आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे.
UN मध्ये भारत म्हणाला - शांतता हा एकमेव पर्याय
याआधी शनिवारी सकाळी युक्रेन वादावर यूएनमध्ये भारताने युक्रेन-रशियाला चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यास सांगितले. सुरक्षा परिषदेत निषेधाच्या प्रस्तावादरम्यान, भारताने म्हटले की, जीवनाची किंमत कशानेही मोजली जाऊ शकत नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू करून समस्या सोडवायला हव्या. या काळात भारताने मतदानावर बहिष्कार टाकला.
युक्रेनमधून भारतीयांना आणण्याचे प्रयत्न सुरू
23 फेब्रुवारीला युक्रेनमध्ये हल्ला होण्यापूर्वी एअर इंडियाचे विमान 242 जणांना घेऊन दिल्लीत पोहोचले होते. 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यानंतर तेथील विमानांची वाहतूक बंद करण्यात आली. शनिवारी सकाळी एअर इंडियाचे दुसरे विमान बुडापेस्ट, रोमानिया येथून 219 भारतीयांना घेऊन मुंबईसाठी रवाना झाले. युद्धानंतरची ही पहिली तुकडी असेल जी भारतात पोहोचेल.
भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी चार विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एक नवीन सूचना जारी केली आहे. यामध्ये भारतीय दूतावासाची परवानगी मिळाल्याशिवाय सीमेच्या दिशेने घराबाहेर पडू नये, असे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.