : PAK परराष्ट्र मंत्री 12 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर; बिलावल भुट्टो म्हणाले होते - काश्मीरची 1 इंच जागा सोडणार नाही; 5 भारत विरोधी विधाने
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आज भारत दौऱ्यावर येणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येआरे ते पाकचे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार भारतात आल्या होत्या. बिलावल भुट्टो या दौऱ्यात 4-5 मे रोजी होणार्या SCO बैठकीशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह रशिया व चीनच्या आपल्या समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. रशिया व चीनचे परराष्ट्र मंत्री यापूर्वीच जी-20 च्या बैठकीसाठी भारत दौऱ्यावर आले होते. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.