आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज (3 मे) भगवान परशुरामांची जयंती आहे. भगवान परशुराम यांच्यामुळे वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र आहेत. असे मानले जाते की परशुराम चिरंजीवी आहेत आणि सदैव जीवित राहतील.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, परशुराम जयंतीनिमित्त भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा करावी. विशेषत: अक्षय्य तृतीयेला जल दान करा. परशुरामाच्या कथा त्रेतायुग आणि द्वापर युगाशी संबंधित आहेत. त्रेतायुगात परशुराम आणि श्रीराम यांची भेट झाली होती. द्वापार युगात परशुराम हे भीष्म आणि कर्णाचे गुरू झाले होते.
श्रीराम आणि परशुराम यांच्याशी संबंधित कथा
रामायणातील सीता स्वयंवराच्या वेळी श्रीरामांनी स्वयंवरात ठेवलेले शिव धनुष्य उचलून प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते धनुष्य तुटले होते. यानंतर परशुराम स्वयंवराच्या ठिकाणी पोहोचले आणि महादेवाचे धनुष्य तुटलेले पाहून संतापले. यानंतर श्रीरामांनी परशुराम यांना ते भगवान विष्णूचे अवतार असल्याची जाणीव करून दिली, तेव्हा परशुराम यांचा राग शांत झाला आणि तेथून परतले.
कर्णाशी संबंधित कथा
महाभारतानुसार भीष्म पितामह परशुरामाचे शिष्य होते. द्वापर युगात परशुराम यांनी कश्यप ऋषींना संपूर्ण पृथ्वी दान केली. ते आपली सर्व शस्त्रे ब्राह्मणांनाच दान करत होते. अनेक ब्राह्मण त्यांच्याकडे शक्ती मागण्यासाठी येत होते. द्रोणाचार्यांनीही त्यांच्याकडून काही शस्त्रेही घेतली होती. ही गोष्ट कर्णालाही कळली. कर्ण हा ब्राह्मण नव्हता, पण तो शस्त्र घेण्यासाठी परशुरामांकडे पोहोचला.
कर्ण ब्राह्मणाच्या वेशात परशुरामांना भेटला. तोपर्यंत परशुराम यांनी सर्व शस्त्रे दान केली होती. तरीही कर्णाची शिकण्याची इच्छा पाहून त्यांनी कर्णाला आपला शिष्य बनवले.
एके दिवशी परशुरामांना कळले की कर्ण ब्राह्मण नाही आणि त्याने माझ्याकडून खोटे बोलून ज्ञान मिळवले. म्हणून त्यांनी कर्णाला शाप दिला की तो गरजेच्या वेळी सर्व ज्ञान विसरेल. यानंतर महाभारत युद्धात कर्ण आणि अर्जुनाचे युद्ध चालू होते, तेव्हा कर्णाला कोणतेही दैवी शस्त्र वापरता येत नव्हते, तो दैवी शस्त्रांचे ज्ञान विसरला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.